शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

स्वामी समर्थांची नियमित सेवा करता? ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा, स्वामी पूजेचे शुभफल मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 11:51 IST

Shree Swami Samarth Maharaj Seva: स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात? जाणून घ्या...

Shree Swami Samarth Maharaj Seva: श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो. अशक्यही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यांमुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करत असतात. अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत. परंतु, स्वामींची नियमित सेवा करत असाल, तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो, तरी त्याचे फल मिळते की नाही, याबाबत मनात शंका निर्माण होते. गोष्टी सकारात्मक घडत नाही, असे वाटू लागते. अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की, नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र, असे घडत असेल, तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा, असा सल्ला दिला जातो. आपण जे करतो, ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे, असे सांगितले जाते. तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही, याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी, असे म्हटले जाते. 

नेमके काय करावे?

- स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरु ठेवावी. स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल, तर तिन्ही सांजेला, दिवेलागणीची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी. 

- एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये. त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. देवासमोर दिवा लावावा. स्वामींना दिवा अर्पण करावा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे. अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल.

- यानंतर स्वामींची मानसपूजा करावी. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. याचे २१ अध्याय आहेत. दररोज ३ अध्यायाचे पठण केले, तरी सात दिवसांत एक पारायण पूर्ण होऊ शकेल. पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. 

- यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा. तसेच किमान एक माळ ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा जप करावा. एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम. परंतु, यथाशक्ती जप, नामस्मरण करावे. शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी. 

- शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी. खंड पडू नये. काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी. तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरु करावी. 

- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा. ही सेवा करताना निःशंक मनाने करावी. कोणताही किंतु मनात ठेवू नये. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३