शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महाभारताच्या युद्धात हनुमंताने श्रीकृष्णाला कोणती अट घातली होती माहितीय? वाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 11, 2023 07:00 IST

रामायणातले हनुमान महाभारतात कसे आले, कोणाच्या सांगण्यावरून आले आणि कोणत्या अटीवर थांबले, जाणून घ्या!

महाभारतात युद्धासाठी कुरुक्षेत्रावर सर्व तयारीनिशी पोहोचलेल्या अर्जुनाने ऐन वेळेस कच खाल्ली. आपलेच आप्तजन आपल्या विरुद्ध लढायला उभे पाहून भोवळ आली. हे युद्ध मी लढणार नाही असे तो म्हणाला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जो उपदेश केला, तो भक्त भगवंताचा संवाद म्हणजे भगवद्गीता. मात्र ती ऐकणारा अर्जुन एकटा तिथे उपस्थित नव्हता, तिथे आणखी दोन श्रोते होते, एक म्हणजे रथावर बसलेले हनुमान आणि दुसरे आकाशातून हा प्रसंग पाहणारे सूर्यदेव. सूर्यदेवांचा आकाशातला मुक्काम समजू शकतो, पण रामायण काळातले हनुमान महाभारातात कसे अवतीर्ण झाले, असा अनेकांना प्रश्न पडतो. ते चिरंजीवी आहेत, तरी महाभारताच्या युद्धाशी त्यांचा काय संबंध, हे अनेकांना माहीत नसते, त्याचे हे उत्तर. 

महाभारत सुरू होण्याआधी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, की तुझ्या रथाचे सारथ्य मी करणार असलो तरी रथावर जी अस्त्र, शस्त्र आदळतील, त्यापासून संरक्षणासाठी रामदूत हनुमंताला शरण जा आणि त्यांना रथाचे रक्षण करण्याची विनंती कर. अर्जुनाने तसे केले, तेव्हा हनुमंत श्रीकृष्णांना म्हणाले जिथे भजन, पूजन, सत्संग असतो तिथेच मी थांबतो. जिथे राम नाही तिथे माझे काम नाही. श्रीकृष्ण म्हणाले, तुझी अट मी मान्य करतो. त्या वचनपूर्तीसाठी श्रीकृष्णाने हनुमानाला गीतामृतातून सत्संग घडवून आणला. म्हणून हनुमान रथावर थांबले. जेव्हा युद्ध पूर्ण झाले, तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला उतरण्याची विनंती केली, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले आधी तू उतर....

अर्जुन रथातून उतरला, मग श्रीकृष्ण उतरले आणि नंतर हनुमंतांनी रथावरून खाली उडी मारताच रथाचा स्फोट झाला आणि तो क्षणात भस्मसात झाला. हनुमंताच्या कृपेने सर्व आत्मघातकी शक्तींपासून अर्जुनाचा बचाव झाला होता. म्हणून अर्जुनाने हनुमंताला नमस्कार केला आणि हनुमंताने श्रीकृष्णाला नमस्कार करत म्हटले, 'भगवंता जिथे जिथे तुझे नामस्मरण, भजन, कीर्तन, सत्संग सुरू असेल तिथे तिथे उपस्थित राहण्याची मला संधी दे!' श्रीकृष्णाने तथास्तु म्हटले आणि मारुती रायाला तो कायमस्वरूपी आशीर्वाद मिळाला. म्हणून आजही कथा कीर्तनात एक रिकामा पाट मांडला जातो. त्यावर हनुमंत येऊन बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे!

टॅग्स :Mahabharatमहाभारत