शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

स्वभावाला औषध असते का? हो नक्कीच असते, फक्त ते वेळेवर घ्यावे लागते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 15:22 IST

आपणही मनाला मुरड घालून समोरच्याचे केवळ दोष न पाहता त्याची चांगली बाजू पाहण्याची तयारी ठेवली, तर स्वभावात बदल नक्कीच होतील.

परिस्थितीनुसार लोकांच्या वागणुकीत बदल होतो, पण स्वभावातला बदल क्वचितच बघायला मिळतो. स्वभावाला औषध नाही असे म्हणतात, पण एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक बदलण्याचा प्रयत्न केला, तर असाध्य काहीच राहत नाही.

एक राजा होता. तो खूप चांगला होता. फक्त त्याचा दोष एवढाच की तो शीघ्रकोपी होता. लोक त्याला रागाला घाबरून राहत असत. चूक छोटी असो वा मोठी, राजाकडे शिक्षा एकच होती, अपराध्याला पाळीव दहा रानटी कुत्र्यांच्या तोंडी देणे. या एका दोषामुळे प्रजेच्या मनात त्याच्याबद्दल आदर असला, तरी त्याच्या रागाची भीतीसुद्धा होती. 

राजाचा विश्वासू मंत्रीसुद्धा डोक्यावर तलवार ठेवल्यासारखे भीत भीत चाकरी करत असे. एक दिवस या मंत्र्याच्या हातून छोटीशी चूक झाली. शिघ्रकोपी राजाने मंत्र्याला कुत्र्यांच्या तोंडी देण्याचे फर्मान काढले. मंत्री गयावया करू लागला. म्हणाला, `राजेसाहेब एवढी वर्षे आपल्याकडे इमाने इतबारे चाकरी करत आहे, म्हणून तरी दया करा.'

राजा म्हणाला, `जो नियम सगळ्यांना तो तुलासुद्धा!'मंत्र्याला काही सुचेना, तो म्हणाला, `ठीक आहे राजा, मला दहा दिवसांची मुदत द्या, मग मी आपणहून ही शिक्षा भोगायला जाईन.'राजाने मुभा दिली. मंत्री दहा दिवस कुठे गेला कोणालाही पत्ता लागेना. तो न सांगता गायब झाल्याने राजा आणखनीच रागवला. त्याला शोधण्याचा फतवा काढणार, तोच अकराव्या दिवशी मंत्री हजर झाला आणि शिक्षा भोगायला गेला. राजासुद्धा त्याच्या पाठोपाठ गेला. तिथे जाऊन पाहतो तर काय आश्चर्य? ते रानटी कुत्रे मंत्र्यावर धावून यायचे सोडून त्याच्या पायाशी घुटमळू लागले. राजाला आश्चर्य वाटले. त्याने या बदलाचे कारण विचारले.

मंत्री म्हणाला, `राजा, मी दहा दिवस या कुत्र्यांची मनापासून सेवा केली. त्यांना माझा लळा लागला आता ते मला मारणार नाहीत. परंतु इतकी वर्षे तुमची चाकरी करूनही केवळ रागाच्या भरात येऊन तुम्ही माझे सगळे चांगले कार्य विसरलात आणि मला कुत्र्यांच्या तावडीत दिले. हे ऐकून राजा वरमला आणि त्याने ही शिक्षा कायमची रद्द केली. 

अशा प्रकारे आपणही मनाला मुरड घालून समोरच्याचे केवळ दोष न पाहता त्याची चांगली बाजू पाहण्याची तयारी ठेवली, तर स्वभावात बदल नक्कीच होतील. म्हणून तर म्हणतात ना, `स्वभावाला औषध असते, फक्त ते वेळोवेळी घेतले पाहिजे.