शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण यशस्वी लोक त्यावर मात कसे करतात ते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 11:57 IST

दुसऱ्यांच्या सुखाकडे बघून असूया करण्यापेक्षा ते त्यांच्या दुःखावर, संकटावर मात कसे करतात ते जाणून घ्या.

समाजात अनेक व्यक्ती आपल्याला नेहमी हसतमुख दिसतात. त्यांना पाहता आपल्याला प्रश्न पडतो की या लोकांच्या आयुष्यात समस्या आहेत की नाही? त्यांच्याकडे पाहून आपल्याला असूया वाटते. मात्र समस्या नाहीत असा एकही मनुष्य नाही. समाजाचे हे अवलोकन करूनच समर्थ रामदास स्वामी म्हणाले, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे!' याचाच अर्थ समस्या त्यांनाही असतातच, तरी ते खुश कसे राहतात याचे उत्तर देत आहेत अध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू!

प्रभुजी सांगतात, 'या जगात असे एकही कुलूप नाही ज्याची चावी नाही. ज्यावेळी कुलूप बनवले जाते त्यावेळी त्याची चावीसुद्धा बनवली जातेच! हे कुलूप म्हणजेच आपल्या समस्या. या समस्यांवर मार्ग असतोच. तो शोधणाऱ्यांना मिळतो. तो शोधायचा कसा ते समजून घ्या.

या जगात प्रत्येकाला समस्या आहेत. मात्र काही जण फक्त समस्यांचा विचार करत बसतात तर काही जण समस्यांतून निघण्याचा मार्ग शोधण्यावर भर देतात. हिंदीत सांगायचे तर समस्यांच्या बाबतीत 'भागलो' म्हणजे पळून जा नाहीतर 'भाग लो' म्हणजे भाग घ्या! समस्येपासून पळून जाणं हा काही उपाय ठरत नाही. आपण जेवढे प्रश्नांपासून दूर पळू तेवढे प्रश्न आपल्या जास्त मागे लागतात. त्यामुळे हुशारी यातच आहे की त्या समस्यांचा सामना करा. समस्यांपासून दूर पळून नाही तर समस्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग शोधा!

मात्र अनेकदा समस्यांतून मार्गही मिळेनासा होतो, अशा वेळी हुशार लोक काय करतात? तर समस्यांपासून आपले लक्ष विचलित करतात. अर्थात दुसऱ्या विषयांत आपले मन गुंतवतात. तसे केल्याने समस्यांचे ओझे वाटत नाही तर समस्यांशी लढण्याचे बळ मिळते. अनेक प्रश्न असे असतात जे पटकन सुटत नाहीत. अशा वेळी त्याला धीराने सामोरे जाणे हा एकमेव पर्याय उरतो. उदा. एखाद्या कुटुंबात दिव्यांग, मतिमंद, आजारी बाळ जन्माला आले, तर बाळ झालं या सुखापेक्षा पालकांना बाळाच्या व्याधींची चिंता सतावते. अशा वेळी बाळाला सोडून देणे हा पर्याय नसतो, तेव्हा पालक मानसिक दृष्ट्या स्वतःला सक्षम बनवतात आणि आपल्या पोटच्या गोळ्याचे सर्वतोपरी पालन पोषण करतात. हे मानसिक बळ, सामना करण्याची वृत्ती म्हणजेच कुलुपाची चावी आहे हे लक्षात ठेवा.

प्रत्येकाजवळ समस्यांतून बाहेर निघण्याची चावी आहे. स्वतः जवळ चाचपून बघा. तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी