शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
3
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
4
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
5
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
6
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
7
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
8
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
9
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
10
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
11
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
12
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
13
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
14
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
15
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
16
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
17
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
18
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
19
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार

सावधान! दुसऱ्यांना नावं ठेवत असाल तर तुम्ही आपल्याच आयुष्यात विष घोळवत आहात, कसे ते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 11:24 IST

दुसऱ्याला नावं ठेवण्याची, एखाद्याच्या अपरोक्ष बोलण्याची आपल्याला वाईट सवय असते, पण ही सवय आपलाच घात कसा करते ते वाचा. 

एक राजा अतिशय कर्तव्य दक्ष होता. कामात चोख, दान धर्मात पुढे, प्रजारक्षणात अग्रेसर. त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती. आपली प्रजा सुखात राहावी, कोणीही उपाशी राहू नये म्हणून तो अन्नछत्र चालवत असे आणि स्वतः एका पंगतीतले जेवण वाढत असे. त्याच्यावर लोकांची अमाप निष्ठा होती. 

एक दिवस अन्न छत्रात जेवण वाढताना राजाने सर्वांना द्रोणात खीर वाढली. ती खीर प्यायल्यानंतर जवळपास १०० जण जागच्या जागी मृत्युमुखी पडले. ते पाहून राजाने कारवाई केली, तर लक्षात आले की हलवायाने खीर छान केली, मात्र तो खिरीवर झाकण ठेवायचे विसरला. तेवढ्यात एक साप आला आणि दूध पाहून त्याने पातेल्यात तोंड बुडवले. त्याचे विष दुधात उतरले. मात्र याबाबत जेवणाआधी कोणालाच कल्पना नव्हती. सदर प्रकार घडल्यानंतर अन्नचाचणीतून या गोष्टीचा छडा लागला. मात्र आपल्यामुळे १०० लोकांचे जीव गेले ही बाब राजाला जिव्हारी लागली. त्याने प्रायश्चित्त म्हणून त्याने आपल्या पदाचा त्याग केला आणि दुसरा राजा नेमून आपण वनवासात निघून गेला. 

जंगलाच्या दिशेने जाताना वाटेत एक गाव लागले. तो खूप दमलेला. तिथे एका मंदिरात त्याने आश्रय घेतला. तिथे एक कुटूंब राहत होते. भजन कीर्तन करणारे सात्विक लोक होते. त्यांच्यात एक मुलगी रोज सकाळी उठून ध्यान लावत असे. देवाशी बोलत असे आणि उठल्यावर आपल्या बाबांना देवाशी झालेली बातचीत सांगत असे. राजा सकाळी उठला तेव्हा त्याच्या कानावर मुलीचा संवाद पडला. ती सांगत होती, 'बाबा, आज देवाच्या दरबारात एका विषायावर चर्चा सुरु होती. एका राजावर १०० जणांच्या मृत्यूचे पातक चढले आहे. मात्र हे पाप नक्की त्याचे, की हलवायाचे की सापाचे यावर शिक्कामोर्तब झाले नाही. 

आपल्याच बद्दल चर्चा सुरु आहे कळल्यावर राजा पटकन पुढे गेला आणि म्हणाला, मग निकाल काय लागला? मुलगी म्हणाली, ते काही ठरले नाही. कदाचित उद्या ते ठरू शकेल. राजाने विचार केला, उद्या निकाल ऐकूनच पुढे जाऊ. म्हणून राजाने मुक्काम वाढवायचा ठरवला. गावकऱ्यांना ही बाब कळली. त्यांनी राजाच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली. राजा त्या मुलीकडे बघून प्रायश्चित्त विसरला आणि निर्लज्जासारखा राहू लागला असे काही बाही बोलू लागले. राजाने बोलण्याकडे दुर्लक्ष केले. 

दुसऱ्या दिवशी मुलीचे ध्यान पूर्ण झाल्यावर राजाने निकाल विचारला तर मुलगी म्हणाली, 'ते पाप ना राजाच्या वाट्याला आले ना हलवायाच्या ना सापाच्या, तर ते पाप राजाला नावे ठेवणाऱ्या गावकऱ्यांमध्ये वाटले गेले. राजा निर्दोष झाला. आणि हलवाई व सापसुद्धा!' 

या कथेवरून लक्षात येते, की दुसऱ्याला नावे ठेवून आपण त्यांचे पाप आपल्यावर ओढवून घेतो आणि आपला बहुमूल्य वेळ खर्च करतो. म्हणून दुसऱ्यांना नावे ठेवणे बंद करा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आपले पूर्वज म्हणायचे ना...नावे ठेवी दुसऱ्याला आणि.....!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी