शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अतिथी धर्माचे पालन करताना 'या' गोष्टींची अवश्य काळजी घ्या, असे धर्मशास्त्र सांगते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:58 IST

हे साधे सोपे नियम पाळले तर कोणीही म्हणणार नाही, 'अतिथी तुम कब जाओगे!'

'अतिथी देवो भव' अर्थात अतिथीच्या रूपात आपण देवाला पाहतो आणि आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करतो. ही आपली संस्कृती आहे. आपण तिचे पालन करतो. परंतु, अतिथी रूपात येऊन ठगवणाऱ्या लोकांचीच सध्या जास्त चलती आहे. त्यामुळे अतिथी धर्माचे पालन करताना किंवा आपणही कोणाकडे अतिथी म्हणून जाताना पुढील सुचनांचे अवश्य पालन करावे. 

>>घरी आलेल्या व्यक्तीचे 'या, बसा!' म्हणत स्वागत करावे (अर्थात ओळखिची असेल तरच अन्यथा आधी खात्री करून मगच घरात घ्यावे) आलेल्या अतिथीला पाणी देऊन मग संभाषण सुरू करावे.

>>जवळच्या नातलगांव्यतिरिक्त अन्य कोणीही परिचित अतिथी असतील, तरी त्यांना स्वयंपाकघर तसेच बेडरूममध्ये प्रवेश देऊ नये. अन्यथा बाहेरच्यांना आपल्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करण्याची संधी मिळते. 

>>दुसऱ्यांच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यावर आपणहून आपले सामान एका कोपऱ्यात ठेवावे. रिकाम्या हाती जाऊ नये. काहीतरी खाऊ, भेट अवश्य न्यावी. त्यांच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप न करता आब राखून राहावे. आपली लुडबूड किंवा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

>>एखाद्या समारंभानिमित्त जमलेल्या घरातून निघताना सर्व पाहुण्यांनी एकाच दिवशी निघू नये, त्यामुळे मागे राहिलेल्यांमध्ये विरह भावना वाढते. एक दिवसाचे अंतर ठेवून एकाने शेवटी निघावे.

>>अतिथी म्हणून आलेल्या व्यक्तीचा किंवा आपण अतिथी म्हणून जाताना अगत्यपूर्वक निरोप घ्यावा. पुन्हा येण्याचे आमंत्रण द्यावे. आपल्या वागण्या बोलण्यात कृत्रिमता नसावी. 

>>निरोप घेताना जातो म्हणू नये, येतो म्हणावे. त्यातून पुनरागमन सुचित होते. 

>>कोणाकडेही जास्त दिवस राहू नये. अकारण तर मुळीच थांबू नये. हवापालट झाल्यावर उचित वेळी मुक्काम हलवावा. अन्यथा पाहुणचारात अगत्य राहत नाही.