शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

Bhagvadgeeta: तापट स्वभाव आहे? राग अनावर होतो? अशा वेळी भगवद्गीतेतील 'हे' दोन श्लोक आठवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 14:31 IST

Bhagvadgeeta : गीतेत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात असे म्हणतात, मानवी दोषाचा एक भाग म्हणजे संताप, त्याचे निराकरणदेखील गीतेत केलेले आहे; कसे ते पहा!

सद्यस्थितीत प्रत्येक जण हा मानवी बॉम्ब झाला आहे. कधी, कुठे, कोणत्या कारणावरून संतापाचा पारा चढेल आणि स्फोट होईल, हे सांगता येत नाही. संतापाचे  प्रमाण अलीकडच्या काळात जास्तच वाढले आहे. ते वाढण्यामागे कारणेही असंख्य आहेत, पण आपल्याला कारणांचा नाही, तर उपायाचा विचार करायचा आहे. 

असे म्हणतात, की आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे भगवद्गीतेत सापडतात. संतापावर आवर घालण्याचाही उपाय त्यात आहे का, याचा शोध घेतला आणि उत्तर समोर आले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, 

ध्यायतो विषयान पुंस: संगस्तेषूपजायते,संगात संजायते काम: कामात् क्रोधोSभिजायते।

नानाविध विषयांमध्ये गुंतून राहणाऱ्या मनुष्याला विषयांची आसक्ती लागते. विषय आत्मउन्नतीचे असतील तर ठीक. अन्यथा वाममार्गाकडे पावले वळली, की  विषय मिळवणे, हे ध्येय बनते. ते ध्येय गाठण्यासाठी असंगाशी संग, म्हणजेच अयोग्य व्यक्तीशी संग करण्याचीही मनाची तयारी होते. त्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून आपली सदसद्विवेक बुद्धी नष्ट होते आणि दुसऱ्याच्या विचाराने विचार करण्याची सवय लागते. एवढे करूनही आपल्याला हवी असलेली गोष्ट प्राप्त झाली नाही, की क्रोधाची मूळे मनात खोलवर रुजतात आणि...

क्रोधात भवति संमोह: संमोहात स्मृती विभ्रम:स्मृतिभ्रंशाद बुद्धीनाशो, बुद्धीनाशात् प्रणश्यति।।

क्रोधामुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहू लागतो. इतरांचा मत्सर करू लागतो. आपली मूळ ओळख, मूळ व्यक्तीमत्त्व, मूळ स्वभाव विसरून रागाच्या भरात गैरवर्तन करू लागतो. क्रोधाचे संमोहन एवढे असते, की मनुष्याला स्वत:च्या स्मृतीचा संभ्रम पडू लागतो. रागाच्या भरात वाट्टेल तसे वागतो आणि बरेच काही कमावण्याच्या नादात जे हातात आहे, तेही गमावून बसतो. 

एक उदाहरण बघू. आई मुलाला बाजारात घेऊन जाते. तो मुलगा आईचे बोट धरून नाचत-बागडत बाजारात जातो. वाटेत त्याला खाऊचे दुकान दिसते. तो आईकडे खाऊसाठी हट्ट करतो. आई त्याला नकार देते. तो घुश्श्यातच जड पावलांनी आईबरोबर पुढे पुढे चालतो. एव्हाना त्या शुल्लक चॉकलेटने मुलाच्या डोक्यात घर केले असते, वरून ते मागितल्यावर लगेच मिळाले नाही, याचा रागही असतो. मुलगा ते लक्षात ठेवतो. 

वाटेत पुढचे दुकान लागते. मुलगा पुन्हा हट्ट करतो. आई त्याला डोळ्यांनी दटावते. मुलाला आणखी राग येतो. तो खाऊसाठी अडून बसतो. आईचा हात झटकतो. जोरजोरात रडायला सुरुवात करतो. आई त्याला समजावते. रागे भरते. मुलगा आणखीनच जोरात रडून भर रस्त्यावर फतकल मारून बसतो. गर्दीचे लक्ष जाते. लोक बघतात, हसतात, हे पाहून आईची चरफड होते. ती मुलाला रागाच्या भरात एक धपाटा घालते आणि हाताला धरून फरफटत घेऊन जाते. चॉकलेट तर दूरच, पण मुलगा धपाटा खाऊन वरून भर रस्त्यात स्वत:चाच अपमान करून घेतो. आपले चांगले कपडे खराब करून घेतो आणि आईचा राग ओढावून घेतो, ते वेगळेच! 

तात्पर्य, शहाणा,समजुतदार मुलगा एका छोट्याशा खाऊपायी स्वत:ची ओळख गमावून बसतो आणि रागाच्या भरात आईला अद्वातद्वा बोलू लागतो. याउलट त्याने संयम ठेवला असता, तर त्याची समजुतदारी पाहून आईनेच त्याला खाऊ घेऊन दिला असता. 

परंतु, एवढी समजुतदारी ना मुलामध्ये असते ना आपल्यामध्ये. म्हणून तर पावलोपावली राग राग करून आपण स्वत:ची किंमत करून घेतो आणि रागाच्या भरात आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान करून बसतो. 

यावर उपाय एकच आहे, ज्याक्षणी राग येईल, त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळावे आणि डोकं थंड व मन शांत झाल्यावर प्रतिसाद द्यावा. असे केल्यामुळे, रागाची तीव्रता कमी होते आणि मनात उठलेल्या अनेक वादळाचा क्षणात निचरा होतो. म्हणून क्रोधाचा क्षण आवरणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तो आवरणे सर्वस्वी आपल्याच हाती आहे.