शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

Diwali 2021 : नरकचतुर्दशीला दीपदान केल्यास नरकवास भोगावा लागत नाही; जाणून घ्या दीपदानाचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:10 IST

Diwali 2021 : दीपदान हे पुण्यप्रद कर्म आहे. कार्तिक मासात भगवान विष्णूंच्या समोर दिवा लावल्यास तुलादानाची, सर्व तीर्थात अवगाहन केल्याची, पुण्यकर्माची फलप्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो.

दीप हा षोडशोपचार पूजेतला एक उपचार आहे. हा उपचार विविध रूपांनी केला जातो. विष्णू किंवा विठ्ठलाच्या मंदिरात रोज रात्री नेमाने शेजारती आणि प्रभातकाली काकडारती करण्याची पद्धत आहे. काशी, प्रयाग, गया इ. क्षेत्री यात्रेकरू संध्याकाळी गंगेच्या घाटावर जाऊन एका द्रोणात फुले आणि फुलवात ठेवून ती वात प्रज्वलित करून तो द्रोण नदीच्या पात्रात सोडतात. हे गंगामाईला उपचार समर्पण असते. दिवाळीत त्याचे विशेष महत्त्व आहे. कसे ते समजून घेऊ.

Diwali 2021 : वात्सायनाच्या कामसूत्रात 'रांगोळी' या कलाप्रकाराला चौसष्ट कलांमध्ये मान देत म्हटले आहे की...

दीपदान हे पुण्यप्रद कर्म आहे. कार्तिक मासात भगवान विष्णूंच्या समोर दिवा लावल्यास तुलादानाची, सर्व तीर्थात अवगाहन केल्याची, पुण्यकर्माची फलप्राप्ती होते आणि पितरांचा उद्धार होतो. नरकचतुर्दशीला दीपदान केल्यास नरकवास भोगावा लागत नाही अशी धारणा आहे. 

दीप हा अग्नीचे व तेजाचे रूप असून वैदिक काळात हा अग्नी यज्ञकुंडाच्या माध्यमानेच आपले अस्तित्व टिकुन राहात असे. तर दीपाच्या रूपाने तो मानवाला प्रकाश देऊ लागला. दीपज्योत हे ज्ञानाचे आणि बुद्धीचे प्रतीक मानलेले आहे. `तमसो मा ज्योतिर्गमय!' म्हणजे अंधारातून मला तेजाकडे ने अशी उपनिषदात प्रार्थना आहे. 

प्रकाशाचे साधन या दृष्टीने दिव्याला असाधारण महत्त्व आहे. म्हणूनच धार्मिक कुळाचारातही दिव्याचे माहात्म्य प्रस्थापित झाले आहे. आपल्या मोठमोठ्या देवळातून 'दीपमाळ' नावाचा एक सुंदर जाडजूड खांब व त्यावर दिवे ठेवायला जागा असे दगडी बांधकाम हमखास असतेच. 

कोणत्याही उत्तम कार्याचा प्रारंभ आजकाल अगदी अगत्याने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वल करून होतो. तो या कार्याचा दीप. म्हणजे विचार प्रकाश हळूहळू विकसित होऊन सर्वांपर्यंत पोहोचावा व या कार्यास त्यांचाही हातभार व सहकार्य लाभावे याच हेतूने केला जातो. 

Diwali 2021 : मालिकांमध्ये दाखवतात तेवढे सासू सुनेचे नाते वाईट नसतेच मुळी; वाचा वसुबारसेची सासू सुनेची कथा!

सासूरवाशिणीने आपल्या माहेरी दीपदान व दीपपूजन करावयाची प्रथा आहे. माहेरून आपल्याला सतत मायेचा, प्रेमाचा प्रकाश मिळत राहावा, माहेरी सुख नांदावे ही भावना या प्रथेमागे होती. त्या दीपाच्या तेलवातीचा खर्च ही माहेरवाशीण देत असे. तुपाचा दीप हा प्रदूषणनाशक समजला जातो.

असे हे दिव्याचे महत्त्व जाणून घेत आपणही अंधारात आशेचा दीप प्रज्वलित करूया आणि मांगल्य, तेज आणि संस्कृतीचे पूजन करूया. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021