शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले?; मुख्यमंत्री कार्यालयाने मागवली माहिती
2
महामुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना निधीचे ‘बुस्टर’; MMRDAच्या प्रकल्पांसाठी मिळणार चार लाख कोटींचे कर्ज
3
बाबा सिद्दिकी प्रकरणात मोठी अपडेट; मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला, पंजाबमधील स्फोटात होता सहभाग!
4
क्लोजर रिपोर्ट सुनावणी वर्ग करण्यास परवानगी; सुशांतसिंहप्रकरणी सीबीआयने केलेली मागणी
5
अमेरिकेने चीनवर लादला तब्बल १०४ टक्के टॅरिफ; आजपासूनच लागू होणार: नियोजित बैठका थांबवल्या
6
Retired Out पॅटर्नसह CSK नं केली MI ची कॉपी; रिझल्टही तसाच लागला; PBKS नं सामना जिंकला
7
वक्फ कायदा अस्तित्वात: कोर्टात केंद्राकडून कॅव्हेट; १५ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता
8
पालिकेकडून बेस्टला १०० कोटींचा निधी; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकरच मिळण्याची शक्यता
9
सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांना न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस, कारण...
10
घरकुलांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू; वाळू-रेती धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
11
‘चक्र’ करणार आरोग्य क्षेत्रातील संशोधन; आरोग्य विद्यापीठाचा पुढाकार
12
विधानसभेने मंजूर केलेली विधेयके रोखणे ही मनमानी; सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या राज्यपालांना कठोर शब्दांत फटकारले
13
"कोई... मिल गया.." युवा प्रियांशच्या शतकी खेळीवर प्रीती झिंटाही झाली फिदा (VIDEO)
14
Maharashtra Temperature Update: राज्यात उन्हाच्या झळा तीव्र, अकोला ४४ अंशांच्या पार, पुण्यातही ४२ अंश तापमानाने काहिली
15
मोठी बातमी! आजपासून संपूर्ण देशात वक्फ कायदा लागू झाला; केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली
16
10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेले डायर वुल्फ पृथ्वीवर परतले; शास्त्रज्ञांनी केला चमत्कार...
17
वक्फ विधेयकाविरोधात आंदोलनावेळी हिंसाचार; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या...
18
“...तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान झाले असते”: रामदास आठवले
19
जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं 
20
"बाबर आझम रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर पडायचा अन्..."; मुलाखतीत समोर आली मोठी माहिती

एखादी गोष्ट देवाकडे मागायची योग्य पद्धत कोणती? समर्थ रामदास स्वामींनी ‘असे’ केले मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 13:25 IST

Dasnavmi 2024: समर्थ रामदास स्वामी यांनी शिष्यांना मार्गदर्शन करताना नेमके काय सांगितले? जाणून घ्या...

Dasnavmi 2024: माघ वद्य नवमीला तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ ' हा घोष करून समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. हाच दिवस दासनवमी म्हणून ओळखला जातो. यंदा २०२४ रोजी ०५ मार्च रोजी दासनवमी आहे. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते, असे सांगितले जाते. रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले. एके दिवस आपल्या मठात शिष्यांसोबत बसलेले असताना एका प्रसंगात समर्थांनी देवाकडे मागणे मागण्याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले.

आपण देवाकडे सातत्याने काही ना काही मागत असतो. आपली सुख-दुःखे देवाला सांगत असतो. आपल्या समस्या, अडचणी यातून मार्ग दिसावा, यासाठी देवाकडे आर्जव करत असतो. देवाकडे मागण्याची योग्य पद्धत कोणती, याबाबत समर्थ रामदास स्वामी यांनी काही मार्गदर्शन केले आहे. समर्थ रामदास स्वामी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करत असत, तेव्हा त्यांची मुद्रा ही अगदी स्थितप्रज्ञासारखी असे. एकदा न राहून एका शिष्याने समर्थांना विचारेल की, नामस्मरण करत असताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो? आपण जराही विचलित होत नाहीत? मनात नेमका काय विचार करीत असता? मनातील विचारांचा लवलेश चेहऱ्यावर येत नाही हे कसे शक्य होते? असे प्रश्न शिष्याने समर्थांना केले.

समर्थ रामदास स्वामींनी शिष्याला एक गोष्ट सांगितली

समर्थ रामदास स्वामी उपस्थित शिष्यांना एक गोष्ट सांगितली. एकदा एका राजमहालाबाहेर एक भिक्षुक उभा होता. भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल, इतकेही वस्त्र नव्हते. आहे त्या वस्त्रालाही अनेक ठिकाणी चिंध्या जोडलेल्या होत्या. अनेक दिवसांपासून भिक्षुक जेवलेला नसावा, हे स्पष्ट दिसत होते. मात्र, भिक्षुकाच्या डोळ्यात तेज होते. कष्ट सोसलेला भिक्षुक उभा तरी कसा राहू शकत होता, याचे आश्चर्य वाटत होते. केव्हाही खाली कोसळेल, अशा स्थितीत तो ताटकळत उभा होता. तेवढ्यात सम्राट बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले की, सांग, तुला काय हवे आहे?

मी ईश्वराला अधिक काय सांगायचे?

भिक्षुक उत्तरला की, आपल्या द्वारावर माझ्या ताटकळत उभे राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल, तर यावर मला काहीही बोलायचे नाही. मी आपल्यासमोर आहे. माझी मागणी काय असू शकेल, याचा आपणच अंदाज बांधलेला बरा. माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे, असे भिक्षुकाने सांगितले. पुढे समर्थ रामदास स्वामी म्हणाले की, तो प्रसंग पाहून, देवाकडे काहीतरी मागायचे सोडून दिले, असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले. मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे. परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल. याउपर मी ईश्वराला अधिक काय सांगायचे? माझी परिस्थिती सर्व काही कथन करू शकत नसेल. तर माझे शब्द ती सांगायला कसे पूरे पडू शकतील? माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाहीत, तर माझे शब्दही त्यांना कसे उमगतील? म्हणूनच भावपूर्ण विश्वासातून परमात्म्याचे केलेले नामस्मरण महत्त्वाचे ठरते. यानंतर काहीच मागणे शिल्लक राहत नाही. आपण करत असलेली प्रार्थना, मनापासून केलेले नामस्मरण पूरेसे असते, असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक