शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शरीररूपी संगणकाला हवा ईश्वररूपी अँटीव्हायरस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 08:00 IST

शरीर सचेतन ठेवण्यात मनाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते.

संगणक एक यंत्र आहे. त्याच्यामुळे अनेक काम सोपी होतात, परंतु ते स्वयंचलित नाही. त्याला चालना देण्यासाठी दुसरी यंत्रणा कार्यक्षम असावी लागते. ती वेगवेगळ्याप्रकारे कार्य करते. 

आपले शरीरही संगणकासारखे आहे. आपल्या शरीरात इंद्रिय, मेंदू, हृदय, मन हे भाग शरीररूपी संगणकाला नियंत्रित करतात़ बाह्य गोष्टी आत्मसात करून शरीरात सेव्ह किंवा डाऊनलोड करतात. परंतु संगणात ज्याप्रमाणे अँटीव्हायरस नसेल, तर आतील सगळा डेटा करप्ट होतो, त्याप्रमाणे शरीरातील बाह्य गोष्टी आत्मसात करत असताना त्यांचा चांगला आणि वाईट दोन्हीप्रकारे परिणाम होतो. यासाठी मनाचा अँटीव्हायरस कार्यन्वित असायला हवा. अन्यथा शरीररूपी संगणक नादुरुस्त होईल.

शरीर सचेतन ठेवण्यात मनाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. म्हणून संत सांगतात, 'मन करा रे प्रसन्न, साऱ्या सिद्धीचे कारण!' मन स्वस्थ असेल, तर शरीरही स्वस्थ राहील. स्वस्थ शरीर आत्म्याशी संवाद साधून परमात्मापर्यंत पोहोचू शकेल.

या गोष्टी पुस्तकी वाटत असल्या, तरी जेव्हा आपण स्वानुभव घेतो, तेव्हा खरी प्रचिती येते. ईश्वराशी जोडले जाणे, अजिबात कठीण नाही. तो बाहेर नाही, आपल्या आत आहे. तोच आपल्या शरीरात अँटीव्हायरसचे काम करतो. त्याच्याशी नित्य संवाद साधला नाही, तर तो काम करणे बंद करतो. तो क्रियाशील ठेवण्यासाठी रोज परमेश्वराचे स्मरण करा, त्याच्याशी संवाद साधा आणि आपल्या मनातील अनावश्यक डेटा कंट्रोल+अल्ट+डिलिट करून टाका...!