शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आपल्याला आपल्या क्षेत्रात सचिनसारखी उंची गाठता येईल का? जाणून घ्या त्याच्या यशाचे गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:39 IST

मास्टरब्लास्टर सचिनने आज वयाची हाफ सेंचुरी पूर्ण केली, त्यानिमित्ताने त्याच्या प्रवासाचे आणि निवृत्तीनंतरच्याही लोकप्रियतेचे गमक जाणून घेऊ. 

क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस. त्याने वयाची ५० वर्षे पूर्ण केली. क्रिकेट क्षेत्रातला हा विक्रमादित्य निवृत्ती नंतरही आपली लोकप्रियता टिकवून आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर आधीपासूनच सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडू लागला आहे आणि आज तर यत्र तत्र सर्वत्र त्याचेच नाव घेतले जात आहे. हे यश मिळण्यामागे त्याचे कठोर परिश्रम आणि सचोटी तर आहेच, पण त्याही पलीकडे आहे एक शिस्त, कोणती ते जाणून घेऊ!

आपण सर्वांनी सचिनला खेळताना पाहिले आहे. सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून २० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा एका मुलाखतीत त्याला विचारले गेले, 'तुमच्या यशाचे रहस्य काय?'सचिनने सांगितले, मी क्रिकेट फक्त खेळत नाही, तर क्रिकेट जगतो. दिवसाचे २४ तास, प्रत्येक क्षण मी क्रिकेटबद्दल विचार करतो. क्रिकेट शिकायला सुरुवात केली, त्या दिवसापासून एकही सकाळी ६ वाजताचा सराव मी चुकवलेला नाही.'मुलाखतकाराने विचारले, `पण आदल्या दिवशीच्या मॅचमध्ये तुम्ही सेंच्युरी किंवा डबल सेंच्युरी घेतली असेल तर?त्यावर सचिनने सांगितले, `तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मी सरावाला हजर असेन!'मुलाखतकार म्हणाला, 'पण तुम्हाला उत्सुकता नसते का? की कालच्या खेळीबद्दल पेपरमध्ये आपल्याबद्दल काय छान छान छापून आले असेल? किंवा एखाद्या लेखात कोणी शेरेबाजी केली असेल, याची काळजी वाटत नाही का?'सचिन म्हणाला, 'मी सरावाला गेल्यावर ५०० धावांचे ध्येय पूर्ण केल्याशिवाय पेपर हातातही घेत नाही. आधी खेळ मग कौतुक! मी माझा सराव सोडून स्वत:चे कौतुक वाचत बसलो, तर मी आता जिथे आहे, तिथे राहू शकणार नाही आणि जिथपर्यंत मला पोहोचायचे आहे, तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही!'

हेच आहे सचिनचे 'सचिनपण'! स्वप्न सगळेच पाहतात, परंतु सगळेच जण कठोर परिश्रम घेतात असे नाही. सामान्य प्रयत्नांनी व्यक्ती सामान्य राहते, तर असामान्य प्रयत्नांनी असामान्य बनते. परंतु, त्यासाठी अविश्रांत मेहनत आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास घ्यावा लागतो. 

रोज नवीन दिवस उगवतो. त्या दिवसाचा वापर कोण कसा करतो, यावर प्रगती अवलंबून असते. पळतात सगळेच, पण ध्येयाच्या दिशेने पळणारे कमी असतात. आपले ध्येय मिळवण्याचा ध्यास, त्यासाठी केलेली आखणी, परिश्रम, स्वत:ला सतत प्रोत्साहित ठेवण्याची तयारी, अडचणींवर मात करायची तयारी मनुष्याला समृद्ध बनवते. आर्थिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवते. 

आजवरच्या सर्व यशस्वी लोकांची आत्मचरित्रे वाचली, तर एक गोष्ट लक्षात येईल, की ते सगळेच जण सकाळी लवकर उठत असत़  उठल्यावर पहिला एक तास आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक गोष्टींना देत असत. त्या सकाळच्या एका तासात कमावलेली सकारात्मक ऊर्जा दिवसभर वापरत असत.

यावरून शिकण्यासारखे हेच आहे, की केवळ सचिन आवडतो, एवढे म्हणून भागणार नाही, तर सचिन सारखे बनायचे असेल, तर कठोर आणि प्रामाणिक परिश्रमाची तयारी हवी. प्रत्येक काम कर्तव्यबुद्धीने आणि ईश्वराप्रती श्रद्धा ठेवून आत्मविश्वासाने केले, तर आणि तरच आपल्याला आपले ध्येय पूर्ण करता येईल, तसेच आपल्याला आपल्या क्षेत्रात सचिनसारखी भरीव कामगिरी करता येईल. 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकर