शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

चिरतारुण्य आणि सुदृढ आरोग्य देणारा च्यवनप्राश 'च्यवन' ऋषींच्या नावावरून ओळखला जाऊ लागला; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 1:53 PM

हिवाळ्यात च्यवनप्राशचे सेवन आपण करतो, त्याबरोबर जाणून घ्या त्याच्या उगमाची कथा!

फार पूर्वी शर्याति नावाचा राजा होता. त्याला अनेक अपत्ये होती. तो प्रजाहितदक्ष राजा होताच, शिवाय तो कुटुंबवत्सलदेखील होता. आपला राज्यकारभार सांभाळून तो आपल्या कुटुंबाला वेळ देत असे. एकदा सहपरिवार राना वनाचा फेरफटका करत असताना राजा राणी बोलत बसले. त्यांची मुले वयाने मोठी होती, शूर होती. ती इतरत्र फिरत होती. 

असाच फेरफटका मारत असताना राजकुमारी सुकन्या हिच्या हातून एका मातीच्या ढीगाला दगड लागला आणि त्यातून रक्त वाहू लागले. ती घाबरली. तो मातीचा ढीग नसून त्यात कोणाचा तरी मानवी देह आहे, याची तिला कल्पना आली. तिने तत्काळ ओरडून आपल्या आई वडिलांना आणि भावंडांना तिथे बोलावून घेतले. रक्त थांबत नव्हते. 

राजाने पुढाकार घेऊन मातीचा थर दूर केला. तर त्या ढीगाखाली च्यवन नावाचे थोर तपस्वी तपश्चर्या करत बसले होते. राजकुमारी सुकन्याच्या हातून चुकून लागलेल्या दगडामुळे त्यांचा डोळा जखमी झाला आणि त्यातून रक्त वाहू लागले. 

राजाने तत्काळ आपल्या राज्यातून राजवैद्यांना बोलावून घेतले. ऋषींची मलमपट्टी केली. परंतु, राजवैद्यांच्या सांगण्यानुसार च्यवन ऋषींनी आपली दृष्टी गमावली होती.

हे वृत्त कळल्यावर राजकुमारी सुकन्येला अपराधी वाटू लागले. ऋषींनी क्षमा केली, तरी तिला तिच्या चुकीचे प्रायश्चित्त करून घ्यायचे होते. ती आपल्या वडिलांना म्हणाली, `पिताश्री, माझ्यामुळे ऋषींची दृष्टी गेली, आता मीच त्यांचे नेत्र होईन. अर्थात मी त्यांच्याशी विवाह करून त्यांचा सांभाळ करीन.'

दोघांच्या वयातील तफावत पाहता राजाने तिला अडवले, परंतु तिने आपलेच म्हणणे पुढे रेटले. राजाने च्यवन ऋषींशी राजकन्येचा विवाह लावून दिला. च्यवन ऋषींची तपश्चर्या पाहून देवतांनी त्यांना वरदान दिले आणि आयुर्वेदीक औषधे दिली, ज्यामुळे च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त झाले आणि सर्व देवतांच्या आशीर्वादाने ऋषींनी पुढे राजकन्येसोबत सुखाने संसार केला.