शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

Budhha Purnima 2022 : भगवान बुद्ध सांगतात, 'तुम्ही श्रीमंत आहात कारण तुमच्याकडेसुद्धा 'या' पाच गोष्टी आहेत!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 09:40 IST

Budha Purnima 2022: सुखासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाला त्याच्याकडे असलेल्या श्रीमंतीची भगवान बुद्धांनी जाणीव करून दिली आहे. 

सुखी, समाधानी व्हावे आणि त्याबरोबरच श्रीमंतही व्हावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठीच तर प्रत्येक मनुष्य धड पडेपर्यंत धडपडत राहतो. अशा अस्वस्थ जीवाला भगवान बुद्ध पुढील गोष्टींची जाणीव करून देत दिलासा देत आहेत. या गोष्टींची जाणीव आपल्या मनाला झाली तर खऱ्या अर्थाने बुद्ध पौर्णिमा साजरी झाली असे म्हणता येईल. 

एकदा एक शिष्य भगवान बुध्दांजवळ आला आणि म्हणाला, 'भगवान, मी श्रीमंत का नाही?'भगवान म्हणाले, 'कारण तू उदार नाहीस!'शिष्य म्हणाला, 'भगवान, उदार तीच व्यक्ती असते, जी श्रीमंत असते. मी दरिद्री कसली उदारता दाखवणार?'भगवान म्हणाले, 'दरिद्री? तू तर श्रीमंत आहेस. तूच नाही, जगातली प्रत्येक व्यक्ती श्रीमंत आहे. कारण प्रत्येकाकडे पाच रत्न आहेत.'शिष्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला, 'रत्न आणि माझ्याजवळ? कोणती रत्न भगवान? कृपया सविस्तर सांगा.' भगवान स्मित वदनाने सांगू लागले... 

'पहिले रत्न, स्मित हास्य. लोकांकडे एवढे प्रश्न आहेत, समस्या आहेत की ते हसणे विसरले आहेत. तुझ्याकडे हास्य आहे. ते तू देऊन बघ. तुला पाहून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित आल्यावाचून राहणार नाही. एक स्मित हास्य समोरच्याला क्षणभर का होईना दुःख विसरायला भाग पाडते. 

' दुसरे रत्न, डोळे. या डोळ्यांनी आपण जगाकडे पाहतो. पण आपली नजर स्नेहार्द्र असेल, तर केवळ नजरेने समोरच्याला दिलासा मिळू शकतो. आश्वासक नजर फार महत्त्वाची असते. ती नजर कोणाला सकारात्मकता तर कोणाच्या जगण्याला बळ देते. नजरेत प्रेम, माया, वात्सल्य, सहानुभूती असे अनेक भाव दडलेले असतात. अशा प्रेमळ नजरेसाठी अनेक जण आसुसलेले आहेत. 

'तिसरे रत्न, जीभ. ही केवळ विविध पदार्थांचे रस चाखण्यासाठी नाही, तर चांगले बोलण्यासाठी देखील वापरली पाहिजे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याला प्रोत्साहन देता आले, विश्वास देता आला, कौतुक करता आले, तर त्याचा सकारात्मक परिणाम दुसऱ्याच्या आयुष्यावर नक्कीच होऊ शकतो. म्हणून चांगले बोला. खोटे कौतुक किंवा खोटी प्रशंसा नाही, तर जगायला बळ देणारे दोन शब्द पुरेसे असतात. 

'चौथे रत्न, हृदय. तुमच्या हृदयात दुसऱ्यांबद्दल केवळ मत्सर, राग, द्वेष आणि अहंभाव भरलेला आहे. या गोष्टी हृदयाला उपयोगाच्या नाहीत. उलट त्या हानिकारक आहेत. त्या काढून टाकून हृदयाची जागा प्रेमाने भरून टाका. ज्याचे हृदय प्रेमाने, आनंदाने भरलेले असेल, तोच दुसऱ्याला प्रेम आणि आनंद देऊ शकेल.'

'पाचवे रत्न, शरीर. आपल्याला मिळालेल्या सुदृढ शरीराचा वापर केवळ स्वतः साठी न करता दुसऱ्यांसाठी सुद्धा करा. जेव्हा तुम्ही लोकोपयोगी ठराल, तेव्हा त्या जाणिवेने तुम्ही अधिकाधिक समृद्ध व्हाल. ही जाणीव म्हणजे खरी श्रीमंती! आता मला सांग, ही पाच रत्न तुझ्याजवळ असताना तू गरीब आहेस की श्रीमंत?'

शिष्य उत्तरला, 'भगवान माझ्या श्रीमंतीची तुम्ही मला जाणीव करून दिलीत. या रत्नांचा मी सदुपयोग करेन आणि दुसऱ्यांनाही त्याची जाणीव करून देईन. सगळ्यांना या रत्नांची ओळख झाली आणि प्रत्येकाने त्याचा योग्य वापर करायचा ठरवला, तर हे जगच किती श्रीमंत होईल नाही?'