शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

Chanakyaniti: गरीब घरात जन्माला आलात? हरकत नाही, पण गरिबीत मरू नका! - आचार्य चाणक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 12:47 IST

Chanakyaniti: महान अर्थतज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी आचार्य चाणक्य केवळ नैतिकतेला धरून श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवतात. 

आचार्य चाणक्य यांचे विचार वास्तवाला धरून असतात त्यामुळे ते प्रतिगामी वाटत नाहीत तर कालसुसंगत वाटतात. प्रस्तुत लेखातही आचार्यांनी श्रीमंत होण्याचे दोन मुख्य मार्ग सांगितले आहेत. ते जाणून घेऊ. 

आचार्य चाणक्य आपल्या नीतिशास्त्र चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की जर पैसा कमावण्याचा मार्ग चुकीचा असेल तर खूप पैसा मिळवूनही तो टिकणार नाही आणि माणूस गरीब व्हायला वेळ लागणार नाही. अशी व्यक्ती जितक्या लवकर श्रीमंत होईल तितक्या लवकर त्याचे पैसे निघून जातील आणि ती पूर्वीपेक्षा गरीब होतील. पैसा कमावणे कठीण नाही, पण तो टिकवणे महाकठीण. यासाठी दोन गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. त्या पुढीलप्रमाणे- 

नाशवंत संपत्ती : 

चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की जे वाममार्गाने अर्थात चुकीच्या पद्धतीने कमावतात ते वरकरणी आपल्याला सुखी वाटत असतील पण जेव्हा त्यांचा पैसा उतरंडीला लागतो, तेव्हा त्यांच्याकडे पैसा, मान, मरातब काहीच उरत नाही. चोरी, खोटे बोलणे, फसवणूक करून माणूस कमी वेळात नक्कीच श्रीमंत होऊ शकतो, परंतु असा पैसा अपघात, आजारपण, फसवणूक अशा मार्गाने वेगाने निघून जातो. असा पैसा तुम्हालाही पापाचा भागीदार बनवतो. हा पैसा तुम्हाला काही काळ आनंद देतो, परंतु नंतर तो अनेक समस्यांना कारणीभूत ठरतो, त्यामुळे कधीही अनैतिक मार्गाने पैसे कमवू नका, लवकर श्रीमंत होण्यासाठी चुकीचे मार्ग निवडू नका नाहीतर आता जेवढ्या गरिबीत आहात त्याहून जास्त दारिद्र्याच्या खायीत लोटले जाल. 

दान धर्म: 

लक्ष्मी चंचल असते. तिला एका जागी अडवून ठेवू नका. ती नाश पावेल. व्यापाऱ्यांना बघा. ते पैशातून पैसा वाढवतात. गुंतवणूक करतात. दानधर्म करतात आणि साठवणूकही करतात. याउलट नोकरदार माणूस फक्त कमवतो आणि साठवतो. त्याठिकाणी लक्ष्मी स्थिर राहत नाही. यासाठी तिचा सदुपयोग करा. जितके द्याल त्याच्या दुप्पट परत मिळेल. गरजू, गरीब लोकांवर आपल्या उत्पन्नाच्या दहा टक्के भाग धर्मदाय संस्थेसाठी, सामाजिक संस्थांसाठी दान करा, जेणेकरून तुमचे पैसे सत्कारणी लागतील, जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. याउलट साठवून ठेवलेले पैसे लवकर नष्ट होतील. त्या पैशांना पाय फुटण्याआधी आणि अध्यात्मिक भाषेत आपल्या ओंजळीतून सांडण्याआधी ते दान करायला शिका. तुम्ही दुसऱ्यांची ओंजळ भराल तेव्हा तुमची ओंजळ रीती न ठेवण्याची जबाबदारी परमेश्वर घेईल आणि लक्ष्मी मातेची सदैव कृपा राहील.