शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वाईट सवयी बदलता येतात का? हो! नक्की येतात! पण कधी आणि कशा? ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:34 IST

व्यक्ती वाईट नसते, सवयी वाईट असतात. त्या सवयी दूर झाल्या तर चांगुलपणा मूळ धरतो!

वाईट सवयींचा शेवट हा पश्चात्तापात असतो. वेळ निघून गेलेली असते आणि परतीचे मार्गही बंद झालेले असतात. पण वाईट सवयी एका रात्रीत जडतात का? अजिबात नाही! त्याची सुरुवात होत असताना आपले सुप्त मन आपल्याला सावध करते, परंतु आपण मनाचे ऐकत नाही. एक एक वीट रचत जातो आणि अभेद्य भिंत तयार होते. याबाबत एक गोष्ट सांगितली जाते. 

एक गुरु आणि शिष्य जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक अंकुर फुटलेला दिसतो. गुरुजी सांगतात, ते उपटून टाक. शिष्य लगेच तशी कृती करतो. काही पावलं पुढे गेल्यावर त्यांना एक रोपटं दिसतं. गुरुजी सांगतात, ते रोपटं उपटून टाक. शिष्य तसे करतो. आणखी काही अंतर पार केल्यावर एक पाच सात फुटी वाढलेलं झाड दिसतं. गुरुजी सांगतात, ते उपटून टाक. थोडी शक्ती लावत शिष्य तेही उपटून टाकतो. आणखी पुढे गेल्यावर एक वटवृक्ष दिसतो. गुरुजी सांगतात, यालाही उपटून टाक. शिष्य म्हणतो, 'गुरुजी हे कसं शक्य आहे? याची पाळं मूळं जमिनीत खोलवर रुतली आहेत. ती काढणं अशक्य आहे.' गुरुजी म्हणतात, 'मी हेच तुम्हाला शिकवत असतो. जेव्हा तण दिसतात, ते वेळीच उपटून टाकायला हवेत. त्याचं रूपांतर झाडात झालं तर ते उपटून टाकणं अशक्य होतं.' 

ज्या सवयी आता क्षणिक सुख देत आहेत, त्या भविष्यात आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत, याची सूचना अंतर्मन देतं तेव्हा वेळीच सावध व्हा. वाईट सवयींची पाळं मूळं खोलवर रुतण्याआधी ती उपटून टाका. मनाची उत्तम मशागत करा. तसे केले तर वाईट सवयी आणि त्यापासून होणारा प्रादुर्भाव यापासून आपण स्वतःला नक्कीच वाचवू शकतो याची खात्री बाळगा. 

आजपासून आपल्या मनातलं वाईट सवयींचं रोप किती वाढलं आहे ते चाचपून पहा आणि जरी ते खोलवर गेलं असेल तरी ते निरुपयोगी असल्याने मुळासकट काढून टाकण्याचा प्रयत्न करा, नक्की जमेल!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी