शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Diwali 2024: दिवाळीत कंदील उंच टांगण्यामागे असलेले कारण वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 07:00 IST

Diwali 2024: २८ ऑक्टोबर रोजी दिवाळी सुरू झाली, घर दिव्यांनी आणि आकाश कंदिलाने सजले असेल, पण तो उंचावर लावण्या मागचे कारणही आहे इंटरेस्टिंग!

दिवाळीत आपण रोषणाई करताना जराही हात आखडता घेत नाही. कारण, हा सणच दीपोत्सव म्हणून ओळखला जातो. मात्र, ही रोषणाई करताना काही शास्त्रीय संकेत, लोकसमजूती प्रचलित आहेत. त्यांचा मागोवा घेऊया.

देवापुढे लावायच्या दिव्यात तेल किंवा तूप याव्यतिरिक्त अन्य कोणतेही ज्वलनद्रव वापरू नये, असे अग्नीपुराणातील आदिकल्प पुराणात सांगितले आहे. देवघरात जी समई असते, ती देवतास्वरूप आहे, म्हणून नित्यनेमाने पूजारंभी व दीपोत्सवाच्या वेळी तिची पूजा करण्याचा कुळाचार आहे. 

दीपावली हा दिव्यांनी रोषणाई करण्याचा सण. त्यात आता लायटींगची भर पडली आहे. तरीदेखील पणती, दिवे, आकाशकंदील यांचे स्थान टिकून आहे. कारण ते दिवाळीची शोभा नव्हे तर उत्सवमूर्ती आहेत. दिवाळीत कितीही रोषणाई केली तरी कंदील हवाच. तोही स्वहस्ते बनवलेला असेल तर आनंदी आनंदच! तो खिडकीत, दारात किंवा अंगणात उंचावर लावला जातो. पूर्वी विद्युत सुविधा नसताना हा उंचावर टांगलेला कंदीलही रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाटसरूंसाठी मनुष्यवस्तीची निषाणी असे. पुढे विद्युतनिर्मिती झाली आणि कंदीलाची ओळक दिवाळीपुरती मर्यादित राहिली. तरीदेखील दिवाळीत त्याचे महत्त्व अद्वितीय आहेच!

आपला कंदील उंचावर लावावा आणि तो सर्वांनी पहावा, हा आपला उद्देश असतोच. परंतु, अशीही एक लोकसमजूत आहे, की, दीपावलीच्या वेळी आकाशात झेप घेऊन उंच लटकणारा आकाशकंदील पितरांना प्रकाश देतो. तसेही धनत्रयोदशीच्या सायंकाळी दक्षिण दिशेला आपण दीवा लावतो. तोदेखील पितरांच्या सद्गतीचा मार्ग उजळून निघावा म्हणूनच! त्यामुळे ही समजूत त्यालाच पुरक असू शकते!

या व्यतिरिक्त दिवाळीत दिव्यांना विशेष महत्त्व असते. दिवा आपण प्रत्येक शुभकार्यात वापरतोच! लग्नकार्यात रोवळीत एक लामणदिवा ठेवतात. त्याला शकुनदिवा म्हणतात. देवपूजेच्या वेळी किंवा कोणत्याही मांगलिक कार्यात साक्षी म्हणून एक दिवा अखंडपणे तेवत ठेवलेला असतो. जसा की आपण नवरात्रीत ठेवतो. त्याला नंदादीप म्हणतात. दिवाळीत घर, अंगण, उंबरठा नव्हे तर सबंध परिसर छोट्या, मोठ्या दिव्यांनी लखाकून निघतो. अशा दीपदर्शनाने जीवनात मांगल्य निर्माण होऊन मन उजळून जाते. व तेच मांगल्या पुढील वर्षभर मनात तेवत राहते...!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Diwali Ritualsदिवाळीतील पूजा विधी