शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

Chanakyaniti: चाणक्यनीतीतल्या फक्त 'या' चार गोष्टी आचरणात आणा आणि दीर्घकाळ यशस्वी राहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 07:00 IST

Chanakyaniti: आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या चार गोष्टी कायम लक्षात ठेवा...

आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु यश कोणाला पटकन मिळते तर कोणाला मिळता मिळता हुलकावणी देते. अपयशासाठी केवळ नशिबाला दोष देऊन उपयोग नाही, तर आपले प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहेत की नाही हे पाहणेही महत्त्वाचे आहे. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये चार कारणे विशेष अधोरेखित केली आहेत. ही चाणक्य नीती आपल्यालाही अनुसरता आली तर अपयशाच्या मुळापर्यंत पोहोचणे सोपे जाईल. चला तर जाणून घेऊया त्या चार गोष्टी-

>> लोक यशस्वी लोकांच्या मागे धावतात, पण तुम्ही अपयशी लोकांशी चर्चा करा. त्यांना का अपयश आले, हे आपल्याला त्यांच्या अनुभवावरून कळेल आणि त्यांनी केलेल्या चुका भविष्यात टाळता येतील. दर वेळी स्वतःच्या चुकांमधून शिकायला हवे असे नाही, दुसऱ्यांच्या चुकांमधून आपणही धडा घेतला पाहिजे. त्यालाच मराठीत म्हण आहे, पुढच्यास ठेच मागचा शहाणा!

>> यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा. त्यांनी कोणत्या पद्धतीने स्वतःची प्रगती केली. त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली, याचे  प्रशिक्षण आपल्याला त्यांच्या अनुभवातून मिळू शकते. 

>> यशस्वी आणि अपयशी लोकांकडून शिकण्यासारख्या गोष्टींची तुमच्याकडे नोंद करा. जेणेकरून तुमच्या आयुष्यात असे प्रसंग उद्भवल्यास तुम्हाला त्या प्रसंगाशी कसे तोंड द्यायचे आहे याची आपली वैचारिक तयारी झालेली असेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घेण्याची सवय लागली, की तुमचे निर्णय चुकणार नाहीत आणि एखादा निर्णय चुकला तरी त्यावर मात करण्यासाठी तुम्ही सिद्ध असाल. 

>> कठीण प्रसंगात आपण त्या प्रसंगाला तोंड कसे देतो, यावर यशापयश आवलंबून असते. सकारात्मक विचार करणारी व्यक्ती प्रत्येक कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याचे सामर्थ्य बाळगते. अशी व्यक्ती शांत डोक्याने प्रत्येक गोष्ट यशस्वीपणे पार पाडू शकते.