शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अर्धा किलो कणिक दान करून, शेठजींनी केली आठ पिढ्यांची सोय; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 08:00 IST

भविष्याची काळजी सोडा, आजचा क्षण भरभरून जगा.

अर्धा किलो कणिक दान करून, शेठजींनी केली आठ पिढ्यांची सोय; वाचा ही गोष्ट!एक शेठजी, जे पिढीजात गर्भश्रीमंत होते. हाताखाली नोकर चाकर काम करत होते. शेठजींना कसली काळजी नव्हती. सगळे काही सुरळीत सुरू होते. एक दिवस शेठजींनी आपल्या लेखापालाला बोलावून घेतले आणि आपल्या संपत्तीची मोजदाद करायला सांगितली. सगळे व्यवहार कागदोपत्री लिहून लेखापालाने शेठजींना हिशोब देत म्हटले, `शेठजी तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे, की तुमच्या पुढच्या सात पिढ्या घरी बसून आरामात खातील. तुम्ही निश्चिंत राहा.' एवढे बोलून लेखापाल गेला. शेठजींना काळजी लागली, आठव्या पिढीची!

शेठजी विचार करू लागले, सात पिढ्या मला दुवा देतील, पण आठवी पिढी माझ्या नावाने शंख करेल त्याचे काय? काहीतरी उपाय केला पाहिजे. शेठजी दिवसरात्र अस्वस्थ राहू लागले. एक दिवस ते जवळच्या एका मंदिरात कीर्तन ऐकण्यासाठी गेले. तिथे गेल्यावर त्यांना फार शांत वाटले. परंतु, कीर्तन संपताच मनातल्या काळजीने डोके वर काढले. शेठजींनी महाराजांना प्रश्न विचारला आणि समस्येचे समाधान विचारले. महाराज म्हणाले, `सोपा उपाय सांगतो. आपल्या गावात एक भाग गरीब वस्तीने व्यापलेला आहे. तिथल्या झोपड्यांमध्ये सर्वात शेवटची झोपडी आहे, तिथे एक आजी राहते. तिला तू अर्धा किलो कणीक दान कर. तुझे सगळे प्रश्न सुटतील.'

शेठजी आनंदात निघाले. अर्धा किलो काय, तर एक क्विंटल कणिक त्यांनी नोकराकडून मागवून घेतली आणि ते दोघे आजीच्या घरी पोहोचले. शेठजींनी आजीला म्हणाले, `आजी मी तुम्हाला एक क्विंटल कणीक दान करायला आलो आहे. तुमच्या महिनाभराचा पोळ्यांचा प्रश्न सुटेल. याचा स्वीकार करा.'

आजी नको म्हणाल्या. शेठजी म्हणाले, `माझे मन मोडू नका. एक नाही तर अर्धा क्विंटल कणीक घ्या.' त्यावरही आजीने नकारार्थी मान फिरवली. शेठजींनी पुन्हा आग्रहक केला, `किमान एक किलो नाहीतर अर्धा किलो तरी कणीच घ्याच!' आजींनी हात जोडून सांगितले, `शेठजी माझे आजचे जेवण झाले आहे. माझ्या आजच्या जेवणाची सोय भगवंताने लावून दिली आहे. उद्याची काळजी करायला तो समर्थ आहे. मला या मोहात अडकायचे नाही. तो काय करायचे ते बघून घेईल. तुम्ही हे दान दुसऱ्या कोणा गरजवंताला द्या!'

शेठजींना कळले, की महाराजांनी या स्वाभीमानी आजीकडेच मला का पाठवले, तर माझ्या डोळ्यात अंजन पडावे म्हणून! शेठजींनी आजीला नमस्कार केला. त्यांची सगळी चिंताच मिटली. ते यथाशक्ती दान धर्म करू लागले आणि त्यातून त्यांच्या आठ पिढ्याच काय, तर सगळ्या पिढ्यांना भरभरून आशीर्वाद मिळाला!'

म्हणून भविष्याची काळजी सोडा, आजचा क्षण भरभरून जगा. आपली काळजी घ्यायला भगवंत आहे.