शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Death Rituals: मृत व्यक्तीचे कपडे वापरू नये म्हणतात; सद्गुरू सांगताहेत त्यामागील शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 17:08 IST

Death Rituals: आपल्या जवळच्या व्यक्तीची शेवटची आठवण म्हणून त्यांचे कपडे जवळ ठेवू शकता पण ती घालण्याची चूक करू नका, कारण... 

एखादी व्यक्ती मृत पावली असता आपण त्यांची आठवण म्हणून त्यांचे कपडे राखून ठेवतो. मग ती आजीची साडी असो, आईची गोधडी असो, वडिलांची शाल असो नाहीतर आजोबांची काठी असो! वस्तूंच्या रूपाने त्या आठवणी दीर्घकाळ जपण्याचा आपला प्रयत्न असतो. मात्र, तसे असले तरी मृत व्यक्तीच्या अंगावरचे कपडे ठेवू नये तर त्यांच्याबरोबर ते कपडेही विसर्जित करावेत असे शास्त्र सांगते. त्यामागे अध्यात्म आहे शिवाय विज्ञानही आहे, काय ते जाणून घेऊ. 

मृत्यूनंतर मृतांचे कपडे घालू नका

प्रख्यात धार्मिक गुरु जग्गी वासुदेव म्हणतात की, आत्मा एकदा शरीर सोडून गेला की, कुटुंबातील सदस्यांनी त्या शरीराशी संबंधित कपडे आणि इतर वस्तू दान केल्या पाहिजेत आणि मृत्यूसमयी संसर्ग झालेल्या वस्तू जाळल्या पाहिजेत. याचे कारणही ते सांगतात. जग्गी वासुदेव म्हणतात की शरीर सोडून गेलेला आत्मा देहाबरोबर आपल्या वासनांचाही त्याग करून मुक्त झालेला असतो. मृत्यूसमयी संपर्कात आलेल्या वस्तू जपून ठेवल्यास आत्मा त्या वस्तूंकडे आकृष्ट होतो आणि पुन्हा या नश्वर जगाकडे ओढला जातो आणि तो आत्मा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून राहतो. म्हणून त्या वस्तूंचे दहन करणे इष्ट ठरते. तसेच त्या व्यक्तीचे जुने, नवे वापरण्यायोग्य कपडे धुवून, स्वच्छ करून दान केले असता वस्तूंचा सदुपयोग होतो. 

घरात अप्रिय घटना सुरू होतात

ते म्हणतात की मृत्यूनंतर आत्मा ऊर्जा स्वरूपात बदलतो. ती ऊर्जा सकारात्मक आणि नकारात्मक असू शकते. जर ती ऊर्जा नकारात्मक बनली आणि कुटुंबातील सदस्यांनी मृत व्यक्तीचे कपडे घातले तर त्याची सावली त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकते. त्यामुळे कुटुंबात अप्रिय घटनांचा फेरा सुरू होतो.

जग्गी वासुदेव सांगतात की, मृत व्यक्तींच्या कपड्यांव्यतिरिक्त त्यांच्या आवडीच्या वस्तू जसे की पेन, मोबाईल किंवा इतर महागड्या वस्तू देखील फार काळ साठवू नये. त्या वस्तू सतत दिसत राहिल्याने मन उदास होते आणि घरातल्या सदस्यांवर तोच प्रभाव टिकून राहतो. त्यामुळे घरात नकारात्मकता पसरते आणि आत्मा घरात गुंतून राहतो. 

घातक जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात

विज्ञान सांगते मृत व्यक्तीचे कपडे किंवा इतर गोष्टी वापरू नयेत. विज्ञानानुसार जेव्हा एखादी व्यक्ती मरते, तेव्हा तिची प्रतिकारशक्ती संपून तो देह अनेक  अनेक सूक्ष्म जीवाणू आणि विषाणूंच्या संपर्कात येतो. असे सूक्ष्म जीव जे डोळ्यांना दिसणारही नाही. त्याचा संसर्ग होऊन सामान्य व्यक्तीला त्रास होऊ शकतो. म्हणून व्यक्ती गेल्यावर तिचे पार्थिव फार काळ न ठेवता तिच्या धर्मानुसार दहन किंवा दफन विधी केला जातो. आणि अंत्य यात्रेत सहभागी झालेले निरोप देऊन आल्यावर स्नान करून संसर्गमुक्त होतात. असे असताना आपण अट्टाहासाने जर ते कपडे वापरत असू तर आपण विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने चूक तर करतच आहोत शिवाय मृत आत्म्यालाही गुंतवून ठेवत आहोत हे लक्षात घ्यायला हवे.