शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ चमत्कारांनी नाही तर आपल्या प्रेरक विचारांनी सत्संग घडवणारे सत्यसाई बाबा यांची जयंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 11:33 IST

आताचे जग हे चमत्कारापुढे नमस्कार करणारे आहे, म्हणूनच की काय सत्यसाई बाबांनी लोकांना सत्संगाला लावण्यासाठी चमत्काराचीही जोड दिली!

सत्यसाई बाबांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ मध्ये झाला आणि त्यांनी शेवटचा श्वास २४ एप्रिल २०११ मध्ये घेतला.  त्यांच्या नावे आजही जगभरात अनेक सत्संगाचे कार्यक्रम होतात. दानधर्म केले जातात. त्यांच्या नावे अनेक धार्मिक संस्था देखील आहेत. २३ नोव्हेंबर रोजी त्यांची जयंती. त्यामुळे त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. 

सत्यसाई बाबा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पुट्टापर्थी गावात झाला. मूल व्हावे म्हणून त्यांच्या आईने सत्यनारायणाची कथा ठेवली होती आणि त्या पूजेचा प्रसाद फळास आला. कालांतराने पुत्र झाला. सत्यनारायणाच्या कृपेने झाला म्हणून त्याचे नाव ‘सत्यनारायण’ ठेवण्यात आले. बालपणी त्यांना "सत्यनारायण राजू" नावाने हाक मारली जात असे. 

त्यांच्या जन्माच्या वेळी अनेक चमत्कार घडल्याचे सांगितले जाते. जसे की वाद्यांचा आवाज आपसुख कानी पडला. फणाधारी नागाचे दर्शन घडले आणि त्या नागाने बाळाच्या डोक्यावर सावलीरूपी फणा धरला आणि तो तिथून निघून गेला. अशा घटनांमुळे हे बालक असाधारण आहे असा घरच्यांचा विश्वास बसला. 

लहानपणापासूनच ते अष्टपैलू होते. शाळेत शिकत असताना त्यांना विंचू चावला आणि ते बेशुद्ध होऊन कोमात गेले. कोमातून शुद्धीवर आले, तेव्हा त्यांचे वागणे बदलले. त्यांनी खाणेपिणे बंद केले आणि फक्त श्लोक आणि मंत्रांचे पठण केले. अवघ्या ८ व्या वर्षी त्यांनी सुंदर भजन रचण्यास सुरुवात केली. २३ मे १९४० रोजी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी आपल्या अवताराची घोषणा केली आणि आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी समर्पित केले.

प्रत्येकाला उपजीविकेचे मूलभूत साधन उपलब्ध करून देणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे असे सत्यसाई बाबा मानत होते. सत्यसाई हे सर्व धर्माच्या लोकांसाठी प्रेरणास्थान होते. सत्यसाई बाबांनी १७८ देशांमध्ये धर्मप्रसाराची केंद्रे स्थापन केली आहेत. आयुष्यातील ८५ वर्षे शांततापूर्ण जीवन जगणाऱ्या सत्यसाईंनी २४ एप्रिल २०११ रोजी देहत्याग केला. सर्वांवर प्रेम करा, सर्वांना मदत करा आणि कोणाचेही नुकसान करू नका असा संदेश सत्यसाईबाबांनी जगाला दिला.

सत्यसाईबाबांना शिर्डीच्या साईबाबांचे अवतार मानले जाते. वाचूया त्यांचे प्रेरक विचार : 

सत्यसाई बाबा हे एक आध्यात्मिक गुरू होते ज्यांच्या संदेशाने आणि आशीर्वादाने जगभरातील लाखो लोकांना योग्य नैतिक मूल्यांसह योग्य जीवन जगण्याची प्रेरणा दिली. सत्यसाईबाबांनी आपल्या भक्तांना नेहमी मदत केली आणि त्यांना चांगल्या आदर्शांचे पालन करण्याचा, चांगले वागण्याचा आणि सेवेची भावना ठेवण्याचा सल्ला दिला.ते म्हणायचे, "शिर्डीच्या साईंचा मी शिव-शक्ती स्वरूपाचा अवतार आहे.'' त्यांनीदेखील श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भक्तांना दिला. 

सत्यसाईबाबांनी त्यांच्या हयातीत अनेक शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि इतर मानवसेवेच्या कार्यात योगदान दिले. प्रशांती निलयम मधील बाबा - क्लास हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सुमारे २०० एकरमध्ये पसरलेले आहे. पुट्टापर्थी येथे स्थित, हे रुग्णालय २२० खाटांमध्ये मोफत शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय सेवा पुरवते. बेंगळुरूच्या श्री सत्य साई उच्च वैद्यकीय विज्ञान संस्थेत गरिबांसाठी ३३३ खाटा तयार करण्यात आल्या आहेत.

सत्यसाईबाबांनी आपल्या हयातीत अध्यात्म कसे जगायचे याचा वस्तुपाठ घालून दिला. तीच परंपरा सुरु ठेवत त्यांचे भक्त त्यांचे कार्य जगभरात पोहोचवत आहेत आणि आजही सत्यसाईबाबांच्या विचारांचे पालन करत आहेत.