शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

अतिहव्यासापायी तुमची त्रिशंकूसारखी अधांतरी अवस्था झाली आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 18:30 IST

त्रिशंकूसारखी गत म्हणजे अधली मधली गत. त्रिशंकूची काय स्थिती झाली, हे समजण्याकरता त्रिशंकूची गोष्ट जाणून घेऊया.

अनेकदा आपल्याला एकाच वेळी सगळ्या गोष्टी मिळाव्यात असा हव्यास सुटतो. याला एकावेळी अनेक दगडांवर पाय ठेवणे असेही म्हणतात. मात्र, त्याचा परिणाम असा होतो, की एकही गोष्ट आपल्याला नीट साध्य होत नाही. त्या अवस्थेला त्रिशंकू अवस्था होणे म्हणतात. धड इकडे ना तिकडे असा प्रकार झाला, एखाद्याला कुठेच नीट आश्रय नाही मिळाला, म्हणजे त्याची त्रिशंकूसारखी गत झाली, असे आपण म्हणतो. त्रिशंकूसारखी गत म्हणजे अधली मधली गत. त्रिशंकूची काय स्थिती झाली, हे समजण्याकरता त्रिशंकूची गोष्ट जाणून घेऊया.

इश्वाकू वंशात निबंधन नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या मुलाचे नाव होते सत्यव्रत. राजपुत्र सत्यव्रत उनाड निघाला. त्याने अनीतीने कामांध होऊन राज्यातील स्त्रियांवर अत्याचार करायला सुरुवात केली. तेव्हा निबंधन राजाने त्याला नगराबाहेर घालवून दिले. पुढे मोठा दुष्काळ पडला, तेव्हा पोट भरण्यासाठी सत्यव्रताने वसिष्ठ मुनीची गाय ठार मारली. 

हेही वाचा :संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!

अशा रीतीने वडिलांचा राग अनीतीचे आचरण आणि वसिष्ठांच्या गायीचा वध, अशा तीन शंकूची टोचणी त्याला लागली, म्हणून त्याचे नाव त्रिशंकू पडले. पुढे त्रिशंकू सुधारला. निबंधन राजालाही त्याची दया आली आणि निबंधनानंतर त्रिशंकू राजा झाला. त्याला मानवी देहाने स्वर्गात जाण्याची इच्छा झाली. त्यासाठी यज्ञ करावा असा विचार त्याच्या मनात डोकावला. त्याने आपली इच्छा वसिष्ठांना बोलून दाखवली. त्यावर गुरु वसिष्ठ म्हणाले, `राजा, अनेक यज्ञ केल्यावर मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो. जिवंतपणी स्वर्गात जाण्याचे बेत मनातून काढून टाक.'

त्रिशंकूला वसिष्ठांचा राग आला. त्याने लगेच गुरु विश्वामित्रांना बोलावून घेतले. विश्वामित्रांना तपश्चर्येचा गर्व होताच. त्यांनी त्रिशंकूच्या इच्छापूर्तीसाठी यज्ञ केला. तेव्हा त्रिशंवूâ खरोखरच अधांतरी उडत जाऊ लागला. स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला. परंतु, कोणीतरी तिथे दबक्या आवाजात म्हणाले, `अशा पापी माणसासाठी स्वर्गाची दारे उघडणारी नाहीत.' 

इंद्रदेवाला त्रिशंकूची घुसखोरी कळताच, तो त्रिशंवूâला खाली रेटू लागला. इंद्र स्वर्गात येऊ देईना, विश्वामित्र पृथ्वीवर येऊ देईना. त्यामुळे त्रिशंकू अंतराळात लोंबत राहिला. ना स्वर्ग ना पृथ्वी, अशी त्याची अवस्था झाली. तेव्हा विश्वामित्रांनी प्रति सृष्टी निर्माण केली अणि देवेंद्राने तडजोड केली. त्रिशंकूला दिव्य रूप देऊन त्याने स्वर्गात प्रवेश दिला. 

राजमातेचा निरोप घेऊन दूत आल्यावर, राजधानीत परत जावे, की कण्वाच्या आश्रमाचे रक्षण करावे, की शकुंतलेचा सहवास मिळेल म्हणून वनात राहावे. याविषयी निर्णय न ठरून दुष्यंताने विदुषकाला सल्ला विचारला. त्यावर कालिदासाने विदूषकाच्या तोंडी वाक्य घातले आहे, 'त्रिशंकु: इव अंतरले तिष्ठ' अशा रीतीने त्रिशंकूला नाटकात आणि वाकप्रचारात मात्र अढळ स्थान मिळाले. 

हेही वाचा : खरा गुरु कसा ओळखावा- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज