शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2021 : नरकचतुर्दशीला दीपदान केल्यास नरकवास भोगावा लागत नाही; जाणून घ्या दीपदानाचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:10 IST

Diwali 2021 : दीपदान हे पुण्यप्रद कर्म आहे. कार्तिक मासात भगवान विष्णूंच्या समोर दिवा लावल्यास तुलादानाची, सर्व तीर्थात अवगाहन केल्याची, पुण्यकर्माची फलप्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो.

दीप हा षोडशोपचार पूजेतला एक उपचार आहे. हा उपचार विविध रूपांनी केला जातो. विष्णू किंवा विठ्ठलाच्या मंदिरात रोज रात्री नेमाने शेजारती आणि प्रभातकाली काकडारती करण्याची पद्धत आहे. काशी, प्रयाग, गया इ. क्षेत्री यात्रेकरू संध्याकाळी गंगेच्या घाटावर जाऊन एका द्रोणात फुले आणि फुलवात ठेवून ती वात प्रज्वलित करून तो द्रोण नदीच्या पात्रात सोडतात. हे गंगामाईला उपचार समर्पण असते. दिवाळीत त्याचे विशेष महत्त्व आहे. कसे ते समजून घेऊ.

Diwali 2021 : वात्सायनाच्या कामसूत्रात 'रांगोळी' या कलाप्रकाराला चौसष्ट कलांमध्ये मान देत म्हटले आहे की...

दीपदान हे पुण्यप्रद कर्म आहे. कार्तिक मासात भगवान विष्णूंच्या समोर दिवा लावल्यास तुलादानाची, सर्व तीर्थात अवगाहन केल्याची, पुण्यकर्माची फलप्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो. नरकचतुर्दशीला दीपदान केल्यास नरकवास भोगावा लागत नाही अशी धारणा आहे. 

दीप हा अग्नीचे व तेजाचे रूप असून वैदिक काळात हा अग्नी यज्ञकुंडाच्या माध्यमानेच आपले अस्तित्व टिकुन राहात असे. तर दीपाच्या रूपाने तो मानवाला प्रकाश देऊ लागला. दीपज्योत हे ज्ञानाचे आणि बुद्धीचे प्रतीक मानलेले आहे. `तमसो मा ज्योतिर्गमय!' म्हणजे अंधारातून मला तेजाकडे ने अशी उपनिषदात प्रार्थना आहे. 

प्रकाशाचे साधन या दृष्टीने दिव्याला असाधारण महत्त्व आहे. म्हणूनच धार्मिक कुळाचारातही दिव्याचे माहात्म्य प्रस्थापित झाले आहे. आपल्या मोठमोठ्या देवळातून 'दीपमाळ' नावाचा एक सुंदर जाडजूड खांब व त्यावर दिवे ठेवायला जागा असे दगडी बांधकाम हमखास असतेच. 

कोणत्याही उत्तम कार्याचा प्रारंभ आजकाल अगदी अगत्याने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून होतो. तो या कार्याचा दीप. म्हणजे विचार प्रकाश हळूहळू विकसित होऊन सर्वांपर्यंत पोहोचावा व या कार्यास त्यांचाही हातभार व सहकार्य लाभावे याच हेतूने केला जातो. 

Diwali 2021 : मालिकांमध्ये दाखवतात तेवढे सासू सुनेचे नाते वाईट नसतेच मुळी; वाचा वसुबारसेची सासू सुनेची कथा!

सासूरवाशिणीने आपल्या माहेरी दीपदान व दीपपूजन करावयाची प्रथा आहे. माहेरून आपल्याला सतत मायेचा, प्रेमाचा प्रकाश मिळत राहावा, माहेरी सुख नांदावे ही भावना या प्रथेमागे होती. त्या दीपाच्या तेलवातीचा खर्च ही माहेरवाशीण देत असे. तुपाचा दीप हा प्रदूषणनाशक समजला जातो.

असे हे दिव्याचे महत्त्व जाणून घेत आपणही अंधारात आशेचा दीप प्रज्वलित करूया आणि मांगल्य, तेज आणि संस्कृतीचे पूजन करूया. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021