शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

स्वभावाला औषध असते का? हो नक्कीच असते, फक्त ते वेळेवर घ्यावे लागते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 15:22 IST

आपणही मनाला मुरड घालून समोरच्याचे केवळ दोष न पाहता त्याची चांगली बाजू पाहण्याची तयारी ठेवली, तर स्वभावात बदल नक्कीच होतील.

परिस्थितीनुसार लोकांच्या वागणुकीत बदल होतो, पण स्वभावातला बदल क्वचितच बघायला मिळतो. स्वभावाला औषध नाही असे म्हणतात, पण एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक बदलण्याचा प्रयत्न केला, तर असाध्य काहीच राहत नाही.

एक राजा होता. तो खूप चांगला होता. फक्त त्याचा दोष एवढाच की तो शीघ्रकोपी होता. लोक त्याला रागाला घाबरून राहत असत. चूक छोटी असो वा मोठी, राजाकडे शिक्षा एकच होती, अपराध्याला पाळीव दहा रानटी कुत्र्यांच्या तोंडी देणे. या एका दोषामुळे प्रजेच्या मनात त्याच्याबद्दल आदर असला, तरी त्याच्या रागाची भीतीसुद्धा होती. 

राजाचा विश्वासू मंत्रीसुद्धा डोक्यावर तलवार ठेवल्यासारखे भीत भीत चाकरी करत असे. एक दिवस या मंत्र्याच्या हातून छोटीशी चूक झाली. शिघ्रकोपी राजाने मंत्र्याला कुत्र्यांच्या तोंडी देण्याचे फर्मान काढले. मंत्री गयावया करू लागला. म्हणाला, `राजेसाहेब एवढी वर्षे आपल्याकडे इमाने इतबारे चाकरी करत आहे, म्हणून तरी दया करा.'

राजा म्हणाला, `जो नियम सगळ्यांना तो तुलासुद्धा!'मंत्र्याला काही सुचेना, तो म्हणाला, `ठीक आहे राजा, मला दहा दिवसांची मुदत द्या, मग मी आपणहून ही शिक्षा भोगायला जाईन.'राजाने मुभा दिली. मंत्री दहा दिवस कुठे गेला कोणालाही पत्ता लागेना. तो न सांगता गायब झाल्याने राजा आणखनीच रागवला. त्याला शोधण्याचा फतवा काढणार, तोच अकराव्या दिवशी मंत्री हजर झाला आणि शिक्षा भोगायला गेला. राजासुद्धा त्याच्या पाठोपाठ गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय आश्चर्य? ते रानटी कुत्रे मंत्र्यावर धावून यायचे सोडून त्याच्या पायाशी घुटमळू लागले. राजाला आश्चर्य वाटले. त्याने या बदलाचे कारण विचारले.

मंत्री म्हणाला, `राजा, मी दहा दिवस या कुत्र्यांची मनापासून सेवा केली. त्यांना माझा लळा लागला आता ते मला मारणार नाहीत. परंतु इतकी वर्षे तुमची चाकरी करूनही केवळ रागाच्या भरात येऊन तुम्ही माझे सगळे चांगले कार्य विसरलात आणि मला कुत्र्यांच्या तावडीत दिले. हे ऐकून राजा वरमला आणि त्याने ही शिक्षा कायमची रद्द केली. 

अशा प्रकारे आपणही मनाला मुरड घालून समोरच्याचे केवळ दोष न पाहता त्याची चांगली बाजू पाहण्याची तयारी ठेवली, तर स्वभावात बदल नक्कीच होतील. म्हणून तर म्हणतात ना, `स्वभावाला औषध असते, फक्त ते वेळोवेळी घेतले पाहिजे.