शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

स्वामी समर्थांची नियमित सेवा करता? ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा, स्वामी पूजेचे शुभफल मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 11:51 IST

Shree Swami Samarth Maharaj Seva: स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात? जाणून घ्या...

Shree Swami Samarth Maharaj Seva: श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो. अशक्यही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यांमुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करत असतात. अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत. परंतु, स्वामींची नियमित सेवा करत असाल, तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो, तरी त्याचे फल मिळते की नाही, याबाबत मनात शंका निर्माण होते. गोष्टी सकारात्मक घडत नाही, असे वाटू लागते. अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की, नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र, असे घडत असेल, तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा, असा सल्ला दिला जातो. आपण जे करतो, ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे, असे सांगितले जाते. तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही, याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी, असे म्हटले जाते. 

नेमके काय करावे?

- स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरु ठेवावी. स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल, तर तिन्ही सांजेला, दिवेलागणीची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी. 

- एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये. त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. देवासमोर दिवा लावावा. स्वामींना दिवा अर्पण करावा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे. अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल.

- यानंतर स्वामींची मानसपूजा करावी. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. याचे २१ अध्याय आहेत. दररोज ३ अध्यायाचे पठण केले, तरी सात दिवसांत एक पारायण पूर्ण होऊ शकेल. पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. 

- यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा. तसेच किमान एक माळ ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा जप करावा. एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम. परंतु, यथाशक्ती जप, नामस्मरण करावे. शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी. 

- शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी. खंड पडू नये. काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी. तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरु करावी. 

- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा. ही सेवा करताना निःशंक मनाने करावी. कोणताही किंतु मनात ठेवू नये. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३