शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:09 IST

प्रेमानंद महाराजांच्या मते, वाईट नशीब किंवा संकटे दूर करण्यासाठी केवळ ईश्वराचे नामस्मरण आणि अनुष्ठान हाच खरा मार्ग आहे.

मथुरेतील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. अलीकडेच एका भक्ताने महाराजांना, 'आजकाल प्रत्येक जण आपले नाव बदलत आहे अथवा नावापुढे नंबर अथवा स्पेलिंग जोडत आहे, असे केल्याने, खरोखरच नशीब बदलू शकते का?' असा प्रश्न विचारला. यावर प्रेमानंद महाराजांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

नाव बदलल्याने किंवा स्पेलिंगमध्ये बदल केल्याने काहीही साध्य होत नाही -प्रेमानंद महाराज म्हणाले, "जर असे प्रत्यक्षात झाले अशते, तर आपण स्वतःच करून बघा आणि मलाही सांगा. म्हणजे मलाही लोकांना सांगता येईल. नाव बदलल्याने किंवा स्पेलिंगमध्ये बदल केल्याने काहीही साध्य होत नाही. जर असे शक्य असते, तर सर्वांनीच ते केले असते. अशा प्रकारचे उपाय सांगणारे लोक केवळ सर्वसामान्यांना मूर्ख बनवण्याचे काम करतात. केवळ अंगठ्या घालणे, जंतर किंवा गंडे बांधणे यांसारख्या बाह्य गोष्टींनी प्रारब्ध बदलत नाही, असे ते म्हणाले.

प्रेमानंद महाराजांच्या मते, वाईट नशीब किंवा संकटे दूर करण्यासाठी केवळ ईश्वराचे नामस्मरण आणि अनुष्ठान हाच खरा मार्ग आहे. ते म्हणाले, "कधीकधी लोकांचे काम चुकून झाले तर त्यांना वाटते की ते स्पेलिंग बदलल्यामुळे झाले; पण प्रत्यक्षात ते त्यांच्या पूर्वीच्या पुण्याचे फळ असते, जे अचानक प्रकाशित होते."

दरम्यान, निरंतर नामजप आणि मंत्रांचे अनुष्ठान करा, सर्वांशी प्रामाणिकपणे वागा आणि कोणतेही पाप कृत्यापासून दूर रहा, स्वप्नपूर्तीसाठी कष्ट आणि साधनेची जोड द्या, गंगा-यमुना स्नान, तीर्थयात्रा आणि धर्माच्या मार्गाने चालणे यामुळेच जीवनात मंगल होईल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Name Change or Ring Doesn't Change Fate: Premanand Maharaj's View

Web Summary : Premanand Maharaj dismisses name changes or rings as fate-altering solutions. He emphasizes devotion, honest living, and avoiding sinful acts as the true path to well-being. Past good deeds, not superficial changes, influence outcomes.
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक