शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

Dhan Teras 2021 : धनत्रयोदशीला यमराजाने यमदूतांना कोणते वचन दिले व ते आपल्याला उपयोगी कसे ठरेल, ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 10:51 IST

Diwali 2021 : आज सायंकाळी धनाची पूजा झाली की यमराजासाठी दक्षिण दिशेला तोंड केलेला एक दिवा लावला जातो.

आज धनत्रयोदशी. आज घरोघरी सायंकाळी अलंकाराची, धनाची पूजा केली जाते. जे दागिने सुरक्षेच्या दृष्टीने आपण तिजोरीत ठेवतो, ते आजच्या दिवशी बाहेर काढून, लखलखीत करून त्यांची पूजा केली जाते. गणपती, विष्णू-लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग तसेच नाणी नोटांच्या रुपातील द्रव्यनिधी यांची पूजा करण्याचा प्रघात आहे. धनस्वरुपातील लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. व ही सर्व पूजा झाली, की यमराजासाठी आठवणीने खास दिवा लावला जातो. त्यालाच यमदीपदान असे म्हणतात.

Diwali 2021 : धनत्रयोदशीला दीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही असे म्हणतात; कारण... 

दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित केला जातो व यमराजाचे स्मरण करून नमस्कार केला जातो. अकाली, आकस्मिक मृत्यू न येता संपूर्ण आयुष्य आनंदाने, समाधानाने व्यतीत केल्यावर यमलोकीची यात्रा घडावी, या हेतूने यमदीपदान केले जाते. या प्रथेमागे एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी - 

एकदा सहज म्हणून यमराजाने आपल्या दूतांना विचारले, `तुम्ही एखाद्याचे प्राण हरण करता, तेव्हा तुम्हाला दु:खं होत नाही का?' त्यावेळी धीर करून यमदूतांनी उत्तर दिले की, `असा एकदा अतिशय हृद्य प्रसंग आला होता. हेमराज राजाला पुत्र झाला. त्याच्या षष्ठीच्या दिवशी सटवाईने भविष्य वर्तवले की, `हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल.' हे ऐकून राजाने मुलाला कडेकोट बंदोबस्तात एका चिरेबंदी, अभेद्य अशा खास स्थानी ठेवले. 

यथाकाल म्हणजे सोळाव्या वर्षी त्याचा विवाह झाला. चौथ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही त्याचे प्राण हरण करण्यास गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी शोककल्लोळ झाला, तो ऐकून आणि बघून आम्हीदेखील हेलावलो, दु:खी झालो. पण आपली आज्ञा कशी मोडणार? म्हणून आम्हा प्राण हरण करावेच लागले. 

आम्ही अतिशय दु:खी झालो होतो. म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की, अपमृत्यू टाळता येईल असा काही उपाय असल्यास सुचवावा!''त्यावेळी यमाने सांगितले, 'धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळनंतर जो कोणी दीपदान करून धनत्रयोदशी व्रत करील, त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना अपमृत्यू येणार नाही.' 

तेव्हापासून हे व्रत आणि दीपदानाची परंपरा सरू झाली व ती आजतागायत सुरू आहे. कोणाच्याही वाट्याला अपमृत्यु येऊ नये अशी यमराजाला प्रार्थना करूया आणि आपणही आज सायंकाळी दक्षिण दिशेला तोंड करून आशेचा एक दिवा लावूया. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021