शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Chaitra Navratra 2022 : चैत्र प्रतिपदेला आपल्या देवघरात विसावलेल्या गौरीचे माहेरपण कसे कराल? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 18:04 IST

Chaitra Navratra 2022: चैत्रात गौरी तिच्या माहेरी येते. सगळे कौतुकसोहळे करवून घेते आणि जाते कधी? सविस्तर वाचा.

महाराष्ट्रात चैत्र शुक्ल तृतीयेला सुवासिनी देवघरातल्या अन्नपूर्णेची गौर म्हणून वेगळे आसन देऊन स्थापना करतात व  महिनाभर तिची पूजा करतात. त्यानिमित्ताने सोयीनुसार चैत्रातील कुठल्याही मंगळवारी अथवा शुक्रवारी हळदीकुंकू समारंभ करतात. त्यावेळी घरी आलेल्या लेकी सुनांचे पाय धुतात. त्यांच्या हातांना थंडाव्याचे प्रतीक म्हणून चंदनाचा लेप लावून मग त्यावरून शिंपल्याचा वरचा शिरांचा भाग फिरवतात. यावेळी भिजवलेल्या हरभऱ्यांनी फळासह ओटी भरतात. वाटली डाळ आणि कैरीचे पन्हे हा या समारंभातील आतिथ्याचा एक भाग असतो. यावेळी 'गौरीचे माहेर' नावाचे एक गाणे आरतीत म्हटले जाते. चैत्रात गौरी तिच्या माहेरी येते. सगळे कौतुकसोहळे करवून घेते आणि अक्षय्यतृतीयेला परत सासरी जाते, असे मानून सारे विधी केले जातात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर या सोहळ्याचे सुंदर वर्णन करतात...

चैत्रांगण : गौरीसमोर अथवा गौरीसाठथी घराबाहेरील अंगणात एका चौकोनात वेगवेगळ्या सुबक रांगोळ्या काढणे हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट असते. या रांगोळीला चैत्रांगण असे म्हणतात. या रांगोळ्या चंद्र, सूर्य, गोपद्म, कासव, हत्ती, तुळशीवृंदावन, फेर धरून नाचणाऱ्या मुली, शंख, चक्र, गदा, स्वस्तिक, कमळ, लक्ष्मीची पावले, राधाकृष्ण अशासारखे ठराविक विषय, प्रतीक म्हणून रेखाटल्या जातात. रोज सकाळी अंगण सारवून अशा रांगोळ्या काढून त्यांना हळद, कुंकू, फुले वाहतात.

चैत्रांगणाच्या निमित्ताने रांगोळ्या काढण्याच्या प्रथेमुळे मुलींमधील, स्त्रियांमधील सुप्त कलागुणांना प्रकट होण्यास वाव मिळतो. रांगोळी हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे वातावरण अधिक मंगलमय होते. नेत्रदीपक रांगोळी रेखाटल्याचे स्त्रीमनाला समाधान मिळते. चैत्रांगण रेखाटताना तोच आनंद मनाला व्यापून टाकतो. वसंत ऋतूबरोबर बहरणारी चैत्रपालवी चैत्रांगणाच्या निमित्ताने स्त्रीमनालादेखील उल्हसित करावी, हा त्यामागता हेतू!

पूर्वी हळदीकुंकवासारखे समारंभ घराचा उंबरठा सहसा ओलांडू न शकणाऱ्या स्त्रियांना विरंगुळा मिळावा, समाजातील, गावातील इतर स्त्रियांशी परिचय व्हावा, ताणतणावातून थोडा विसावा मिळावा, नित्याच्या कामातून घटकाभर करमणूक व्हावी म्हणून अतिशय उत्साहाने केले जात. आता स्त्रिया अर्थार्जनासाठी घराबाहेरच्या जगात वावरत असल्या, तरी त्यांनाही अनेक व्याप ताप असतात. चिंता, काळजी असते. या चिंता, विवंचना काही काळ विसता याव्यात, तणाव हलके व्हावेत म्हणून आजही असे हळदीकुंकू समारंभ आवश्यक आहेत. अशा समारंभात सर्व स्तरातील स्त्रियांनी एकत्र आले पाहिजे. सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची संधी देणारा हा चैत्र नवरात्रीचा आनंदसोहळा आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीgudhi padwaगुढीपाडवा