शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

विचार बदला, नशीब बदलेल...तुमचेही व इतरांचेही; वाचा ही मजेशीर गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 16:52 IST

चांगल्या विचारांमध्ये वाईटाचेही चांगले करण्याची केवढीतरी क्षमता असते...!

एक राजा आपल्या राज्याचा फेरफटका करत हत्तीवर अंबारीत बसून चालला होता. आजूबाजूला फौजफाटा होता. राजाचा रुबाब पाहून सगळी जनता विनम्रपणे त्याला अभिवादन करत होती.

वाटेत एक चंदनाचा व्यापारी होता. त्यानेही राजाला लवून नमस्कार केला. परंतु त्याच्या नजरेत काहीतरी वेगळेच आहे, असे राजाला जाणवले. त्याची नजर राजाला खटकली. त्याने मंत्र्याला बोलावून सांगितले, `बाजारात उभा असलेला चंदनाचा व्यापारी, ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहत होता, ते पाहता मला त्याला फाशीची शिक्षा देण्याची तीव्र इच्छा झाली.'

का, कशासाठी, हे विचारण्याची सोय नसल्याने, मंत्र्याने व्यापाऱ्यावरचे अकारण आणि अकाली आलेले मरण टाळण्यासाठी म्हटले, `महाराज, आपणास असे का वाटले, हे समजू शकलो नाही. परंतु तो व्यापारी खूप चांगला आहे. तो तुम्हाला खूप मानतो. तुमची प्रशंसा करतो. एवढेच नव्हे, तर तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि आपण...'

हे ऐकून राजा म्हणाला, `काय? तो माझ्याबद्दल एवढे चांगले विचार करतो? त्याला माझ्याकडून ही सुवर्ण मोहोरांची थैली भेट द्या आणि दररोज त्याच्या दुकानातून आपल्या महालात अग्निहोत्र करण्यासाठी चंदनाची लाकडे मागवा.'

मंत्र्याचा जीव भांड्यात पडला. तो सुवर्ण मोहोरांची थैली घेऊन व्यापाऱ्याजवळ गेला. राजाबद्दल त्याचे विचार जाणून घेण्यासाठी मंत्र्याने वेषांतर केले. तो व्यापाऱ्याला म्हणाला, `काय शेठ, कसा चाललाय व्यापार? आज तर राजेसाहेब पण तुमच्याकडे खुश होऊन पाहत होते.'

राजाचे नाव काढताच व्यापारी म्हणाला, `अहो काय सांगू? चंदनाचा व्यापार करून माझ्यावर आता पश्चात्तापाची वेळ आली. एकही गिऱ्हाईक येत नाही. जे येतात, ते केवळ चंदनाचा सुगंध हुंगून निघून जातात. आता तर एकच उपाय आहे. आपल्या राज्याचा राजा गेला, तर त्याच्या अंत्यक्रियेत ही चंदनाची लाकडं कामी येतील आणि माझा व्यापार होईल.'

वेषांतर केलेला मंत्री म्हणाला, `अरेरेरे! काय हे विचार...तुम्ही राजेसाहेबांच्या मृत्यूची कामना करताय आणि इथे राजेसाहेबांनी तुमच्यावर खुष होऊन, तुमच्या व्यापाऱ्याच्या बढतीसाठी शुभेच्छा म्हणून या सुवर्ण मोहरा पाठवल्या आहेत. तसेच अग्निहोत्रासाठी रोज चंदनाची लाकडेही मागवली आहेत.'

हे ऐकून व्यापारी वरमता़े मंत्र्यांची क्षमा मागतो आणि राजाला दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना व्यक्त करत चंदनाच्या लाकडांची एक मोळी बांधून ती मंत्र्यांच्या हस्ते भेट म्हणून पाठवतो.

एका चांगल्या विचारामुळे दोन वाईट विचारांची मने पालटली. एकाला जीवदान तर दुसऱ्याला दीर्घायुष्यासाठी सदिच्छा मिळाल्या. यावरून आपल्याला लक्षात येते, की चांगल्या विचारांमध्ये वाईटाचेही चांगले करण्याची केवढीतरी क्षमता असते...!