शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'युद्धात तुलाच विजय मिळेल या संभ्रमात राहू नकोस' अशा शब्दात श्रीकृष्णाने केली होती अर्जुनाची कानउघडणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 11:02 IST

निकालाची भीती आणि त्यातही अपयशाची भीती प्रत्येकालाच वाटते, ही अवस्था अर्जुनाची तर आपली काय कथा; वाचा त्यावर हे उत्तर!

कुरुक्षेत्रावर आपल्या विरुद्ध आपलेच लोक लढताना पाहून गर्भगळीत झालेला अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, 'कृष्णा या युद्धात माझा पराभव झाला तर मी काय करू? जिंकलो तरी आपल्याच लोकांना हरवल्याचं दुःख कसे सहन करू? त्यापेक्षा आताच युद्धातून माघार घेतली तर पुढचे सगळे प्रश्नच संपून जातील असे वाटत नाही का?

अर्जुनाच्या भ्याड प्रश्नावर श्रीकृष्ण रागावले आणि म्हणाले, 'हे वेळीच ठरवायला हवे होते, कुरुक्षेत्रावर येऊन हा निर्णय घेण्याची ही वेळ नाही. युद्ध जाहीर होण्याआधी हा निर्णय उचित ठरला असता, मात्र युद्ध भूमीवर येऊन पाठ फिरवणे तुला शोभणार नाही. आता युद्ध करणे हेच तुला प्राप्त आहे. संकटाला पाठ दाखवली म्हणून संकट पाठ सोडत नसतात. त्या संकटांचा धिटाईने सामना करावा लागतो. तुला तुझे कर्म करायचे आहे. फळ काय मिळेल हे तुझ्या हातात नाही. आणि या युद्धात तुलाच विजय मिळेल या संभ्रमात राहू नकोस! याक्षणाला तुझ्या तुलनेत कौरवांचा आत्मविश्वास प्रबळ आहे आणि तू संभ्रमित अवस्थेत आहेस. त्यामुळे या युद्धात तुझा पराभवच काय तर मृत्यूही होऊ शकतो. पण त्या विचाराने तू युद्ध सोडू नकोस, कारण... 

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।

अर्थात, युद्धात मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल, जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. त्यामुळे तू आता फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे कर. 

श्रीकृष्णाचा हा उपदेश केवळ अर्जुनासाठी नसून पराभवाची भीती वाटणाऱ्या प्रत्येक मनुष्याला आहे. त्यामुळे हरण्याच्या भीतीने लढणे सोडू नका. हरलात तर अनुभव मिळेल, जिंकलात तर यश मिळेल!

टॅग्स :Mahabharatमहाभारत