शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

अशांतीचे कारण बाहेर नाही, तर आपल्या आत असते - ओशो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 20:06 IST

खरे पाहता अशांती तुमच्या अहंकारात आहे. तुमच्या अहंकाराची प्रतिक्रिया होते आणि मग तुम्ही म्हणता ही अशांती आहे.

आपण मनाशी नेहमी असा विचार करत असतो की इतर कुणी तरी मला अशांत करत आहे. रस्त्यावर जाणाऱ्या ट्रॅफिकचा आवाज, चहुकडे खेळणाऱ्या मुलांचा कलकलाट, स्वयंपाकघरात काम करणारी पत्नी प्रत्येक जण तुम्हाला अशानत करत असतो. पण हे खरे नव्हे. तुम्हाला कुशीही अशांत करू शकत नाही. तुम्ही स्वत:च अशांतीचे कारण आहात. तुम्ही अस्तित्वात असल्याने कुणीही काहीही तुम्हाला अशांत करू शकते. तुम्ही अवस्थितच नसाल तर अशांती येईल आणि अंतातील रित्ततेला स्पर्शही न करता निघून जाईल. पण तुम्ही असे असता, की सगळे काही तुम्हाला फार लवकर स्पर्श करते. जणू कसल्याही गोष्टीचा घाव पडतो. जखम होते. लगेच तुम्हाला लागते. 

मी इथे बोलतोय. जर इथे कुणीच नसेल, तर मी बोलत राहिलो तरी आवाज निर्माण होणार नाही. पण मी आवज निर्माण करू शकतो. कारण मी स्वत: तरी आवाज ऐकतोच. जर ऐकायला कुणीच नसेल, अगदी मी ही नसेन. नामरुपात्मक मी विलीन होऊन अंतरात रिक्तता असेल. तर आवाज निर्माण होणार नाही. कारण आवाज ही तुमच्या कानांची प्रतिक्रिया आहे. 

खरे पाहता अशांती तुमच्या अहंकारात आहे. तुमच्या अहंकाराची प्रतिक्रिया होते आणि मग तुम्ही म्हणता ही अशांती आहे. ही तुमची व्याख्या आहे. कधी कोणत्या तरी दुसऱ्या स्थितीत, तुम्ही त्याच गोष्टीचा आनंद अनुभवू शकता. त्या वेळी तीच गोष्ट अशांती वाटणार नाही. मन आनंदी असेल, तेव्हा एखाद्या संगीताबद्दल म्हणाल, हे किती छान संगीत आहे. पण मन उदास असेल तर सुश्राव्य संगीतदेखील अशांतीचा अनुभव देईल. 

जर तुम्ही उरलाच नाही, तर मग फक्त अवकाश उरेल. एक शून्य, रिकामी अवस्था असेल. आत कुणी नाहीच म्हटल्यावर प्रतिक्रिया कशी उमटणार? कोण प्रत्युत्तर देणार? ही रिक्त अवस्था अनुभवून पहा. कोणत्याही निष्क्रिय अवस्थेत बसा. काहीही करू नका. निष्क्रियपणे बसाल, ध्यान करू लागाल, तेव्हा क्रिया करणारा मी कर्ता हा अहंभाव राहत नाही. जेव्हा अहंभाव लोप पावेल, तेव्हा अशांतीचे कारणच राहणार नाही.