शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Chanakyaniti: गरीब घरात जन्माला आलात? हरकत नाही, पण गरिबीत मरू नका! - आचार्य चाणक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 12:47 IST

Chanakyaniti: महान अर्थतज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी आचार्य चाणक्य केवळ नैतिकतेला धरून श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवतात. 

आचार्य चाणक्य यांचे विचार वास्तवाला धरून असतात त्यामुळे ते प्रतिगामी वाटत नाहीत तर कालसुसंगत वाटतात. प्रस्तुत लेखातही आचार्यांनी श्रीमंत होण्याचे दोन मुख्य मार्ग सांगितले आहेत. ते जाणून घेऊ. 

आचार्य चाणक्य आपल्या नीतिशास्त्र चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की जर पैसा कमावण्याचा मार्ग चुकीचा असेल तर खूप पैसा मिळवूनही तो टिकणार नाही आणि माणूस गरीब व्हायला वेळ लागणार नाही. अशी व्यक्ती जितक्या लवकर श्रीमंत होईल तितक्या लवकर त्याचे पैसे निघून जातील आणि ती पूर्वीपेक्षा गरीब होतील. पैसा कमावणे कठीण नाही, पण तो टिकवणे महाकठीण. यासाठी दोन गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. त्या पुढीलप्रमाणे- 

नाशवंत संपत्ती : 

चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जे वाममार्गाने अर्थात चुकीच्या पद्धतीने कमावतात ते वरकरणी आपल्याला सुखी वाटत असतील पण जेव्हा त्यांचा पैसा उतरंडीला लागतो, तेव्हा त्यांच्याकडे पैसा, मान, मरातब काहीच उरत नाही. चोरी, खोटे बोलणे, फसवणूक करून माणूस कमी वेळात नक्कीच श्रीमंत होऊ शकतो, परंतु असा पैसा अपघात, आजारपण, फसवणूक अशा मार्गाने वेगाने निघून जातो. असा पैसा तुम्हालाही पापाचा भागीदार बनवतो. हा पैसा तुम्हाला काही काळ आनंद देतो, परंतु नंतर तो अनेक समस्यांना कारणीभूत ठरतो, त्यामुळे कधीही अनैतिक मार्गाने पैसे कमवू नका, लवकर श्रीमंत होण्यासाठी चुकीचे मार्ग निवडू नका नाहीतर आता जेवढ्या गरिबीत आहात त्याहून जास्त दारिद्र्याच्या खायीत लोटले जाल. 

दान धर्म: 

लक्ष्मी चंचल असते. तिला एका जागी अडवून ठेवू नका. ती नाश पावेल. व्यापाऱ्यांना बघा. ते पैशातून पैसा वाढवतात. गुंतवणूक करतात. दानधर्म करतात आणि साठवणूकही करतात. याउलट नोकरदार माणूस फक्त कमवतो आणि साठवतो. त्याठिकाणी लक्ष्मी स्थिर राहत नाही. यासाठी तिचा सदुपयोग करा. जितके द्याल त्याच्या दुप्पट परत मिळेल. गरजू, गरीब लोकांवर आपल्या उत्पन्नाच्या दहा टक्के भाग धर्मदाय संस्थेसाठी, सामाजिक संस्थांसाठी दान करा, जेणेकरून तुमचे पैसे सत्कारणी लागतील, जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. याउलट साठवून ठेवलेले पैसे लवकर नष्ट होतील. त्या पैशांना पाय फुटण्याआधी आणि अध्यात्मिक भाषेत आपल्या ओंजळीतून सांडण्याआधी ते दान करायला शिका. तुम्ही दुसऱ्यांची ओंजळ भराल तेव्हा तुमची ओंजळ रीती न ठेवण्याची जबाबदारी परमेश्वर घेईल आणि लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहील.