शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

स्वयंघोषित ढोंगी बाबांना बळी पडू नका, खरा संत वृत्तीचा माणूस 'या' गुणांवरून ओळखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 14:33 IST

सद्यस्थितीत साधू कमी आणि संधी साधूंची संख्या वाढत आहे. धर्माच्या नावावर लोकांना फसवले जात आहे. अशा वेळी व्यक्तीला ओळखायचे कसे? तर संत सांगतात... 

'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' असे पूर्वी म्हटले जात असे. कारण, तेव्हा खऱ्या अर्थाने साधू-संतांचा समाजात वावर होता. मात्र, सद्यस्थितीत स्वयंघोषित संतांची, गुरुंची संख्या एवढी वाढली आहे, ती पाहता संतांची ओळख पटावी तरी कशी? हा संभ्रम दूर करण्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अनुग्रहित शिष्य निळोबा राय म्हणतात,

तेचि संत, तेचि संत। ज्यांचा हेत विठ्ठली।नेणति काही जादूटोणा। नामस्मरणावाचोनि।।

सर्वात पहिली गोष्ट, संत कधीच स्वत:ला उपाधी देत नाहीत, तर लोक त्यांचा संत म्हणून गौरव करतात. परंतु, अलीकडच्या काळात लोकांवर अंधश्रद्धेचा एवढा पगडा आहे, की ते जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीला साधू-संत म्हणू लागले आहेत. संतांच्या ठायी जादू करण्याची किमया आहे, परंतु ही जादू व्यावहारिक जगाची नाही, तर पारमार्थिक जगाची आहे. त्या जादूचा प्रभाव अखंड टिकणारा आहे. असे संत समाजाची दिशाभूल करत नाहीत, तर विठ्ठलनामाची गोडी लावतात, सन्मार्गाची वाट दाखवतात आणि भगवंतापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, हे पटवून देतात.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा, अशी तुकाराम महाराजांनी संतांची व्याख्या करून ठेवली आहे. असे लोक जे निर्हेतुकपणे जनसेवा करतात. स्वत:जवळ कितीही ज्ञान असले, तरी त्याचे प्रदर्शन करत नाहीत, तर त्या ज्ञानाचा लोककल्याणासाठी उपयोग करतात.

संत ज्ञानेश्वर यांना सर्व संतांनी एकमुखाने माऊली म्हटले आहे. कारण, त्यांनी समाजाचा रोष पत्करूनही प्रेमाची परतफेड केली. सर्वसामान्य लोकांना भगवद्गीतेचे मर्म कळावे, म्हणून त्यांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरीची रचना केली. साध्या साध्या गोष्टी सोदाहरण समजावून सांगितल्या. जड बुद्धीच्या रेड्यासारख्या लोकांकडून वेद वदवून घेतले. भिंतीसारख्या थिजलेल्या समाजात चैतन्य निर्माण करून समाजाला गती दिली. अमृतानुभव दिला. अभंगरचना केली. विठ्ठलाशी सोयरिक निर्माण करून दिली, तरीदेखील या कार्याचे श्रेय आपल्या गुरुंना देताना आपल्याकडे उणेपणा घेतला. गुरुकृपेने आपल्या आयुष्यात मोगरा फुलला, अशी ते ग्वाही देतात. 

ही विनम्रता संतचरित्राचे दर्शन घडवते. संत वृत्ती सापडणे दुर्मिळ. परंतु संतविचारांचे आचरण करणे, शक्य आहे. याकरिता आधी संतचरित्राचा आढावा घ्या आणि मगच संतांच्या विचारांचे अनुसरण करा, अशी विनवणी निळोबा राय करतात. जय हरी!