शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

'युद्धात तुलाच विजय मिळेल या संभ्रमात राहू नकोस' अशा शब्दात श्रीकृष्णाने केली होती अर्जुनाची कानउघडणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 11:02 IST

निकालाची भीती आणि त्यातही अपयशाची भीती प्रत्येकालाच वाटते, ही अवस्था अर्जुनाची तर आपली काय कथा; वाचा त्यावर हे उत्तर!

कुरुक्षेत्रावर आपल्या विरुद्ध आपलेच लोक लढताना पाहून गर्भगळीत झालेला अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, 'कृष्णा या युद्धात माझा पराभव झाला तर मी काय करू? जिंकलो तरी आपल्याच लोकांना हरवल्याचं दुःख कसे सहन करू? त्यापेक्षा आताच युद्धातून माघार घेतली तर पुढचे सगळे प्रश्नच संपून जातील असे वाटत नाही का?

अर्जुनाच्या भ्याड प्रश्नावर श्रीकृष्ण रागावले आणि म्हणाले, 'हे वेळीच ठरवायला हवे होते, कुरुक्षेत्रावर येऊन हा निर्णय घेण्याची ही वेळ नाही. युद्ध जाहीर होण्याआधी हा निर्णय उचित ठरला असता, मात्र युद्ध भूमीवर येऊन पाठ फिरवणे तुला शोभणार नाही. आता युद्ध करणे हेच तुला प्राप्त आहे. संकटाला पाठ दाखवली म्हणून संकट पाठ सोडत नसतात. त्या संकटांचा धिटाईने सामना करावा लागतो. तुला तुझे कर्म करायचे आहे. फळ काय मिळेल हे तुझ्या हातात नाही. आणि या युद्धात तुलाच विजय मिळेल या संभ्रमात राहू नकोस! याक्षणाला तुझ्या तुलनेत कौरवांचा आत्मविश्वास प्रबळ आहे आणि तू संभ्रमित अवस्थेत आहेस. त्यामुळे या युद्धात तुझा पराभवच काय तर मृत्यूही होऊ शकतो. पण त्या विचाराने तू युद्ध सोडू नकोस, कारण... 

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।

अर्थात, युद्धात मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल, जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. त्यामुळे तू आता फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे कर. 

श्रीकृष्णाचा हा उपदेश केवळ अर्जुनासाठी नसून पराभवाची भीती वाटणाऱ्या प्रत्येक मनुष्याला आहे. त्यामुळे हरण्याच्या भीतीने लढणे सोडू नका. हरलात तर अनुभव मिळेल, जिंकलात तर यश मिळेल!

टॅग्स :Mahabharatमहाभारत