शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कोणाच्या प्रगतीने स्वतःला त्रास करून घेऊ नका; त्यांच्या यशाचे गुपित कशात आहे ते शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 07:00 IST

अनेक जण दुसऱ्यांची प्रगती पाहून जळत राहतात, मात्र अशी असूया मनात बाळगण्यापेक्षा त्यांच्या प्रगतीतून आपण बोध घेतला तर नक्कीच आपलीही प्रगती होईल!

स्पर्धा निकोप असेल, तर प्रगतीला वाव असतो. परंतु सहसा तसे होत नाही. स्पर्धेतून एकमेकांबद्दल मत्सर वाढतो, द्वेष उत्पन्न होतो आणि दुसऱ्याच्या प्रगतीने आपण अस्वस्थ होतो. हा मनुष्य स्वभाव असला, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल वाटणारी असूया आपल्या प्रगतीच्या आड येऊन नैराश्याला खतपाणी घालते. त्यावर पर्याय सुचवताना व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू एक गोष्ट सांगतात. ती वाचल्यावर तुम्हाला बालपणी ऐकलेली गोष्ट आठवेल. ती गोष्ट कोणती हे पुढे कळेलच. आधी प्रभुजींनी सांगितलेली गोष्ट पाहू. 

राहुल आणि जितेन हे दोघेही एकाच विद्यापीठातून एकाच गुणवत्तेने उत्तीर्ण झालेले दोन विद्यार्थी एकाच कंपनीत नोकरीला लागतात. दोघेही एकसारखे मेहनती असूनही वर्षभरातच राहुलला पगारवाढ आणि पदोन्नती मिळते. जितेनला या गोष्टीचा खूप त्रास होतो. तो कुढत राहतो. आणखी मेहनत घेतो. तरीदेखील त्याच्या कामाची दखल घेतली जात नाही. 

एक दिवस जितेन रागारागात राजीनामा देतो. आपल्या मेहनतीची दखल घेतली जात नसल्याचे राजीनाम्यात नमूद करतो. कंपनीचे व्यवस्थापक जितेनच्या याआधीच्या कामाची पाहणी करतात. पण तो नक्की कशात कमी पडतोय, हे पाहण्यासाठी त्याला एक संधी देतात.

 

जितेनला बोलावून एक काम दिले जाते. आपल्या कंपनीच्या आवारात कोणी टरबूज विक्रेता आहे का? याची पाहणी करण्यास सांगितले जाते. जितेन तपास करून येतो. व्यवस्थापक त्याला टरबुजाची किंमत विचारतो, जितेन पुन्हा जाऊन चौकशी करून येतो. थोड्यावेळाने हेच काम राहुलला दिले जाते. राहुल तपास करून येतो आणि आल्यावर टरबूजवाला कुठे बसतो, तो किती रुपयाला टरबूज देणार आहे, तो टरबूज कुठे पिकवतो, महिन्याला किती उत्पन्न कमवतो, त्याच्याकडून घाऊक भावात खरेदी करायची असल्यास आपल्याला किती नफा होऊ शकेल अशी इथंभूत माहिती आणतो. ते ऐकून जितेन वरमतो. काम सारखेच, परंतु राहुलच्या कामाची पद्धत, त्याची विचार करण्याची पद्धत आणि कामाला दिलेले पूर्णत्त्व यामुळे त्याचे काम आपल्यापेक्षा वरचढ ठरते, हे जितेन च्या लक्षात येते. तो राजीनामा मागे घेतो आणि राहुलच्या हाताखाली राहून काम अधिक चांगल्या रीतीने पूर्ण कसे करता येईल हे शिकून घेतो. 

आता तुम्हालाही बालपणीची अकबर बिरबलाची गोष्ट आठवली ना? बिरबलाच्या जागी बेगम आपल्या भावाचा वशिला लावू पाहते, पण बिरबल म्हणजे आजचा राहुल असतो. जो कामात चोख आणि उजवा असतो. आपल्यालाही अशा राहुलचा, बिरबलाचा आदर्श ठेवायचा आहे. यशाचा मार्ग असाच शोधायचा असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या यशाने वाईट वाटून न घेता आपण कुठे कमी पडत आहोत, याचा अभ्यास करा आणि आपल्या यशाची वाट तयार करा. तुम्हालाही निश्चितच यश मिळेल!