शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

जीवनात चांगले कर्म करा, फळ चांगलेच मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 17:53 IST

पाप केल्यावर भोग हे भोगावेच लागतात. यासाठी सर्वांनी चांगले कर्म करणे गरजेचे आहे. कर्म चांगले केले तर त्याचे फळही चांगलेच मिळेल. पाप करु नका. चूक करु नका. आई, वडील गुरूंची सेवा करा. पाप केल्यावर स्वत:ला भोग प्राप्त होतातच. 

अध्यात्म

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥४-७॥

अध्याय क्रमांक-४ मध्ये श्लोक ७ वा आहे. या श्लोकाव्दारे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पृथ्वीवर अधर्म होतो. त्यावेळी भगवान (देव) अवतार घेतात. हे अर्जुना, जेंव्हा धर्माला क्षीणता येते व अधर्माचा जिकडे तिकडे प्र्नादुर्भाव होतो, तेंव्हा तेंव्हा मी स्वत:ला उत्पन्न करतो. मी मायेने शरीर धारण करतो. 

याचे दोन प्रकार पडतात. १) माया-प्रकृती २)ब्रम्हा-ज्या गोष्टीला आकार नाही. मायापासून दूर असते याला ब्रम्हा म्हणतात. 

जेंव्हा जेंव्हा धर्मावर संकटे येते, त्यावेळी स्वत: देव पृथ्वीवर अवतार घेतात.  उदा-प्रल्हाद व हिरण्यकश्यपू.

हिरण्यकश्यपू याने पृथ्वीवर हाहाकार करुन खूप अन्याय, पाप केले. तो देवाला मानत नसे. स्वत:लाच देव समजत असे. पण काही दिवसांनी हिरण्यकश्यपू व कयाहू याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला येतो. त्याचा सांभाळ करण्यासाठी भगवान अवतार घेतात. नरसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा नाश करतात. 

हिरण्यकश्यपूने तप करुन भगवान शंकराकडून वर प्राप्त केला होता. मला मरण घरात नको, दारात नको. जमिनीवर नको. सूर्य उगवल्यावर नको. सूर्य मावळल्यावर नको. शस्त्राने नको. यावेळी भगवान शंकरांनी तथास्थू म्हटले. यानंतर विष्णूला अवतार घ्यावा लागला. नरसिंह रुपाने  हिरण्यकश्यपूला उंबºयावर धरला. त्याचे नखाने पोट फाडले. अशा रितीने दुष्टाचा नाश करुन भक्तांचा सांभाळ केला. 

साधूंचे रक्षण करण्यासाठी दुष्टाचा समूळ नाश करण्यासाठी व धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार करतो.

अहंकार-मानवी जीवनामध्ये अहंकार येऊ देऊ नये. देवाला अहंकार जमत नाही. सर्व देवच करतो, असे समजावे. 

एक राजा होता. एक प्रधान होता. तेव्हा राजा म्हणतो हे सर्व कोण करतो. तेव्हा प्रधान म्हणतो, देव करतो. राजा म्हटला, प्रधान मला ते कसे सांगा? तेव्हा प्रधान म्हणतो, राजा हे सांगण्यासाठी तुला सिंहासन सोडून खाली बसावे लागेल. तुझे वस्त्रे मला घालण्यासाठी द्यावे लागतील. तेव्हा राजा होय म्हणाला. त्याने प्रधानाला वस्त्रे दिली. यानंतर प्रधान सिंहासनावर बसला. राजाला म्हणाला, आता मी राजा आहे. तुम्ही प्रधान. त्यावेळी प्रधान झालेला राजा म्हणाला, देव हेच करतो. वरच्याला खाली आणि खालच्याला वर घेतो. 

याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की, पाप केल्यावर भोग हे भोगावेच लागतात. यासाठी सर्वांनी चांगले कर्म करणे गरजेचे आहे. कर्म चांगले केले तर त्याचे फळही चांगलेच मिळेल. पाप करु नका. चूक करु नका. आई, वडील गुरूंची सेवा करा. पाप केल्यावर स्वत:ला भोग प्राप्त होतातच. 

याचा सांगण्याचा उद्देश हाच आहे की, पाप करु नका. कोणावर अन्याय करु नका. चूका करु नका. चुकीचे कर्म केले तर त्याचे भोग स्वत:लाच भोगावे लागतात. अर्धमाने वागल्यानंतर देव स्वत: शिक्षा करतो. भक्तांचे रक्षण करतो.

-गोरख महाराज शिंदे,  तळवडी दत्त मंदिर प्रमुख.९८५०९५६८२७.