शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी लपवलेला खजिना मुलाला मिळाला, सोबत मिळाला 'हा' अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 17:56 IST

केवळ हककांबद्दल जागरूक असून उपयोग नाही, कर्तव्याचीही जाणीव प्रत्येकाला असायला हवी!

वाडवडिलांची पुण्याई वंशजांच्या कामी येते. ही पुण्याई कधी प्रतिष्ठेची असते, तर कधी मान सन्मानाची, तर कधी आर्थिक स्वरूपाची किंवा अनुभवाची! आजही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून अनेक गोष्टी वारसाहक्काने मिळतात. परंतु, हक्क म्हटल्यावर अधिकार आला आणि अधिकार मिळवताना कर्तव्याची जाणीव नसेल तर काय उपयोग? यासाठी एका शेतकऱ्याने आपल्या मुलाला सांगितला पुढील उपाय...!

एक शेतकरी होता. अतिशय मेहनती होता. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर घरसंसार चालवला होता. मुलाचे पालनपोषण केले. शिकवले, वाढवले आणि आता त्याने घराची जबाबदारी स्वीकारावी असे त्याला सांगितले. परंतु, मुलगा अतिशय आळशी होता.

मुलाने आजवर वडिलांची मेहनत पाहिली होती. परंतु त्याची कष्ट करायची अजिबात तयारी नव्हती. त्याला नेहमी अचानक धनलाभ झाल्याचे स्वप्न पडत असे. 

एक दिवस तो वडिलांना म्हणाला, `तुम्ही शेतीत कष्ट घेण्यापेक्षा व्यापार केला असता, तर आज मला कष्ट करावेच लागले नसते. वारसाहक्काने तुमची कमाई मला मिळाली असती. खजिना मिळाला असता. पण नाही. तुम्ही स्वत: कष्ट केले आणि आता मलाही कष्ट करायला भाग पाडत आहात. 

यावर शेतकरी म्हणाला, `बाळा, खजिन्याचे काय घेऊन बसलास, तो तर तुला मी आताही देऊ शकतो. जो मला माझ्या वडिलांनी दिला होता. आता तो मी तुला देतो.'

मुलगा सुखावला. कानाचे द्रोण करून वडिलांचे शब्द ऐकू लागला. शेतकऱ्याने त्याला एक ठिकाण सांगितले. तिथे एक डोंगर आहे आणि डोंगरावर एक देऊळ आहे. त्याच्या मागच्या बाजूला धनाची पेटी पुरलेली आहे.

हे शब्द ऐकले आणि मुलाला एवढे स्फुरण चढले की आनंदाच्या भरात तो निघालासुद्धा! मनातल्या मनात तो भविष्याची स्वप्न रंगवू लागला. परंतु त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला एवढी मेहनत घ्यावी लागली, की खजिन्याचा विचारच त्याच्या डोक्यातून निघून गेला. डोंगरावर पोहोचणे हेच त्याचे ध्येय बनले. 

वाटेत त्याला अनेक लोक भेटले. त्यांची मदत घेत घेत तो प्रवास करत होता. वळचणीचे पैसे संपले. वाटेत मिळेल ते काम पत्करून त्याने थोडीफार कमाई केली. तो अनुभव त्याला बरेच काही शिकवून गेला. मजल दरमजल करत तो डोंगरावर पोहोचला. देवीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या पाठीमागे पोहोचला. तिथे जाऊन मागचा सबंध परिसर पाहून तो देहभान विसरला. एवढे निसर्गसौंदर्य त्याने याआधी कधीच पाहिले नव्हते. आपल्या वडिलांनी सांगितला, तो खजिना बहुदा हाच असावा.

खजिन्याच्या शोधात निघालेल्या मुलाला लोकसंग्रह, स्वमेहेनत, निसर्गासौंदर्य आणि बदललेला दृष्टीकोन अशी अनुभवाने भरलेली खजिन्याची पेटी सापडली. मुलाने परत येऊन वडिलांचे आभार मानले. कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि भविष्यात आपल्या मुलालाही हा खजिना द्यायचा, असे त्याने ठरवून टाकले.