शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची,  झाली त्वरा सूरवरा विमान उतरायाची! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 17:32 IST

नामदेवांचे मधुर कीर्तन ऐकतांना विठ्ठलाला राहवले नाही, त्याला मंदिरात कीर्तन करायला बंदी केल्यावर, साक्षात मंदिरानेच प्रदक्षिणा घातली आणि विठ्ठलाला नामदेवांचे म्हणजे आपल्या भक्ताचे दर्शन घडले. 

रवींद्र वासुदेव गाडगीळ

संत महंतांनंतर या महाराष्ट्राला दत्त भजनाची गोडी लावली, ती जे. डी. पराडकर यांच्या गोड आवाजानी. त्यांच्या असंख्य प्रचलित भजनांपैकी एक भजन म्हणजे, दत्त गुरूंची प्रदक्षिणा-

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची,  झाली त्वरा सूरवरा विमान उतरायाची।।  गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासी, अनुभवी ते जाणती जे गुरूपदीचे रहिवासी ।। पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशि, सर्वही तीर्थे घडली आम्हा आदि करुनी काशी ।। मृदुंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती,  नाम संकीर्तने नित्यानंदे नाचती ।।   कोटी ब्रम्हहत्या हरिती करिता दंडवत,  लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।।   प्रदक्षिणा करुनी देह भावे वाहिला,  श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||

दत्तजयंतीला आमचे मंदिरात दरवर्षी एक भक्त खड्या आवाजात दत्त जन्म,  आरती, कीर्तन, पुष्पांजली झाली की ही “प्रदक्षिणा” म्हणत असे. लहानपणापासून  ऐकल्यामुळे ती गोडीच लागली. आणि आजही ती कायम आहे. तो जो प्रसंग असेल तो डोळ्यासमोर उभा राहतो. आणि “भक्त आनंदाचे डोही आनंद तरंग” होतो. खरेच हा सोहळा पाहायला सूरवरांची विमाने घिरट्या घालत असतील परंतु येथील प्रचंड गर्दीत त्यांना धावपट्टीच मिळत नसेल (लॅंडींग करायला) उतरायला. 

हेही वाचा :Datta Jayanti 2020: श्रीदत्त जयंती कशी, कुठे आणि कधी साजरी करतात, याची सविस्तर माहिती!

आजपर्यंत अनेक आले आणि गेले. पण त्यांना गुरु उमगले नाहीत. म्हणून तर “नेती नेती शब्द, न ये अनुमाना” “ चारी (ऋग्वेद,यजुर्वेद, सामवेद,अथर्ववेद) श्रमले परंतु न बोलवे काही, साही (षटशास्त्रे) विवाद करिता पडले प्रवाही” “अभाग्यासी कैसी न कळे ही मात” “पराही परतली कैसा हा हेत” वाणीचे चारही प्रकार (परा, पश्यन्ति,  मध्यमा,  वैखरी) गुरूंचे वर्णन करतांना थकले तेथे आपले अस्तित्व ते काय? ज्यांना उमगले ते मात्र “गुरुपदीचे रहिवासी” झाले. ते सांगायला जागेवर आहेत कोठे? “दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन” दत्तस्वरूप झाले आहेत. 

प्रदक्षिणा हा षोडशोपचारातील एक संस्कार आहे. स्वत:भोवती किंवा जमल्यास देवळाभोवती, मूर्तीभोवती, गाभाऱ्याभोवती उजवीकडून डावीकडे स्वतः जाऊन जशी देवालाच प्रदक्षिणा घालत आहोत असा विचार करणे व कृती करणे. ईश्वर सगळीकडे भरला आहे, मग त्याला दाही दिशांनाही नको का पाहायला, “डोळ्यान पाहीन रूप तुझे” साठवून ठेवीन माझ्या हृदयात कायमचा. ओझरते का होईना दर्शन व्हायलाच हवे. कारण आजकाल सगळीकडे गर्दिच गर्दी, त्यात ते लाइन लावणे, वशिला, ओळख पाळख, पैसे देऊन, देणगी देऊन, लाइन तोडून दर्शन घ्यायचे किती दुष्कर, आणि शेवटाला मूर्तीच्या जवळ आलो की तेथील व्यवस्थापक आपले डोके आपटणार आणि “उभा क्षणभरी” काय दर्शन घेणार. म्हणून प्रदक्षिणा. 

ज्याअर्थी आपण त्याला सगळीकडे व सर्व बाजूने बघत आहोत, म्हणजे तो सुद्धा आपल्या भक्तांना बघत असेलच ना!! “माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” 

नामदेवांचे मधुर कीर्तन ऐकतांना विठ्ठलाला राहवले नाही, त्याला मंदिरात कीर्तन करायला बंदी केल्यावर, साक्षात मंदिरानेच प्रदक्षिणा घातली आणि विठ्ठलाला नामदेवांचे म्हणजे आपल्या भक्ताचे दर्शन घडले. 

आता कळले का प्रदक्षिणेचे महत्व? कोणी भेटले नाही की आपण म्हणतो ना तोपर्यंत जवळच एक राऊंड मारून येतो, ना तसे. तो एक क्षण पकडायचा असतो विलक्षण. चला पकडू या तर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 

हेही वाचा : विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे- स्वामी समर्थ