शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सुसंगती सदा घडो, असे का म्हटले जाते, वाचा परीक्षित राजाची गोष्ट! 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 16, 2021 21:52 IST

नेहमी आपली संगत तपासून पहा. अन्यथा आपल्यालाही वाईट कृतीचे भोग भोगावे लागतात.

वाईट लोकांच्या, विचारांच्या सान्निध्यात राहून आपण आपला मूळ स्वभाव, संस्कार विसरतो. इतरांसारखे आपणही वाईट वर्तन करू लागतो. आपली बुद्धी, कृती बिघडते आणि आपणही वाईट बनतो. म्हणून नेहमी आपली संगत तपासून पाहा. 

गोष्ट आहे परीक्षित राजाची. राज्यकारभारातील नियमांची सुसूत्रता, ऋषीमुनींबद्दल अतिशय आदरभावना, प्रजेबद्दल कळवळा यामुळे त्याची कारकीर्द उत्कृष्ट रीतीने सुरू झाली, वय तसे लहानच आणि अनअनुभवी.

एक दिवस त्याच्या काय मनात आले कुणास ठाऊक? राजाने एकट्यानेच शिकारीला जाण्याचे ठरवले.  महालामधील एका दालनात उंच जागी एक मुकुट ठेवलेला होता. त्याची कला-कुशलता आवडली म्हणून राजाने तो खाली काढून घेतला व गंमत म्हणून स्वत:च्या डोक्यावर ठेवून राजा निघाला. 

परंतु खूप भटकूनसुद्धा शिकार मिळाली नाही. राजाला कंटाळा आला, मन उगाचच अस्वस्थ झाले. कुणाशी थोड्याफार गप्पा तरी माराव्या म्हणून राजा इकडे तिकडे पाहू लागला. तिथे वस्ती अशी नव्हतीच. परंतु कुणीतरी एक मुनी ध्यानस्थ बसले होते. त्यांच्यापर्यंत जाऊन पाहोचताच राजाचे मन विनाकारण अधिकच प्रक्षुब्ध जाले. तरीही मनावर संयम ठेवीत त्याने मुनींना हाका मारावयास सुरुवात केली. चार पाच हळुवारपणे हाका मारुनसुद्धा काहीच हालचाल नाही. म्हणून तो अधिकच खवळला. त्याने आजूबाजूला पाहिले. दूरवर चार पाच मुले खेळत होती व दुसऱ्या बाजूला एक भला मोठा साप मरून पडला होता. राजाने तो उचलला आणि त्या मुनींच्या गळ्यात अडकवून दिला व रागाने ताडताड पावले टाकीत तो राजवाड्यात परतला.

थोड्या वेळाने त्या महान मुनींची समाधी उतरली. गळ्यामध्ये सापाचे लोढणे पाहून ते चमकले. अंतर्ज्ञानाने त्यांच्या सर्वकाही लक्षात आले. तो साप काढून ते सरळ राजवाड्यात आले. यापूर्वी ते कितीतरी वेळा आले होते त्यामुळे राजा त्यांना ओळखत होता. तो साप ह्यांच्याच गळ्यात आपण टाकला होता हे पाहून राजा चपापला. आता त्याच्या डोक्यावर मुकुट नव्हता.

अतिशय खजिल होऊन त्याने त्यांचे पाय धरून अशी कशी बुद्धी भ्रष्ट झाली असे विचारले. डोळे मिटून त्याला दोन्ही हातांनी उठवीत, शांत स्वरात ते म्हणाले, राजा तू खरोखरच चांगला आहेस. परंतु जो मुकुट तू डोक्यावर चढवला होतास तो कुणाचा होता माहित आहे का? भीमाने जेव्हा दु:शासनाची मांडी चिरली तेव्हा त्या दुष्ट, अहंभावी वृत्ती असलेल्या त्याच्या डोक्यावरील मुकुट शौर्याचे प्रतीक म्हणून भीम घेऊन आला होता आणि तो कोणी वापरू नये म्हणून प्रथमपासूनच उंचावर ठेवला होता; तुला पूर्वजांचे शौर्यस्मरण राहावे म्हणून! राजा या कुसंगतीचा परिणाम तुला सावध राहावयास शिकवत आहे. 

म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 

जयाचेनि संगे समाधान भंगे,अहंता अकस्मात येऊनि लागे,तये संगतीची जनी कोण गोडी,जिये संगतीने मती राम सोडी।