शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

एक बेट निर्जीव होण्याला गिधाडांचा ऐतखाऊपणा कारणीभूत ठरला की मनमानीपणा? वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 13:07 IST

ज्येष्ठांचे सल्ले ऐकावेत, कारण ते अनुभवाचे बोल असतात. त्या विचारांवर वेळीच विचार केला नाही तर आपलीही अवस्था या गिधाडांसारखीच होणार!

गिधाडांची प्रजाती आता दुर्मिळ होत चालली आहे. शहरी भागात तर त्यांचे दर्शन सहसा होत नाहीच. मात्र एकदा जंगलात राहणारा गिधाडांचा एक समूह जंगलतोड होऊ लागल्याने उडत उडत एका निर्मनुष्य बेटावर पोहोचला. ते बेट निर्मनुष्य असले, तरी सागरी जीव, वन्य जीव तिथे मुबलक प्रमाणात होते. गिधाडांनी विचार केला काही काळ इथेच मुक्काम करू. 

जेवणाची, राहण्याची उत्तम सोय झाल्याने गिधाडं त्या वातावरणाला सरावली. त्यांच्यातल्या तरुण गिधाडांनी तर आमरण इथेच राहायचे असा संकल्प केला. तेव्हा बुजुर्ग गिधाड म्हणाले, तशी चूक कदापिही करू नका. आज इथे आयते अन्न मिळत आहे, भविष्यात मनुष्याने इथेही अतिक्रमण केले तर कुठे जाल?'त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ऐतखाऊ तरुण गिधाड जनावरांच्या मांसाचे लचके तोडत होते. 

काही काळाने बुजुर्ग गिधाडाने मुक्काम हलवायचा ठरवला. त्याच्याबरोबर दोन चार जुने साथीदार आले. त्यांना आपल्या प्रजातीची काळजी वाटू लागली. आपण आयुष्यभर कष्ट करून, अन्न शोधून आपली उपजीविका भागवली, पण या तरुणांना सगळे आयते मिळत राहिले तर यांना कठीण प्रसंगाची जाणीव कशी होणार? ते स्वत्व गमावून बसतील आणि सुस्त होऊन निकामी होतील. परंतु समजूत काढूनही कोणी त्यांची साथ न दिल्याने उरलेली गिधाडे बेटावर राहिली, बाकीची दुसऱ्या जंगलात निघून गेली.

काही काळाने आपल्या नातलगांच्या भेटीने बुजुर्ग गिधाडे बेटावर परत आली. तिथे पाहतो तर काय आश्चर्य? जवळपास सगळी गिधाडे मरणासन्न अवस्थेत पडली होती. त्यांची विचारपूस केली असता, जीर्ण आवाजात तो तरुण गिधाड म्हणाला, 'आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमचे ऐकले नाही त्याची शिक्षा आज भोगत आहोत. तुम्ही सांगीतल्या नुसार एकदिवस एक जहाज या बेटावर आले आणि त्या जहाजातून बिबटे सोडण्यात आले. त्यांनी इथले सगळे जीव खाऊन पोटं भरली आणि आम्ही उडण्याची क्षमता गमावून बसलो आहोत, प्रतिकार करण्याची आमच्यात ताकद राहिलेली नाही हे ओळखून त्यांनी आमच्यावरही वार केला.'

बुजुर्ग गिधाडाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षणाच्या लोभापायी ही गिधाडं ऐन तारुण्यात आपला आनंद गमावून बसली. आपली प्रजाती नष्ट झाली. ऐतखाऊपणा यांना नडला! आयुष्यात केवळ सुख उपभोगत राहिलात तर दुःखाची झळ सहन करायची ताकद राहणार नाही. म्हणून प्रत्येक जिवाने हर तऱ्हेच्या परिस्थितीत न डगमगडता परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. तसेच एकाच ठिकाणी चिकटून न बसता नवनवे अनुभव घेत आयुष्य समृद्ध केले पाहिजे.