शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

Dhan Teras 2021 : धनत्रयोदशीला यमराजाने यमदूतांना कोणते वचन दिले व ते आपल्याला उपयोगी कसे ठरेल, ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 10:51 IST

Diwali 2021 : आज सायंकाळी धनाची पूजा झाली की यमराजासाठी दक्षिण दिशेला तोंड केलेला एक दिवा लावला जातो.

आज धनत्रयोदशी. आज घरोघरी सायंकाळी अलंकाराची, धनाची पूजा केली जाते. जे दागिने सुरक्षेच्या दृष्टीने आपण तिजोरीत ठेवतो, ते आजच्या दिवशी बाहेर काढून, लखलखीत करून त्यांची पूजा केली जाते. गणपती, विष्णू-लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग तसेच नाणी नोटांच्या रुपातील द्रव्यनिधी यांची पूजा करण्याचा प्रघात आहे. धनस्वरुपातील लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. व ही सर्व पूजा झाली, की यमराजासाठी आठवणीने खास दिवा लावला जातो. त्यालाच यमदीपदान असे म्हणतात.

Diwali 2021 : धनत्रयोदशीला दीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही असे म्हणतात; कारण... 

दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित केला जातो व यमराजाचे स्मरण करून नमस्कार केला जातो. अकाली, आकस्मिक मृत्यू न येता संपूर्ण आयुष्य आनंदाने, समाधानाने व्यतीत केल्यावर यमलोकीची यात्रा घडावी, या हेतूने यमदीपदान केले जाते. या प्रथेमागे एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी - 

एकदा सहज म्हणून यमराजाने आपल्या दूतांना विचारले, `तुम्ही एखाद्याचे प्राण हरण करता, तेव्हा तुम्हाला दु:खं होत नाही का?' त्यावेळी धीर करून यमदूतांनी उत्तर दिले की, `असा एकदा अतिशय हृद्य प्रसंग आला होता. हेमराज राजाला पुत्र झाला. त्याच्या षष्ठीच्या दिवशी सटवाईने भविष्य वर्तवले की, `हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल.' हे ऐकून राजाने मुलाला कडेकोट बंदोबस्तात एका चिरेबंदी, अभेद्य अशा खास स्थानी ठेवले. 

यथाकाल म्हणजे सोळाव्या वर्षी त्याचा विवाह झाला. चौथ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही त्याचे प्राण हरण करण्यास गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी शोककल्लोळ झाला, तो ऐकून आणि बघून आम्हीदेखील हेलावलो, दु:खी झालो. पण आपली आज्ञा कशी मोडणार? म्हणून आम्हा प्राण हरण करावेच लागले. 

आम्ही अतिशय दु:खी झालो होतो. म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की, अपमृत्यू टाळता येईल असा काही उपाय असल्यास सुचवावा!''त्यावेळी यमाने सांगितले, 'धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळनंतर जो कोणी दीपदान करून धनत्रयोदशी व्रत करील, त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना अपमृत्यू येणार नाही.' 

तेव्हापासून हे व्रत आणि दीपदानाची परंपरा सरू झाली व ती आजतागायत सुरू आहे. कोणाच्याही वाट्याला अपमृत्यु येऊ नये अशी यमराजाला प्रार्थना करूया आणि आपणही आज सायंकाळी दक्षिण दिशेला तोंड करून आशेचा एक दिवा लावूया. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021