शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाईट सवयी बदलता येतात का? हो! नक्की येतात! पण कधी आणि कशा? ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:34 IST

व्यक्ती वाईट नसते, सवयी वाईट असतात. त्या सवयी दूर झाल्या तर चांगुलपणा मूळ धरतो!

वाईट सवयींचा शेवट हा पश्चात्तापात असतो. वेळ निघून गेलेली असते आणि परतीचे मार्गही बंद झालेले असतात. पण वाईट सवयी एका रात्रीत जडतात का? अजिबात नाही! त्याची सुरुवात होत असताना आपले सुप्त मन आपल्याला सावध करते, परंतु आपण मनाचे ऐकत नाही. एक एक वीट रचत जातो आणि अभेद्य भिंत तयार होते. याबाबत एक गोष्ट सांगितली जाते. 

एक गुरु आणि शिष्य जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक अंकुर फुटलेला दिसतो. गुरुजी सांगतात, ते उपटून टाक. शिष्य लगेच तशी कृती करतो. काही पावलं पुढे गेल्यावर त्यांना एक रोपटं दिसतं. गुरुजी सांगतात, ते रोपटं उपटून टाक. शिष्य तसे करतो. आणखी काही अंतर पार केल्यावर एक पाच सात फुटी वाढलेलं झाड दिसतं. गुरुजी सांगतात, ते उपटून टाक. थोडी शक्ती लावत शिष्य तेही उपटून टाकतो. आणखी पुढे गेल्यावर एक वटवृक्ष दिसतो. गुरुजी सांगतात, यालाही उपटून टाक. शिष्य म्हणतो, 'गुरुजी हे कसं शक्य आहे? याची पाळं मूळं जमिनीत खोलवर रुतली आहेत. ती काढणं अशक्य आहे.' गुरुजी म्हणतात, 'मी हेच तुम्हाला शिकवत असतो. जेव्हा तण दिसतात, ते वेळीच उपटून टाकायला हवेत. त्याचं रूपांतर झाडात झालं तर ते उपटून टाकणं अशक्य होतं.' 

ज्या सवयी आता क्षणिक सुख देत आहेत, त्या भविष्यात आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत, याची सूचना अंतर्मन देतं तेव्हा वेळीच सावध व्हा. वाईट सवयींची पाळं मूळं खोलवर रुतण्याआधी ती उपटून टाका. मनाची उत्तम मशागत करा. तसे केले तर वाईट सवयी आणि त्यापासून होणारा प्रादुर्भाव यापासून आपण स्वतःला नक्कीच वाचवू शकतो याची खात्री बाळगा. 

आजपासून आपल्या मनातलं वाईट सवयींचं रोप किती वाढलं आहे ते चाचपून पहा आणि जरी ते खोलवर गेलं असेल तरी ते निरुपयोगी असल्याने मुळासकट काढून टाकण्याचा प्रयत्न करा, नक्की जमेल!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी