शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
3
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
4
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
5
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
6
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
7
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
8
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
9
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
10
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
11
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
12
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
13
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
14
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
15
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
16
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
17
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
18
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
19
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
20
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या

विनायक चतुर्थीला अंगारक योग: प्रभावी गणपती अथर्वशीर्ष नियमित म्हणता? ‘या’ चुका होत नाही ना?

By देवेश फडके | Updated: March 31, 2025 21:14 IST

Chaitra Angarki Vinayaka Chaturthi April 2025: नियम पाळून केलेली उपासना अधिक लवकर फलद्रुप ठरते, असे सांगितले जाते. गणपती अथर्वशीर्ष पठण करताना १५ नियम पाळायलाच हवेत. जाणून घ्या...

Chaitra Angarki Vinayaka Chaturthi April 2025: वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ ३० मार्च २०२५ पासून हिंदू नववर्षाला सुरुवात झाली. गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर, ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी आहे. विशेष म्हणजे नववर्षातील पहिल्याच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येणे अतिशय शुभ, पुण्याचे मानले गेले असून, यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. ०१ एप्रिल २०२५ रोजी चैत्र शुद्ध चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी अंगारक योग आहे. यानिमित्ताने गणपतीच्या विशेष पूजनासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळेस आवर्जून गणपती अथर्वशीर्ष या अत्यंत प्रभावी स्तोत्राचे पठण केले जाते. 

प्रत्येक मासाच्या शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे. विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. 

नियम पाळून केलेली उपासना अधिक लवकर फलद्रुप होते

विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. अंगारकी विनायक चतुर्थीला उपवास करण्यासह बाप्पाची मनोभावे उपासना केली जाते. गणपतीचे अनेक प्रभावी मंत्र, स्तोत्रे या दिवशी म्हटले जातात. यापैकी गणपती अथर्वशीर्ष हे सर्वाधिक प्रभावी मानले जाते. काही घरांमध्ये नियमितपणे पठण केले जाते. मात्र, गणपती अथर्वशीर्ष म्हणताना काही गोष्टींचे भान ठेवावे लागते. नियम पाळावे लागतात. नियम पाळून केलेली उपासना अधिक लवकर फलद्रुप ठरू शकते, असे सांगितले जाते. 

अथर्वशीर्ष हे एक उपनिषद, गणपतीच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन 

अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली आहे. अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्त्व आहे. या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केले आहे. गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही, तर तो चराचरात, कणाकणात सामावला आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते, असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय, असे म्हटले आहे.

गणपती अथर्वशीर्षाचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होऊ शकते

गणपती अथर्वशीर्षाचे एक हजार वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सन्निध असतो. त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरुपाची प्रचिती देणारे आहे. गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला, तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून, तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. 

गणपती अथर्वशीर्ष पठण करताना १५ नियम पाळायलाच हवेत

- गणपती अथर्वशीर्ष म्हणताना उच्चार अगदी स्पष्ट असावे.

- अथर्वशीर्ष अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.

- अथर्वशीर्ष पठण भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केले पाहिजे.

- देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे. 

- पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे. 

- स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत.

- स्तोत्राचे पावित्र्य जपण्यासाठी शुचिर्भूतता पाळावी.

- अथर्वशीर्षाचा पठण करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा. 

- गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी. 

- पूजा करणे शक्य नसल्यास गणपतीचे मनोभावे ध्यान, स्मरण करावे, नमस्कार करावा.

- अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा.

- एकापेक्षा अधिक वेळा अथर्वशीर्ष म्हणावयाचे असेल, तेव्हा 'वरदमूर्तये नमः।' येथेपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती देण्यात आली असून, ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी.

- अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.

- सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर ३,७,९,११, २१ वेळा आवर्तने करावीत. मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणा, तरच लाभ होईल.   

- गणपती अथर्वशीर्ष पाठ नसेल तर श्रवण करावे. मात्र, डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवावे. जेणेकरून मन भटकणार नाही आणि उद्देश पूर्ण होईल, असे सांगितले जाते. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||

टॅग्स :vinayak chaturthiविनायक चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकganpatiगणपती 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी