शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! दुसऱ्यांना नावं ठेवत असाल तर तुम्ही आपल्याच आयुष्यात विष घोळवत आहात, कसे ते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 11:24 IST

दुसऱ्याला नावं ठेवण्याची, एखाद्याच्या अपरोक्ष बोलण्याची आपल्याला वाईट सवय असते, पण ही सवय आपलाच घात कसा करते ते वाचा. 

एक राजा अतिशय कर्तव्य दक्ष होता. कामात चोख, दान धर्मात पुढे, प्रजारक्षणात अग्रेसर. त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती. आपली प्रजा सुखात राहावी, कोणीही उपाशी राहू नये म्हणून तो अन्नछत्र चालवत असे आणि स्वतः एका पंगतीतले जेवण वाढत असे. त्याच्यावर लोकांची अमाप निष्ठा होती. 

एक दिवस अन्न छत्रात जेवण वाढताना राजाने सर्वांना द्रोणात खीर वाढली. ती खीर प्यायल्यानंतर जवळपास १०० जण जागच्या जागी मृत्युमुखी पडले. ते पाहून राजाने कारवाई केली, तर लक्षात आले की हलवायाने खीर छान केली, मात्र तो खिरीवर झाकण ठेवायचे विसरला. तेवढ्यात एक साप आला आणि दूध पाहून त्याने पातेल्यात तोंड बुडवले. त्याचे विष दुधात उतरले. मात्र याबाबत जेवणाआधी कोणालाच कल्पना नव्हती. सदर प्रकार घडल्यानंतर अन्नचाचणीतून या गोष्टीचा छडा लागला. मात्र आपल्यामुळे १०० लोकांचे जीव गेले ही बाब राजाला जिव्हारी लागली. त्याने प्रायश्चित्त म्हणून त्याने आपल्या पदाचा त्याग केला आणि दुसरा राजा नेमून आपण वनवासात निघून गेला. 

जंगलाच्या दिशेने जाताना वाटेत एक गाव लागले. तो खूप दमलेला. तिथे एका मंदिरात त्याने आश्रय घेतला. तिथे एक कुटूंब राहत होते. भजन कीर्तन करणारे सात्विक लोक होते. त्यांच्यात एक मुलगी रोज सकाळी उठून ध्यान लावत असे. देवाशी बोलत असे आणि उठल्यावर आपल्या बाबांना देवाशी झालेली बातचीत सांगत असे. राजा सकाळी उठला तेव्हा त्याच्या कानावर मुलीचा संवाद पडला. ती सांगत होती, 'बाबा, आज देवाच्या दरबारात एका विषायावर चर्चा सुरु होती. एका राजावर १०० जणांच्या मृत्यूचे पातक चढले आहे. मात्र हे पाप नक्की त्याचे, की हलवायाचे की सापाचे यावर शिक्कामोर्तब झाले नाही. 

आपल्याच बद्दल चर्चा सुरु आहे कळल्यावर राजा पटकन पुढे गेला आणि म्हणाला, मग निकाल काय लागला? मुलगी म्हणाली, ते काही ठरले नाही. कदाचित उद्या ते ठरू शकेल. राजाने विचार केला, उद्या निकाल ऐकूनच पुढे जाऊ. म्हणून राजाने मुक्काम वाढवायचा ठरवला. गावकऱ्यांना ही बाब कळली. त्यांनी राजाच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली. राजा त्या मुलीकडे बघून प्रायश्चित्त विसरला आणि निर्लज्जासारखा राहू लागला असे काही बाही बोलू लागले. राजाने बोलण्याकडे दुर्लक्ष केले. 

दुसऱ्या दिवशी मुलीचे ध्यान पूर्ण झाल्यावर राजाने निकाल विचारला तर मुलगी म्हणाली, 'ते पाप ना राजाच्या वाट्याला आले ना हलवायाच्या ना सापाच्या, तर ते पाप राजाला नावे ठेवणाऱ्या गावकऱ्यांमध्ये वाटले गेले. राजा निर्दोष झाला. आणि हलवाई व सापसुद्धा!' 

या कथेवरून लक्षात येते, की दुसऱ्याला नावे ठेवून आपण त्यांचे पाप आपल्यावर ओढवून घेतो आणि आपला बहुमूल्य वेळ खर्च करतो. म्हणून दुसऱ्यांना नावे ठेवणे बंद करा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आपले पूर्वज म्हणायचे ना...नावे ठेवी दुसऱ्याला आणि.....!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी