शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Dhan Teras 2021 : धनत्रयोदशीला यमराजाने यमदूतांना कोणते वचन दिले व ते आपल्याला उपयोगी कसे ठरेल, ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 10:51 IST

Diwali 2021 : आज सायंकाळी धनाची पूजा झाली की यमराजासाठी दक्षिण दिशेला तोंड केलेला एक दिवा लावला जातो.

आज धनत्रयोदशी. आज घरोघरी सायंकाळी अलंकाराची, धनाची पूजा केली जाते. जे दागिने सुरक्षेच्या दृष्टीने आपण तिजोरीत ठेवतो, ते आजच्या दिवशी बाहेर काढून, लखलखीत करून त्यांची पूजा केली जाते. गणपती, विष्णू-लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग तसेच नाणी नोटांच्या रुपातील द्रव्यनिधी यांची पूजा करण्याचा प्रघात आहे. धनस्वरुपातील लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. व ही सर्व पूजा झाली, की यमराजासाठी आठवणीने खास दिवा लावला जातो. त्यालाच यमदीपदान असे म्हणतात.

Diwali 2021 : धनत्रयोदशीला दीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही असे म्हणतात; कारण... 

दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित केला जातो व यमराजाचे स्मरण करून नमस्कार केला जातो. अकाली, आकस्मिक मृत्यू न येता संपूर्ण आयुष्य आनंदाने, समाधानाने व्यतीत केल्यावर यमलोकीची यात्रा घडावी, या हेतूने यमदीपदान केले जाते. या प्रथेमागे एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी - 

एकदा सहज म्हणून यमराजाने आपल्या दूतांना विचारले, `तुम्ही एखाद्याचे प्राण हरण करता, तेव्हा तुम्हाला दु:खं होत नाही का?' त्यावेळी धीर करून यमदूतांनी उत्तर दिले की, `असा एकदा अतिशय हृद्य प्रसंग आला होता. हेमराज राजाला पुत्र झाला. त्याच्या षष्ठीच्या दिवशी सटवाईने भविष्य वर्तवले की, `हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल.' हे ऐकून राजाने मुलाला कडेकोट बंदोबस्तात एका चिरेबंदी, अभेद्य अशा खास स्थानी ठेवले. 

यथाकाल म्हणजे सोळाव्या वर्षी त्याचा विवाह झाला. चौथ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही त्याचे प्राण हरण करण्यास गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी शोककल्लोळ झाला, तो ऐकून आणि बघून आम्हीदेखील हेलावलो, दु:खी झालो. पण आपली आज्ञा कशी मोडणार? म्हणून आम्हा प्राण हरण करावेच लागले. 

आम्ही अतिशय दु:खी झालो होतो. म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की, अपमृत्यू टाळता येईल असा काही उपाय असल्यास सुचवावा!''त्यावेळी यमाने सांगितले, 'धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळनंतर जो कोणी दीपदान करून धनत्रयोदशी व्रत करील, त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना अपमृत्यू येणार नाही.' 

तेव्हापासून हे व्रत आणि दीपदानाची परंपरा सरू झाली व ती आजतागायत सुरू आहे. कोणाच्याही वाट्याला अपमृत्यु येऊ नये अशी यमराजाला प्रार्थना करूया आणि आपणही आज सायंकाळी दक्षिण दिशेला तोंड करून आशेचा एक दिवा लावूया. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021