शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

तुम्हाला तव्यावरची गरमागरम पोळी आवडते? थांबा! वास्तुशास्त्राने सांगितलेल्या महत्त्वपूर्ण सूचना जाणून घ्या ... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 14:54 IST

'असतील शिते तर जमतील भुते' ही म्हण आपण ऐकली आहे. दारिद्रय आपल्या घराचे दार ठोठवू नये यासाठी वास्तुशास्त्राच्या सूचनांचे पालन करा. 

दिवसभर राबून आपण कष्ट करतो ते कशासाठी? तर दोन वेळचे जेवण सुखासुखी मिळावे यासाठी! रोज शिरापुरीचा स्वयंपाक नसला तरी निदान मीठ भाकरी वर सगळ्यांची गुजराण होते. म्हणून वास्तुशास्त्र सांगते, आपण ज्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतो, रांधून वाढतो ती भांडी कधीच उष्टी खरकटी ठेवू नयेत. रात्री झोपण्यापूर्वी आपण आपला ओटा जसा स्वच्छ करतो तशीच भांडी घासून टाकावीत. त्या स्वच्छतेमुळे अन्नपूर्णा देवी संतुष्ट होते आणि आशीर्वाद देते. 

>>आजच्या काळात नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिवसभराचा थकवा पेलून रात्री भांडी घासून झोपणे शक्य होत नाही, त्या ते काम मोलकरणीसाठी ठेवून देतात. काही गोष्टींचे नाईलाजाने पालन करता आले नाही तरी पर्यायी व्यवस्थेचा जरूर वापर करावा. ती पर्यायी व्यवस्था म्हणजे आपल्याला दोन वेळेच्या पोळ्या-भाकरी रांधून देणारी भांडी अर्थात पोळपाट,  लाटणे स्वच्छ धुवून जागेवर ठेवावे. एवढे तर आपण करूच शकतो ना? या एका नियमाबरोबरच आणखी चार गोष्टींचे पालन करा, जेणेकरून तुमच्या आर्थिक स्थितीला धक्का लागणार नाही. 

>> अनेकांना तव्यावरची गरम पोळी आवडते. परंतु शास्त्र सांगते, गरम अन्न ताटात घ्यावे, त्याचा नैवेद्य दाखवावा, कावळ्याला, कुत्र्याला भाकर तुकडा वाढावा मग निवांत बसून खावे. आधाशीपणे किंवा हातात  खाणे दारिद्रयास कारण ठरते. 

>>पहिली पोळी-चपाती-भाकरी गायीला, कुत्र्याला  कावळ्याला दिल्याने घरात आर्थिक वृद्धी होते. सर्व जीवांना संतुष्ट करून मग मग आपण जेवावे अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यालाच वास्तूचा दुजोरा आहे. वास्तू तेव्हाच तृप्त होते, जेव्हा तेथील जीव संतुष्ट असतात. 

>>गरम तव्यावर पाणी टाकू नये. त्यावर ओरखडे येतील अशी घासणी वापरू नये. तवा पोळपाट नेहमी स्वच्छ आणि गुळगुळीत असावा. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र