शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अशांतीचे कारण बाहेर नाही, तर आपल्या आत असते - ओशो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 20:06 IST

खरे पाहता अशांती तुमच्या अहंकारात आहे. तुमच्या अहंकाराची प्रतिक्रिया होते आणि मग तुम्ही म्हणता ही अशांती आहे.

आपण मनाशी नेहमी असा विचार करत असतो की इतर कुणी तरी मला अशांत करत आहे. रस्त्यावर जाणाऱ्या ट्रॅफिकचा आवाज, चहुकडे खेळणाऱ्या मुलांचा कलकलाट, स्वयंपाकघरात काम करणारी पत्नी प्रत्येक जण तुम्हाला अशानत करत असतो. पण हे खरे नव्हे. तुम्हाला कुशीही अशांत करू शकत नाही. तुम्ही स्वत:च अशांतीचे कारण आहात. तुम्ही अस्तित्वात असल्याने कुणीही काहीही तुम्हाला अशांत करू शकते. तुम्ही अवस्थितच नसाल तर अशांती येईल आणि अंतातील रित्ततेला स्पर्शही न करता निघून जाईल. पण तुम्ही असे असता, की सगळे काही तुम्हाला फार लवकर स्पर्श करते. जणू कसल्याही गोष्टीचा घाव पडतो. जखम होते. लगेच तुम्हाला लागते. 

मी इथे बोलतोय. जर इथे कुणीच नसेल, तर मी बोलत राहिलो तरी आवाज निर्माण होणार नाही. पण मी आवज निर्माण करू शकतो. कारण मी स्वत: तरी आवाज ऐकतोच. जर ऐकायला कुणीच नसेल, अगदी मी ही नसेन. नामरुपात्मक मी विलीन होऊन अंतरात रिक्तता असेल. तर आवाज निर्माण होणार नाही. कारण आवाज ही तुमच्या कानांची प्रतिक्रिया आहे. 

खरे पाहता अशांती तुमच्या अहंकारात आहे. तुमच्या अहंकाराची प्रतिक्रिया होते आणि मग तुम्ही म्हणता ही अशांती आहे. ही तुमची व्याख्या आहे. कधी कोणत्या तरी दुसऱ्या स्थितीत, तुम्ही त्याच गोष्टीचा आनंद अनुभवू शकता. त्या वेळी तीच गोष्ट अशांती वाटणार नाही. मन आनंदी असेल, तेव्हा एखाद्या संगीताबद्दल म्हणाल, हे किती छान संगीत आहे. पण मन उदास असेल तर सुश्राव्य संगीतदेखील अशांतीचा अनुभव देईल. 

जर तुम्ही उरलाच नाही, तर मग फक्त अवकाश उरेल. एक शून्य, रिकामी अवस्था असेल. आत कुणी नाहीच म्हटल्यावर प्रतिक्रिया कशी उमटणार? कोण प्रत्युत्तर देणार? ही रिक्त अवस्था अनुभवून पहा. कोणत्याही निष्क्रिय अवस्थेत बसा. काहीही करू नका. निष्क्रियपणे बसाल, ध्यान करू लागाल, तेव्हा क्रिया करणारा मी कर्ता हा अहंभाव राहत नाही. जेव्हा अहंभाव लोप पावेल, तेव्हा अशांतीचे कारणच राहणार नाही.