शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

महाभारताच्या युद्धात हनुमंताने श्रीकृष्णाला कोणती अट घातली होती माहितीय? वाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 11, 2023 07:00 IST

रामायणातले हनुमान महाभारतात कसे आले, कोणाच्या सांगण्यावरून आले आणि कोणत्या अटीवर थांबले, जाणून घ्या!

महाभारतात युद्धासाठी कुरुक्षेत्रावर सर्व तयारीनिशी पोहोचलेल्या अर्जुनाने ऐन वेळेस कच खाल्ली. आपलेच आप्तजन आपल्या विरुद्ध लढायला उभे पाहून भोवळ आली. हे युद्ध मी लढणार नाही असे तो म्हणाला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जो उपदेश केला, तो भक्त भगवंताचा संवाद म्हणजे भगवद्गीता. मात्र ती ऐकणारा अर्जुन एकटा तिथे उपस्थित नव्हता, तिथे आणखी दोन श्रोते होते, एक म्हणजे रथावर बसलेले हनुमान आणि दुसरे आकाशातून हा प्रसंग पाहणारे सूर्यदेव. सूर्यदेवांचा आकाशातला मुक्काम समजू शकतो, पण रामायण काळातले हनुमान महाभारातात कसे अवतीर्ण झाले, असा अनेकांना प्रश्न पडतो. ते चिरंजीवी आहेत, तरी महाभारताच्या युद्धाशी त्यांचा काय संबंध, हे अनेकांना माहीत नसते, त्याचे हे उत्तर. 

महाभारत सुरू होण्याआधी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, की तुझ्या रथाचे सारथ्य मी करणार असलो तरी रथावर जी अस्त्र, शस्त्र आदळतील, त्यापासून संरक्षणासाठी रामदूत हनुमंताला शरण जा आणि त्यांना रथाचे रक्षण करण्याची विनंती कर. अर्जुनाने तसे केले, तेव्हा हनुमंत श्रीकृष्णांना म्हणाले जिथे भजन, पूजन, सत्संग असतो तिथेच मी थांबतो. जिथे राम नाही तिथे माझे काम नाही. श्रीकृष्ण म्हणाले, तुझी अट मी मान्य करतो. त्या वचनपूर्तीसाठी श्रीकृष्णाने हनुमानाला गीतामृतातून सत्संग घडवून आणला. म्हणून हनुमान रथावर थांबले. जेव्हा युद्ध पूर्ण झाले, तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला उतरण्याची विनंती केली, तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले आधी तू उतर....

अर्जुन रथातून उतरला, मग श्रीकृष्ण उतरले आणि नंतर हनुमंतांनी रथावरून खाली उडी मारताच रथाचा स्फोट झाला आणि तो क्षणात भस्मसात झाला. हनुमंताच्या कृपेने सर्व आत्मघातकी शक्तींपासून अर्जुनाचा बचाव झाला होता. म्हणून अर्जुनाने हनुमंताला नमस्कार केला आणि हनुमंताने श्रीकृष्णाला नमस्कार करत म्हटले, 'भगवंता जिथे जिथे तुझे नामस्मरण, भजन, कीर्तन, सत्संग सुरू असेल तिथे तिथे उपस्थित राहण्याची मला संधी दे!' श्रीकृष्णाने तथास्तु म्हटले आणि मारुती रायाला तो कायमस्वरूपी आशीर्वाद मिळाला. म्हणून आजही कथा कीर्तनात एक रिकामा पाट मांडला जातो. त्यावर हनुमंत येऊन बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे!

टॅग्स :Mahabharatमहाभारत