शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

देवळात देवापुढे कासव का असते माहित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 10:41 IST

कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते, तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल, तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सान्निध्य लाभेल. 

मंदिरात गेल्यावर गाभाऱ्यात प्रवेश करताना अनेकदा आपला पाय बिचाऱ्या कासवावर पडला असेल. त्यावर कोणी फुले वाहिली असतील, तर ते आपले लक्ष वेधून घेते, पण अनेकदा कासव अगदी भुईसपाट आणि संगमरवरी असल्यामुळे आपल्या दृष्टीक्षेपात येत नाहीत. तसे असले, तरी देखील मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरठ्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्याला पूर्वजांनी घालून दिला आहे. त्याचे आपण पालन करतो. परंतु, प्रश्न असा पडतो, की सर्व मंदिरात सुरुवातीलाच किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असण्याचे प्रयोजन काय असेल? यावर छान माहिती मिळाली-

कासव हे प्रतीक रूप आहे. कासव ठेवण्याची दोन कारणे आहेत. कासवाची आई आपल्या पिलांकडे केवळ वात्सल्य दृष्टीने पाहून त्यांचे पोषण करते. त्याचप्रमाणे देवळातील देवानेही आपल्याकडे वात्सल्य दृष्टीने पहावे असे त्यातून सूचित केले आहे.

दुसरे कारण म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपले पाय आत खेचून घेते, त्याप्रमाणे देवासमोर जाताना भक्ताने आपले काम क्रोधादिक विकार आवरून मगच दर्शन घेतले पाहिजे. 

कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते, तशी भक्ताने अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल, तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सान्निध्य लाभेल.