शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Bhai Dooj 2021 : भावा-बहिणीच्या नात्याला 'सेलिब्रेशन'ची गरज नाही, तर गरज आहे ओलावा जपण्याची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 17:04 IST

Diwali 2021: आपल्या माणसाकडून अपेक्षा करावी प्रेमाची, पैशांची नव्हे! एकदा का या तऱ्हेने भाऊबीज साजरी होऊ लागली, की आपोआप या सणाचे सेलिब्रेशन न होता साजरीकरण होऊ लागेल.

दिवाळी हा सण आनंद-उत्सवाचा, भेटीगाठींचा, स्नेहसंमेलनाचा, नात्यांमधील ऋणानुबंध दृढ करण्याचा! परंतु, कालौघात आपण या शब्दांपासून एवढे दूर आलो आहोत, की फॉरवर्ड संस्कृतीचा एक भाग होऊन उत्सवामधली गंमतच हरवून बसलो आहोत. सर्व नात्यांमध्ये तरल नाते असते भाऊ बहिणीचे, परंतु या बदलाचा प्रभाव पडून हे नाते देखील औपचारिक राहिले आहे का? याबाबत खेद व्यक्त करताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात-

योग्य मार्गदर्शनाअभावी आज आपल्या धर्माला, सणांना, व्रतांना शैथिल्य आलेले दिसते. कालौघात विधींचे, सणाचे महत्त्व नीटसे ज्ञात नसल्यामुळे या रुढी परंपरांमध्ये अनेक चुकीचे बदल घडलेले दिसतात. एखादा सण, व्रत, उत्सव का करावयाचा, तो योजण्यामागे पूर्वजांचा काय हेतू होता, हे जाणून घेण्याएवढी आस्था गेल्या दोन पिढ्यांपासून कमी होत असलेली दिसून येते. मूळ प्रथेमागील उद्दिष्ट गमावून बसलेले एक व्रत म्हणजे भाऊबीज!

भाऊ बहिणीच्या नातेसंबंधातील गोडवा टिकवण्यासाठी त्या नात्याचे बंध पुन्हा घट्ट करण्यासाठी, त्यानिमित्ताने दोन कुटुंबातील गोडवा टिकवण्यासाठी, सर्व मंडळी एकत्रित येण्यसाठी या सणाची योजना केली गेली दोन्ही कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीत तफावत असली तरीही ती नात्याच्या आड येऊ नये. बहिणीला या ओवाळणीच्या निमित्ताने भावाकडून सन्मानाने भेटवस्तू, साडीचोळी, पैसे अशी अप्रत्यक्षपणे मदत मिळावी, भावा बहिणीच्या नात्यातील पावित्र्याचे अनोखे आणि मनोरम दर्शन सर्वांना पुन:पुन्हा घडावे, त्या नात्याची महती कळावी, यासाठी भाऊबीज रूढ झाली. 

या निमित्ताने भाऊ घरी येणार, माहेरची माणसे येणार म्हणून बहिणीचे मनदेखील उभारी घेते. उत्साहाने तना मनाला जणू नवसंजीवनी मिळते. परंतु हे सारे हेतू माहीत नसल्यामुळे मंडळींनी केवळ उपचारापुरती भाऊबीजेची प्रथा चालू ठेवली असली तरही तिचे बदलते स्वरूप काहीसे खेदजनक आहे. हल्ली भाऊबीज होते पण ती एखाद्या हॉटेलमध्ये! दोन तास मजेत जातात. चांगलेचुंगले खाल्ले जाते. भेटवस्तूंची देवाणघेवाण होते, पण नात्यातील गोडवा काही अनुभवावयास मिळत नाही. मुळात ओवाळण्याचा कौटुंबिक विधी हा सार्वजनिक ठिकाणी, त्यातही मोठ्या हॉटेलमध्ये कसा होईल? सध्याच्या दगदगीच्या, वेगवान जीवनशैलीमुळे हा बदल झाला असे म्हणणे, म्हणजे आपणच आपल्याला फसवणे होईल.

वर्षातून एकदा येणाऱ्या या सणासाठी प्रसंगी तयारीसाठी एक दिवसाची सुट्टी काढा. आठवडाभर आधीपासून थोडी थोडी पूर्वतयारी करा. भाऊबीजेच्या दिवशी मोजकेच चार पदार्थ करा. पण ते आपल्या हाताने करा. भेटवस्तू महागड्याच हव्या असा आग्रह नाही. गुजराती मंडळींमध्ये ते कितीही श्रीमंत असोत नाहीतर गरीब, फारफार तर एकवीस किंवा एक्कावन्न रुपये देण्याची प्रथा आहे. जुने लोक ती प्रथा आजही पाळतात आणि बहीणी आनंदाने त्याचा स्वीकार करतात. 

आपल्या माणसाकडून अपेक्षा करावी प्रेमाची, पैशांची नव्हे! एकदा का या तऱ्हेने भाऊबीज साजरी होऊ लागली, की आपोआप या सणाचे सेलिब्रेशन न होता साजरीकरण होऊ लागेल. नात्यांमधला ओलावा दोहोंना जाणवू लागेल. आजच्या यंत्रयुगात तुटलेली, दुरावलेली नाती पुन्हा सांधून ठेवण्याची क्षमता आपल्या सण उत्सवांमध्ये आहे. आपण त्याची ताकद ओळखून ही परंपरा जपण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पाहिजे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021