शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

Diwali 2021 : नरकचतुर्दशीला दीपदान केल्यास नरकवास भोगावा लागत नाही; जाणून घ्या दीपदानाचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:10 IST

Diwali 2021 : दीपदान हे पुण्यप्रद कर्म आहे. कार्तिक मासात भगवान विष्णूंच्या समोर दिवा लावल्यास तुलादानाची, सर्व तीर्थात अवगाहन केल्याची, पुण्यकर्माची फलप्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो.

दीप हा षोडशोपचार पूजेतला एक उपचार आहे. हा उपचार विविध रूपांनी केला जातो. विष्णू किंवा विठ्ठलाच्या मंदिरात रोज रात्री नेमाने शेजारती आणि प्रभातकाली काकडारती करण्याची पद्धत आहे. काशी, प्रयाग, गया इ. क्षेत्री यात्रेकरू संध्याकाळी गंगेच्या घाटावर जाऊन एका द्रोणात फुले आणि फुलवात ठेवून ती वात प्रज्वलित करून तो द्रोण नदीच्या पात्रात सोडतात. हे गंगामाईला उपचार समर्पण असते. दिवाळीत त्याचे विशेष महत्त्व आहे. कसे ते समजून घेऊ.

Diwali 2021 : वात्सायनाच्या कामसूत्रात 'रांगोळी' या कलाप्रकाराला चौसष्ट कलांमध्ये मान देत म्हटले आहे की...

दीपदान हे पुण्यप्रद कर्म आहे. कार्तिक मासात भगवान विष्णूंच्या समोर दिवा लावल्यास तुलादानाची, सर्व तीर्थात अवगाहन केल्याची, पुण्यकर्माची फलप्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो. नरकचतुर्दशीला दीपदान केल्यास नरकवास भोगावा लागत नाही अशी धारणा आहे. 

दीप हा अग्नीचे व तेजाचे रूप असून वैदिक काळात हा अग्नी यज्ञकुंडाच्या माध्यमानेच आपले अस्तित्व टिकुन राहात असे. तर दीपाच्या रूपाने तो मानवाला प्रकाश देऊ लागला. दीपज्योत हे ज्ञानाचे आणि बुद्धीचे प्रतीक मानलेले आहे. `तमसो मा ज्योतिर्गमय!' म्हणजे अंधारातून मला तेजाकडे ने अशी उपनिषदात प्रार्थना आहे. 

प्रकाशाचे साधन या दृष्टीने दिव्याला असाधारण महत्त्व आहे. म्हणूनच धार्मिक कुळाचारातही दिव्याचे माहात्म्य प्रस्थापित झाले आहे. आपल्या मोठमोठ्या देवळातून 'दीपमाळ' नावाचा एक सुंदर जाडजूड खांब व त्यावर दिवे ठेवायला जागा असे दगडी बांधकाम हमखास असतेच. 

कोणत्याही उत्तम कार्याचा प्रारंभ आजकाल अगदी अगत्याने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून होतो. तो या कार्याचा दीप. म्हणजे विचार प्रकाश हळूहळू विकसित होऊन सर्वांपर्यंत पोहोचावा व या कार्यास त्यांचाही हातभार व सहकार्य लाभावे याच हेतूने केला जातो. 

Diwali 2021 : मालिकांमध्ये दाखवतात तेवढे सासू सुनेचे नाते वाईट नसतेच मुळी; वाचा वसुबारसेची सासू सुनेची कथा!

सासूरवाशिणीने आपल्या माहेरी दीपदान व दीपपूजन करावयाची प्रथा आहे. माहेरून आपल्याला सतत मायेचा, प्रेमाचा प्रकाश मिळत राहावा, माहेरी सुख नांदावे ही भावना या प्रथेमागे होती. त्या दीपाच्या तेलवातीचा खर्च ही माहेरवाशीण देत असे. तुपाचा दीप हा प्रदूषणनाशक समजला जातो.

असे हे दिव्याचे महत्त्व जाणून घेत आपणही अंधारात आशेचा दीप प्रज्वलित करूया आणि मांगल्य, तेज आणि संस्कृतीचे पूजन करूया. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021