शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सुसंगती सदा घडो, असे का म्हटले जाते, वाचा परीक्षित राजाची गोष्ट! 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 16, 2021 21:52 IST

नेहमी आपली संगत तपासून पहा. अन्यथा आपल्यालाही वाईट कृतीचे भोग भोगावे लागतात.

वाईट लोकांच्या, विचारांच्या सान्निध्यात राहून आपण आपला मूळ स्वभाव, संस्कार विसरतो. इतरांसारखे आपणही वाईट वर्तन करू लागतो. आपली बुद्धी, कृती बिघडते आणि आपणही वाईट बनतो. म्हणून नेहमी आपली संगत तपासून पाहा. 

गोष्ट आहे परीक्षित राजाची. राज्यकारभारातील नियमांची सुसूत्रता, ऋषीमुनींबद्दल अतिशय आदरभावना, प्रजेबद्दल कळवळा यामुळे त्याची कारकीर्द उत्कृष्ट रीतीने सुरू झाली, वय तसे लहानच आणि अनअनुभवी.

एक दिवस त्याच्या काय मनात आले कुणास ठाऊक? राजाने एकट्यानेच शिकारीला जाण्याचे ठरवले.  महालामधील एका दालनात उंच जागी एक मुकुट ठेवलेला होता. त्याची कला-कुशलता आवडली म्हणून राजाने तो खाली काढून घेतला व गंमत म्हणून स्वत:च्या डोक्यावर ठेवून राजा निघाला. 

परंतु खूप भटकूनसुद्धा शिकार मिळाली नाही. राजाला कंटाळा आला, मन उगाचच अस्वस्थ झाले. कुणाशी थोड्याफार गप्पा तरी माराव्या म्हणून राजा इकडे तिकडे पाहू लागला. तिथे वस्ती अशी नव्हतीच. परंतु कुणीतरी एक मुनी ध्यानस्थ बसले होते. त्यांच्यापर्यंत जाऊन पाहोचताच राजाचे मन विनाकारण अधिकच प्रक्षुब्ध जाले. तरीही मनावर संयम ठेवीत त्याने मुनींना हाका मारावयास सुरुवात केली. चार पाच हळुवारपणे हाका मारुनसुद्धा काहीच हालचाल नाही. म्हणून तो अधिकच खवळला. त्याने आजूबाजूला पाहिले. दूरवर चार पाच मुले खेळत होती व दुसऱ्या बाजूला एक भला मोठा साप मरून पडला होता. राजाने तो उचलला आणि त्या मुनींच्या गळ्यात अडकवून दिला व रागाने ताडताड पावले टाकीत तो राजवाड्यात परतला.

थोड्या वेळाने त्या महान मुनींची समाधी उतरली. गळ्यामध्ये सापाचे लोढणे पाहून ते चमकले. अंतर्ज्ञानाने त्यांच्या सर्वकाही लक्षात आले. तो साप काढून ते सरळ राजवाड्यात आले. यापूर्वी ते कितीतरी वेळा आले होते त्यामुळे राजा त्यांना ओळखत होता. तो साप ह्यांच्याच गळ्यात आपण टाकला होता हे पाहून राजा चपापला. आता त्याच्या डोक्यावर मुकुट नव्हता.

अतिशय खजिल होऊन त्याने त्यांचे पाय धरून अशी कशी बुद्धी भ्रष्ट झाली असे विचारले. डोळे मिटून त्याला दोन्ही हातांनी उठवीत, शांत स्वरात ते म्हणाले, राजा तू खरोखरच चांगला आहेस. परंतु जो मुकुट तू डोक्यावर चढवला होतास तो कुणाचा होता माहित आहे का? भीमाने जेव्हा दु:शासनाची मांडी चिरली तेव्हा त्या दुष्ट, अहंभावी वृत्ती असलेल्या त्याच्या डोक्यावरील मुकुट शौर्याचे प्रतीक म्हणून भीम घेऊन आला होता आणि तो कोणी वापरू नये म्हणून प्रथमपासूनच उंचावर ठेवला होता; तुला पूर्वजांचे शौर्यस्मरण राहावे म्हणून! राजा या कुसंगतीचा परिणाम तुला सावध राहावयास शिकवत आहे. 

म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 

जयाचेनि संगे समाधान भंगे,अहंता अकस्मात येऊनि लागे,तये संगतीची जनी कोण गोडी,जिये संगतीने मती राम सोडी।