शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

महाभारताच्या युद्धात हनुमंताने श्रीकृष्णाला कोणती अट घातली होती माहितीय? वाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 11, 2023 07:00 IST

रामायणातले हनुमान महाभारतात कसे आले, कोणाच्या सांगण्यावरून आले आणि कोणत्या अटीवर थांबले, जाणून घ्या!

महाभारतात युद्धासाठी कुरुक्षेत्रावर सर्व तयारीनिशी पोहोचलेल्या अर्जुनाने ऐन वेळेस कच खाल्ली. आपलेच आप्तजन आपल्या विरुद्ध लढायला उभे पाहून भोवळ आली. हे युद्ध मी लढणार नाही असे तो म्हणाला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जो उपदेश केला, तो भक्त भगवंताचा संवाद म्हणजे भगवद्गीता. मात्र ती ऐकणारा अर्जुन एकटा तिथे उपस्थित नव्हता, तिथे आणखी दोन श्रोते होते, एक म्हणजे रथावर बसलेले हनुमान आणि दुसरे आकाशातून हा प्रसंग पाहणारे सूर्यदेव. सूर्यदेवांचा आकाशातला मुक्काम समजू शकतो, पण रामायण काळातले हनुमान महाभारातात कसे अवतीर्ण झाले, असा अनेकांना प्रश्न पडतो. ते चिरंजीवी आहेत, तरी महाभारताच्या युद्धाशी त्यांचा काय संबंध, हे अनेकांना माहीत नसते, त्याचे हे उत्तर. 

महाभारत सुरू होण्याआधी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, की तुझ्या रथाचे सारथ्य मी करणार असलो तरी रथावर जी अस्त्र, शस्त्र आदळतील, त्यापासून संरक्षणासाठी रामदूत हनुमंताला शरण जा आणि त्यांना रथाचे रक्षण करण्याची विनंती कर. अर्जुनाने तसे केले, तेव्हा हनुमंत श्रीकृष्णांना म्हणाले जिथे भजन, पूजन, सत्संग असतो तिथेच मी थांबतो. जिथे राम नाही तिथे माझे काम नाही. श्रीकृष्ण म्हणाले, तुझी अट मी मान्य करतो. त्या वचनपूर्तीसाठी श्रीकृष्णाने हनुमानाला गीतामृतातून सत्संग घडवून आणला. म्हणून हनुमान रथावर थांबले. जेव्हा युद्ध पूर्ण झाले, तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला उतरण्याची विनंती केली, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले आधी तू उतर....

अर्जुन रथातून उतरला, मग श्रीकृष्ण उतरले आणि नंतर हनुमंतांनी रथावरून खाली उडी मारताच रथाचा स्फोट झाला आणि तो क्षणात भस्मसात झाला. हनुमंताच्या कृपेने सर्व आत्मघातकी शक्तींपासून अर्जुनाचा बचाव झाला होता. म्हणून अर्जुनाने हनुमंताला नमस्कार केला आणि हनुमंताने श्रीकृष्णाला नमस्कार करत म्हटले, 'भगवंता जिथे जिथे तुझे नामस्मरण, भजन, कीर्तन, सत्संग सुरू असेल तिथे तिथे उपस्थित राहण्याची मला संधी दे!' श्रीकृष्णाने तथास्तु म्हटले आणि मारुती रायाला तो कायमस्वरूपी आशीर्वाद मिळाला. म्हणून आजही कथा कीर्तनात एक रिकामा पाट मांडला जातो. त्यावर हनुमंत येऊन बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे!

टॅग्स :Mahabharatमहाभारत