शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Chanakyaniti : सुखी कोणीही होऊ शकतं, पण समाधानी कसं व्हायचं ते सांगताहेत आचार्य चाणक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 17:21 IST

Chanakyaniti : सद्यस्थितीत सुख विकत घेऊ शकतील एवढा पैसा लोकांकडे आहे, पण समाधान हरवलं आहे; ते कुठे आणि कसं मिळवायच ते जाणून घ्या!

चाणक्य नीती हा महान कूटनीतीज्ञ आणि अर्थतज्ञ आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यात त्यांनी मानवी आयुष्यातील अनेक बाजूंवर सखोल विचार करून त्यावर तोडगे दिले आहेत. ते अमलात आणले तर आपल्यालाही यशस्वी आयुष्याच्या दिशेने निश्चितपणे घोडदौड करता येईल. यासाठी त्यांनी शिकवलेल्या नीतिमूल्यांचा बारकाईने अभ्यास करू आणि ते मंत्र आत्त्मसात करू. 

वादात पडायला कोणालाही आवडत नाही. मात्र अनेकदा आपण विनाकारण वादविवादात अडकतो आणि समोरच्याशी वैर घेऊन बसतो. त्यामुळे होणार मनःस्ताप आणखीनच वेगळा. या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुखाबरोबर समाधानी आयुष्य जगण्यासाठी आचार्य चाणक्य तीन गोष्टींवर ताबा मिळवा असे सुचवतात. त्या तीन गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊया. 

अहंकार : अहंकाराची बाधा झालेला मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही. स्वतःला सर्वेसर्वा समजण्यात आणि स्वतःची योग्यता सिद्ध करण्यात त्यांचे आयुष्य खर्च होते. गर्वाचे घर खाली, अशी आपल्याकडे म्हण आहे, ती यासाठीच! स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा. स्वाभिमान आत्मविश्वास वाढवतो तर अभिमान अहंकाराला खतपाणी घालतो! अहंकाराची पट्टी डोळ्यावर बांधली गेली की आपण आपल्या कलागुणांचा योग्य वापर करू शकत नाही. इतरांकडून चांगले शिकण्याची क्षमता गमावून बसतो. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, अशी देवाजवळ प्रार्थना करायची आणि आपण स्वतःशी कायम प्रामाणिक राहायचे!

स्वार्थ : स्वार्थाने बरबटलेली व्यक्ती दुसऱ्यांचे हित पाहू शकत नाही. ती आपल्याच कोशात असते. आपले भले कशात आहे, हे पाहण्याची क्षमता गमावून बसते. त्यातही ताणतणाव आणि वादग्रस्त परिस्थिती असेल, तर अशावेळी स्वार्थी व्यक्ती दुसऱ्यांसमोर लाचार होते. त्यांच्या तालावर नाचते आणि आत्मसन्मान गमावून बसते.

क्रोध : तुम्ही जेवढे आजवर काही कमावले, ते सगळे एका क्षणात गमावण्याची ताकद रागात असते. कारण तुमचा राग तुमच्या व्यक्तिमत्त्वाची उणी बाजू दाखवतो. राग, क्रोध रास्त जागी असेल तर समोरच्या जरब बसते. याउलट तो अनाठायी व्यक्त झाला तर केवळ एका शब्दाने नाहीतर कृतीने तुम्ही आजवर कमावलेला चांगुलपणा गमावून बसतो. 

अशा या तीन महत्त्वाच्या गोष्टी दिल्यानुसार आटोक्यात ठेवल्या तर या शहरी कोलाहलातही तुम्हाला शांतता आणि समाधान नक्की गवसेल!