शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

संकट येताच भांबावून जाऊ नका, थोडं थांबून विचार करा मार्ग नक्की सापडेल; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 07:30 IST

ज्याप्रमाणे शांत डोहात पाय टाकताना भीती वाटत नाही, कारण त्याचा तळ दिसत असतो, त्याचप्रमाणे शांत मनातूनच मार्ग सापडतो!

संकट कधी सांगून येत नाही. त्यामुळे कधी, कोणते, कसे संकट ओढावेल आणि आपण त्याला कसे तोंड देऊ याची पूर्वतयारी करणे शक्य नाही. परंतु, अशा कठीण प्रसंगी मन शांत ठेवण्याची तयारी आतापासून करता येईल. रोजच्या छोट्या मोठ्या प्रसंगाना आपण कसे तोंड देतो, यावरून कठीण प्रसंगाला आपण कसे सामोरे जाणार आहोत, याचे स्वत:च स्वत:ला परीक्षण करता येईल. 

एक राजा होता. त्याला अनेक पूत्र होते. राजा वृद्धत्त्वाकडे झुकला होता. राज्याचा पदभार उचित हाती सोपवून त्याला राज्यकारभारातून निवृत्त व्हायचे होते. परंतु, आपल्या अनेक पूत्रांपैकी नेमकी कोणच्या हाती राज्यपदाची सूत्रे द्यावीत, असा राजासमोर संभ्रम निर्माण झाला. राजा आणि राणीचे आपल्या सर्व पूत्रांवर समान प्रेम होते. तरी राज्य सिंहासनावर कोणा एकालाच बसवता येणार होते. ते पद योग्य हातीच गेले पाहिजे असा राजाचा आग्रह होता. राजाने आपल्या पुत्रांची परीक्षा घ्यायची असे ठरवले.

राजाने शाही भोजनाची घोषणा केली. सर्व पूत्रांसाठी भव्य सभामंडपात स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. पकवान्नयुक्त भोजन, नृत्य, गाणी, मनोरंजन असा एकूणच माहोल धुंद झाला होता. राजा त्या सभेला हजर न राहता आपल्या राजमहालातून तेथील दृष्याचे अवलोकन करत होता.

राजाच्या सांगण्यावरून त्या सभामंडपात जंगली कुत्री सोडण्यात आली. पहारेकरी घाबरून इतरत्र पळू लागले. उपसस्थित सगळेच जीव वाचवत पळू लागले. काही राजकुमार त्या जंगली कुत्र्यांची शिकार करायला निघाले, तर काही राजकुमार घाबरून राजवाड्याच्या दिशेने पळाले. सगळे चित्र पाहून राजाने घोषणा केली. 'उद्या दरबारात नव्या राजाच्या हाती राज्याची सूत्रे सोपवली जातील.'

सर्व लोकांमध्ये कुतुहल होते, नवीन राजा कोण असेल? दुसऱ्या  दिवशी दरबार भरला. सगळे राजपुत्र हजर होते. राजाने विचारले, `सर्वांना भोजन आवडले का?'

दोघा तिघांनी उठून राग व्यक्त केला, काल घडलेला प्रसंग सांगितला. राजा निराश होऊन म्हणाला, याचा अर्थ भोजनाचा आनंद कोणीच घेऊ शकले नाही?' तेवढ्यात एक राजकुमार उठून म्हणाला, 'पिताश्री भोजन खूप स्वादिष्ट होते. पंगतीपैकी मी एकटा जेवलो. जी कुत्री मला चावण्यासाठी अंगावर येत होती, त्यांना मी माझ्या भोजनावरून उठलेल्या भावांची ताटे पुढे केली. कुत्री जेवली, मी ही जेवलो! भरल्या पोटी ती सुस्तावली आणि मी जेवणावर यथेच्छ ताव मारला.'

राजा खुष झाला, म्हणाला, `याला म्हणतात प्रसंगावधानता! संकट काळात न डगमगता जो मार्ग काढतो, तोच स्वत:चा आणि इतरांचा बचाव करू शकतो. माझ्या या राजपुत्राने छोट्याशा प्रसंगातून मोठी प्रसंगावधानता दाखवली. तोच उद्या राज्यावर आलेले संकट सहज दूर करेल असा विश्वास वाटतो, म्हणून त्यालाच आपण भावी राजा बवनत आहोत. 

असा राजयोग आपल्याही नशीबात यावा असे वाटत असेल, तर मन सदासर्वदा शांत ठेवायला शिका. जे हवे ते सर्व मिळेल. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी