शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

विचार बदला, नशीब बदलेल...तुमचेही व इतरांचेही; वाचा ही मजेशीर गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 16:52 IST

चांगल्या विचारांमध्ये वाईटाचेही चांगले करण्याची केवढीतरी क्षमता असते...!

एक राजा आपल्या राज्याचा फेरफटका करत हत्तीवर अंबारीत बसून चालला होता. आजूबाजूला फौजफाटा होता. राजाचा रुबाब पाहून सगळी जनता विनम्रपणे त्याला अभिवादन करत होती.

वाटेत एक चंदनाचा व्यापारी होता. त्यानेही राजाला लवून नमस्कार केला. परंतु त्याच्या नजरेत काहीतरी वेगळेच आहे, असे राजाला जाणवले. त्याची नजर राजाला खटकली. त्याने मंत्र्याला बोलावून सांगितले, `बाजारात उभा असलेला चंदनाचा व्यापारी, ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहत होता, ते पाहता मला त्याला फाशीची शिक्षा देण्याची तीव्र इच्छा झाली.'

का, कशासाठी, हे विचारण्याची सोय नसल्याने, मंत्र्याने व्यापाऱ्यावरचे अकारण आणि अकाली आलेले मरण टाळण्यासाठी म्हटले, `महाराज, आपणास असे का वाटले, हे समजू शकलो नाही. परंतु तो व्यापारी खूप चांगला आहे. तो तुम्हाला खूप मानतो. तुमची प्रशंसा करतो. एवढेच नव्हे, तर तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि आपण...'

हे ऐकून राजा म्हणाला, `काय? तो माझ्याबद्दल एवढे चांगले विचार करतो? त्याला माझ्याकडून ही सुवर्ण मोहोरांची थैली भेट द्या आणि दररोज त्याच्या दुकानातून आपल्या महालात अग्निहोत्र करण्यासाठी चंदनाची लाकडे मागवा.'

मंत्र्याचा जीव भांड्यात पडला. तो सुवर्ण मोहोरांची थैली घेऊन व्यापाऱ्याजवळ गेला. राजाबद्दल त्याचे विचार जाणून घेण्यासाठी मंत्र्याने वेषांतर केले. तो व्यापाऱ्याला म्हणाला, `काय शेठ, कसा चाललाय व्यापार? आज तर राजेसाहेब पण तुमच्याकडे खुश होऊन पाहत होते.'

राजाचे नाव काढताच व्यापारी म्हणाला, `अहो काय सांगू? चंदनाचा व्यापार करून माझ्यावर आता पश्चात्तापाची वेळ आली. एकही गिऱ्हाईक येत नाही. जे येतात, ते केवळ चंदनाचा सुगंध हुंगून निघून जातात. आता तर एकच उपाय आहे. आपल्या राज्याचा राजा गेला, तर त्याच्या अंत्यक्रियेत ही चंदनाची लाकडं कामी येतील आणि माझा व्यापार होईल.'

वेषांतर केलेला मंत्री म्हणाला, `अरेरेरे! काय हे विचार...तुम्ही राजेसाहेबांच्या मृत्यूची कामना करताय आणि इथे राजेसाहेबांनी तुमच्यावर खुष होऊन, तुमच्या व्यापाऱ्याच्या बढतीसाठी शुभेच्छा म्हणून या सुवर्ण मोहरा पाठवल्या आहेत. तसेच अग्निहोत्रासाठी रोज चंदनाची लाकडेही मागवली आहेत.'

हे ऐकून व्यापारी वरमता़े मंत्र्यांची क्षमा मागतो आणि राजाला दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना व्यक्त करत चंदनाच्या लाकडांची एक मोळी बांधून ती मंत्र्यांच्या हस्ते भेट म्हणून पाठवतो.

एका चांगल्या विचारामुळे दोन वाईट विचारांची मने पालटली. एकाला जीवदान तर दुसऱ्याला दीर्घायुष्यासाठी सदिच्छा मिळाल्या. यावरून आपल्याला लक्षात येते, की चांगल्या विचारांमध्ये वाईटाचेही चांगले करण्याची केवढीतरी क्षमता असते...!