शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हालाही रोज पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान जाग येते? मग हे अवश्य वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 08:00 IST

हे शुभचिन्ह ओळखा आणि आपले आयुष्य आंतर्बाहय बदलण्याची संधी अजिबात दवडू नका. 

प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते. अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते. म्हणून तर आपण म्हणतोही, जे होते ते चांगल्यासाठी! परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का? तर नाही! प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात. जे आपल्याला कधी वेळेत कळतात, तर कधी वेळ निघून गेल्यावर! आबाल वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात. आपण दुर्लक्ष करतो, परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दांची आठवण येते. त्याचप्रमाणे काही प्रसंग त्याक्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात, परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते. 

तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल, दृढ श्रद्धा असेल, तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी म्हणून त्यांचा वापरही करू शकता. यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे. तरच अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते. जसे की, रोज पहाटे ३ ते ५ दरम्यान जाग येणे. 

झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेष नसेलही, परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे, तेही पहाटे, हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे. पहाटे ३ ते ५ ही वेळ ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखली जाते. या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात, हे आपण सगळेच जाणतो. परंतु अनेकांना ठरवूनही या वेळी जाग येत नाही. अलार्म बंद करून ते झोपी जातात. याउलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत असेल, तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात असे समजा. 

ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती. म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असे म्हणतात. ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते. प्रभाव कोणावर? तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते, त्यावर! या वेळेत शक्ती, बुद्धी, बल, तेज असे आरोग्याशी निगडित जे घटक हवे, ते सगळे प्राप्त होतात. या कालावधीत नभोमंडलातील ग्रहस्थिती आपल्या प्रगतीकरिता उत्तम असते. वातावरण शुद्ध असते. परिसर शांत असतो. त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल, ते अवश्य प्राप्त करू शकाल, असा ब्रह्म मुहूर्ताचा महिमा आहे. 

भगवान श्रीकृष्ण यांनीदेखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपले पूर्वज, ऋषी मुनी ब्रह्म मुहूर्तावर उठून दिन चर्येची, ध्यानधारणेची सुरुवात करत असत. याउलट आपण, सूर्य डोक्यावर आला, तरी अंथरूण सोडत नाही. 

परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल, तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत. या वेळेचा सदुपयोग करा. तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल. परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील. यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्म मुहूर्तावर जाग आली, की आपल्या ध्येयाप्रती चांगली कामगिरी करा. ध्येय निश्चित नसेल, तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या. तन सुदृढ असेल, तर मन ही सुदृढ असेल. शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल. 

हे शुभचिन्ह ओळखा आणि आपले आयुष्य आंतर्बाहय बदलण्याची संधी अजिबात दवडू नका.