शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची,  झाली त्वरा सूरवरा विमान उतरायाची! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 17:32 IST

नामदेवांचे मधुर कीर्तन ऐकतांना विठ्ठलाला राहवले नाही, त्याला मंदिरात कीर्तन करायला बंदी केल्यावर, साक्षात मंदिरानेच प्रदक्षिणा घातली आणि विठ्ठलाला नामदेवांचे म्हणजे आपल्या भक्ताचे दर्शन घडले. 

रवींद्र वासुदेव गाडगीळ

संत महंतांनंतर या महाराष्ट्राला दत्त भजनाची गोडी लावली, ती जे. डी. पराडकर यांच्या गोड आवाजानी. त्यांच्या असंख्य प्रचलित भजनांपैकी एक भजन म्हणजे, दत्त गुरूंची प्रदक्षिणा-

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची,  झाली त्वरा सूरवरा विमान उतरायाची।।  गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासी, अनुभवी ते जाणती जे गुरूपदीचे रहिवासी ।। पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशि, सर्वही तीर्थे घडली आम्हा आदि करुनी काशी ।। मृदुंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती,  नाम संकीर्तने नित्यानंदे नाचती ।।   कोटी ब्रम्हहत्या हरिती करिता दंडवत,  लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।।   प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला,  श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||

दत्तजयंतीला आमचे मंदिरात दरवर्षी एक भक्त खड्या आवाजात दत्त जन्म,  आरती, कीर्तन, पुष्पांजली झाली की ही “प्रदक्षिणा” म्हणत असे. लहानपणापासून  ऐकल्यामुळे ती गोडीच लागली. आणि आजही ती कायम आहे. तो जो प्रसंग असेल तो डोळ्यासमोर उभा राहतो. आणि “भक्त आनंदाचे डोही आनंद तरंग” होतो. खरेच हा सोहळा पाहायला सूरवरांची विमाने घिरट्या घालत असतील परंतु येथील प्रचंड गर्दीत त्यांना धावपट्टीच मिळत नसेल (लॅंडींग करायला) उतरायला. 

हेही वाचा :Datta Jayanti 2020: श्रीदत्त जयंती कशी, कुठे आणि कधी साजरी करतात, याची सविस्तर माहिती!

आजपर्यंत अनेक आले आणि गेले. पण त्यांना गुरु उमगले नाहीत. म्हणून तर “नेती नेती शब्द, न ये अनुमाना” “ चारी (ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद,अथर्ववेद) श्रमले परंतु न बोलवे काही, साही (षटशास्त्रे) विवाद करिता पडले प्रवाही” “अभाग्यासी कैसी न कळे ही मात” “पराही परतली कैसा हा हेत” वाणीचे चारही प्रकार (परा, पश्यन्ति,  मध्यमा,  वैखरी) गुरूंचे वर्णन करतांना थकले तेथे आपले अस्तित्व ते काय? ज्यांना उमगले ते मात्र “गुरुपदीचे रहिवासी” झाले. ते सांगायला जागेवर आहेत कोठे? “दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन” दत्तस्वरूप झाले आहेत. 

प्रदक्षिणा हा षोडशोपचारातील एक संस्कार आहे. स्वत:भोवती किंवा जमल्यास देवळाभोवती, मूर्तीभोवती, गाभाऱ्याभोवती उजवीकडून डावीकडे स्वतः जाऊन जशी देवालाच प्रदक्षिणा घालत आहोत असा विचार करणे व कृती करणे. ईश्वर सगळीकडे भरला आहे, मग त्याला दाही दिशांनाही नको का पाहायला, “डोळ्यान पाहीन रूप तुझे” साठवून ठेवीन माझ्या हृदयात कायमचा. ओझरते का होईना दर्शन व्हायलाच हवे. कारण आजकाल सगळीकडे गर्दिच गर्दी, त्यात ते लाइन लावणे, वशिला, ओळख पाळख, पैसे देऊन, देणगी देऊन, लाइन तोडून दर्शन घ्यायचे किती दुष्कर, आणि शेवटाला मूर्तीच्या जवळ आलो की तेथील व्यवस्थापक आपले डोके आपटणार आणि “उभा क्षणभरी” काय दर्शन घेणार. म्हणून प्रदक्षिणा. 

ज्याअर्थी आपण त्याला सगळीकडे व सर्व बाजूने बघत आहोत, म्हणजे तो सुद्धा आपल्या भक्तांना बघत असेलच ना!! “माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” 

नामदेवांचे मधुर कीर्तन ऐकतांना विठ्ठलाला राहवले नाही, त्याला मंदिरात कीर्तन करायला बंदी केल्यावर, साक्षात मंदिरानेच प्रदक्षिणा घातली आणि विठ्ठलाला नामदेवांचे म्हणजे आपल्या भक्ताचे दर्शन घडले. 

आता कळले का प्रदक्षिणेचे महत्व? कोणी भेटले नाही की आपण म्हणतो ना तोपर्यंत जवळच एक राऊंड मारून येतो, ना तसे. तो एक क्षण पकडायचा असतो विलक्षण. चला पकडू या तर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 

हेही वाचा : विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे- स्वामी समर्थ