शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नवजात बालकाच्या मुठी बंद का असतात माहितीय का? जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 14:01 IST

एकतर अशी ठिणगी शोधा किंवा दुसऱ्यांमधील ऊर्जा प्रज्वलित करणारी ठिणगी बना! एकदा का ही ठिणगी पेटली, की निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून केवळ विश्वकल्याण होईल.

महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण दवणे यांनी एकदा हा किस्सा सांगितला होता. त्यांना एका लहान मुलीने विचारलं, 'बाळाच्या मुठी बंद का असतात?' दवणे विचार करतात, आजवर कितीतरी नवजात शिशु पाहिले, पण आपल्याला हा प्रश्न कधी पडला नाही. मात्र या लहान मुलीच्या शंकेचं निरसन करायला हवं, म्हणून ते मुलीला म्हणाले, 'विचार करून सांगतो.' त्यांचे विचारचक्र सुरू झाले. त्यांना काय उत्तर सापडले, ते लेखाच्या पाहूच. त्याआधी या प्रश्नाशी निगडित आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी...

कागदात आग आहे का असे कोणी विचारले तर उत्तर नाही असे येईल. परंतु काडेपेटीच्या छोट्याशा काडीने कागदाला आग लावली तर कागद पेट घेईल, म्हणजे कागदातून आग येईल. याचाच अर्थ आग प्रत्येक वस्तूत आहे, त्यात ठिणगी पडणे महत्त्वाचे असते. मानवाच्या बाबतीत ही आग म्हणजे ऊर्जा आणि ती ठिणगी म्हणजे विश्वास असतो. 

एकदा एका लहान मुलाला शाळेतून चिट्ठी देऊन घरी पाठवले. मुलाने चिठ्ठी आईकडे दिली. आईने ती वाचली. मुलगा म्हणाला, 'आई काय लिहिले आहे त्यात?'आई म्हणाली, 'बाळा तुझ्या शिक्षकांनी या चिठ्ठीत लिहिले आहे, की तुमच्या मुलाची बुद्धी अनन्यसाधारण आहे. त्याला आम्ही शिकवू शकणार नाही कारण त्याची प्रतिभा अफाट आहे.' 

आईच्या शब्दांनी मुलगा भारावला. शाळेत न जाता ही खूप अभ्यास करू लागला. तो मोठा वैज्ञानिक बनला. वृद्धापकाळाने आईचे निधन झाले, तेव्हा आईपश्चात तो घरी गेला. तिथे एका कपाटात त्याला चिठ्ठी सापडली, ज्यात लिहिले होते, 'तुमचा मुलगा अतिशय ढ आहे, त्याला शिकवून, समजावून आम्ही थकलो, म्हणून त्याला शाळेतून बेदखल करत आहोत, पुन्हा त्याला शाळेत पाठवू नका! हे वाचणारा तो वैज्ञानिक मुलगा होता थॉमस एडिसन! त्याचे डोळे पाणावले. त्याला आईची खूप आठवण आली. मनोमन आईचे त्याने आभार मानले, कारण आई हीच त्याच्यातली ऊर्जा प्रज्वलित करणारी ठिणगी होती!

अशी ऊर्जा प्रत्येकात आहे. गरज असते ती ऊर्जा चेतवणाऱ्या ठिणगीची. त्यामुळे एकतर अशी ठिणगी शोधा किंवा दुसऱ्यांमधील ऊर्जा प्रज्वलित करणारी ठिणगी बना! एकदा का ही ठिणगी पेटली, की निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून केवळ विश्वकल्याण होईल. हीच ताकद भगवंताने प्रत्येकाच्या बंद मुठीत दिलेली आहे. हे ओळखून दवणे यांना उत्तर सापडले, की 'या बंद मुठीतून भगवंताने प्रत्येकाला प्रतिभा दिली आहे. योग्य ठिणगी पडताच ती प्रतिभा उजळून निघते. वाढत्या वयानुसार, समज आल्यावर अनेकांना बंद मुठीत दडलेले ऐश्वर्य गवसते, तर अनेकांची मूठ शेवट्पर्यंत झाकलेली राहते. म्हणून स्वतःची मूठ उगडून पहा आणि देवाने आपल्याला काय वैशिष्ट्य दिले आहे याचा शोध घ्या...!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी