शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

दासबोधातील समासात समर्थांनी संततीनियमनाचा विषय चपखलपणे मांडला आहे : विश्वजनसंख्या दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 11:40 IST

संततीनियमनाचे महत्त्व सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. अन्यथा समर्थांच्या वचनाप्रमाणे उदंड लेकुरे झालेल्या पित्याची, समाजरक्षण करणारऱ्या राजाची, देश चालवणाऱ्या मंत्र्यांची अवस्था दयनीय होईल!

येत्या रविवारी म्हणजे ११ जुलै रोजी जागतिक विश्वजनसंख्या दिन आहे. दिवसेंदिवस पृथ्वीवरचा वाढता भार आणि त्यावर आळा घालण्याची गरज पाहता, हा दिवस योजला असावा. `वाढता वाढता वाढे' अशी स्थिती झाल्यामुळे काम करणारे हात दोन आणि खाणारी तोंडे दहा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्माण झाली म्हणण्याऐवजी केली गेली आहे. लोकसंख्येला आळा घालण्यासाठी संततीनियमनाचा कायदा करण्यात आला, मात्र अंमलबजावणी अजूनही होताना दिसत नाही. या विषयात संतांनीदेखील वेळोवेळी कानउघडणी केली आहे. जसे की, समर्थ रामदास यांनी दासबोधाच्या तिसऱ्या दशकातील चौथा समास या विषयाला वाहिलेला आहे. समर्थ लिहीतात-

लेकुरे उदंड जाली, तो ते लक्ष्मी निघोन गेली।बापडी भिकेसी लागली, खावया अन्न मिळेना।लेकुरे खेळती धाकुटी, येके रांगती येके पोटी।ऐसी घरभरी जाली दाटी, कन्या आणि पुत्रांची।दिवसेंदिवस खर्च वाढला, यावा होता तो खुंटोन गेला।कन्या उपवरी जाल्या त्याला, उजवावया द्रव्य नाही।मायेबापे होती संपन्न, त्यांचे उदंड होते धन।तेणे करिता प्रतिष्ठा मान, जनी जाला होता।भरम आहे लोकाचारी, पहिली नांदणूक नाही घरी।दिवसेंदिवस अभ्यांतरी, दरिद्र आले।ऐसी घरवात वाढली, खाती तोंडे मिळाली।तेणे प्राणीयास लागली, काळजी उद्वेगाची।कन्या उपवरी जाल्या, पुत्रास नोवऱ्या आल्या।आता उजवणा केल्या, पाहिजेत की।जरी मुले तैसीच राहिली, तरी पुन्हा लोकलाज जाली।म्हणता कायसा व्याली, जन्मदारिद्र्ये।ऐसी लोकलाज होईल, वडिलांचे नाव जाईल।त्यांचे परतोन नाही दिल्हे, ऐसे आभाल कोसळले उद्वेगाचे।आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी।सर्वकाळ मानसी, चिंतातुर।पती अवघीच मोडली, वस्तभाव गहाण पडली।अहा देवा वेळ आली, आता दिवाळ्याची।काही केला तोडामोडा, विकिला घरीचा पाडा रेडा।काही पैका रोकडा, काळांतरे काढिला।ऐसे रुण घेतले, लोकिकी दंभ केले।सकळ म्हणती नाव राखिले, वडिलांचे।

ऐसे रुण उदंड जाले, रिणाइती वेढून घेतले।मग प्रयाण आरंभले, विदेशाप्रती।

सोप्या शब्दात समर्थांनी दूरदृष्टीने संततीनियमनाचे महत्त्व किती छान समजावून सांगितले आह़े आज बेरोजगारी, गुन्हेगारी, कुपोषण, आजार या सगळ्या समस्यांचे मूळ पाहिले तर ते लोकसंख्यावाढीत आहे. भारताची वाढती लोकसंख्या ही प्रगतीच्या, विकासाच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. भारत हा तरुणांचा देश असला, तरी येथील तरुण मोठ्या संख्येने बेरोजगार असणे सर्वांसाठी धोकादायक आहे. अशा पार्श्वभूमीवर संततीनियमनाचे महत्त्व सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. अन्यथा समर्थांच्या वचनाप्रमाणे उदंड लेकुरे झालेल्या पित्याची, समाजरक्षण करणारऱ्या राजाची, देश चालवणाऱ्या मंत्र्यांची अवस्था दयनीय होईल...

अरण्यरुदन करिता, कोणी नाही बुझाविता,मग होये विचारिता, आपुले मनी।आता कासया रडावे, प्राप्त होते ते भोगावे,ऐसे बोलोनिया जीवे, धारिष्ट केले।