शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

वडिलांनी लपवलेला खजिना मुलाला मिळाला, सोबत मिळाला 'हा' अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 17:56 IST

केवळ हककांबद्दल जागरूक असून उपयोग नाही, कर्तव्याचीही जाणीव प्रत्येकाला असायला हवी!

वाडवडिलांची पुण्याई वंशजांच्या कामी येते. ही पुण्याई कधी प्रतिष्ठेची असते, तर कधी मान सन्मानाची, तर कधी आर्थिक स्वरूपाची किंवा अनुभवाची! आजही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून अनेक गोष्टी वारसाहक्काने मिळतात. परंतु, हक्क म्हटल्यावर अधिकार आला आणि अधिकार मिळवताना कर्तव्याची जाणीव नसेल तर काय उपयोग? यासाठी एका शेतकऱ्याने आपल्या मुलाला सांगितला पुढील उपाय...!

एक शेतकरी होता. अतिशय मेहनती होता. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर घरसंसार चालवला होता. मुलाचे पालनपोषण केले. शिकवले, वाढवले आणि आता त्याने घराची जबाबदारी स्वीकारावी असे त्याला सांगितले. परंतु, मुलगा अतिशय आळशी होता.

मुलाने आजवर वडिलांची मेहनत पाहिली होती. परंतु त्याची कष्ट करायची अजिबात तयारी नव्हती. त्याला नेहमी अचानक धनलाभ झाल्याचे स्वप्न पडत असे. 

एक दिवस तो वडिलांना म्हणाला, `तुम्ही शेतीत कष्ट घेण्यापेक्षा व्यापार केला असता, तर आज मला कष्ट करावेच लागले नसते. वारसाहक्काने तुमची कमाई मला मिळाली असती. खजिना मिळाला असता. पण नाही. तुम्ही स्वत: कष्ट केले आणि आता मलाही कष्ट करायला भाग पाडत आहात. 

यावर शेतकरी म्हणाला, `बाळा, खजिन्याचे काय घेऊन बसलास, तो तर तुला मी आताही देऊ शकतो. जो मला माझ्या वडिलांनी दिला होता. आता तो मी तुला देतो.'

मुलगा सुखावला. कानाचे द्रोण करून वडिलांचे शब्द ऐकू लागला. शेतकऱ्याने त्याला एक ठिकाण सांगितले. तिथे एक डोंगर आहे आणि डोंगरावर एक देऊळ आहे. त्याच्या मागच्या बाजूला धनाची पेटी पुरलेली आहे.

हे शब्द ऐकले आणि मुलाला एवढे स्फुरण चढले की आनंदाच्या भरात तो निघालासुद्धा! मनातल्या मनात तो भविष्याची स्वप्न रंगवू लागला. परंतु त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला एवढी मेहनत घ्यावी लागली, की खजिन्याचा विचारच त्याच्या डोक्यातून निघून गेला. डोंगरावर पोहोचणे हेच त्याचे ध्येय बनले. 

वाटेत त्याला अनेक लोक भेटले. त्यांची मदत घेत घेत तो प्रवास करत होता. वळचणीचे पैसे संपले. वाटेत मिळेल ते काम पत्करून त्याने थोडीफार कमाई केली. तो अनुभव त्याला बरेच काही शिकवून गेला. मजल दरमजल करत तो डोंगरावर पोहोचला. देवीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या पाठीमागे पोहोचला. तिथे जाऊन मागचा सबंध परिसर पाहून तो देहभान विसरला. एवढे निसर्गसौंदर्य त्याने याआधी कधीच पाहिले नव्हते. आपल्या वडिलांनी सांगितला, तो खजिना बहुदा हाच असावा.

खजिन्याच्या शोधात निघालेल्या मुलाला लोकसंग्रह, स्वमेहेनत, निसर्गासौंदर्य आणि बदललेला दृष्टीकोन अशी अनुभवाने भरलेली खजिन्याची पेटी सापडली. मुलाने परत येऊन वडिलांचे आभार मानले. कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि भविष्यात आपल्या मुलालाही हा खजिना द्यायचा, असे त्याने ठरवून टाकले.