शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सावधान! दुसऱ्यांना नावं ठेवत असाल तर तुम्ही आपल्याच आयुष्यात विष घोळवत आहात, कसे ते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 11:24 IST

दुसऱ्याला नावं ठेवण्याची, एखाद्याच्या अपरोक्ष बोलण्याची आपल्याला वाईट सवय असते, पण ही सवय आपलाच घात कसा करते ते वाचा. 

एक राजा अतिशय कर्तव्य दक्ष होता. कामात चोख, दान धर्मात पुढे, प्रजारक्षणात अग्रेसर. त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती. आपली प्रजा सुखात राहावी, कोणीही उपाशी राहू नये म्हणून तो अन्नछत्र चालवत असे आणि स्वतः एका पंगतीतले जेवण वाढत असे. त्याच्यावर लोकांची अमाप निष्ठा होती. 

एक दिवस अन्न छत्रात जेवण वाढताना राजाने सर्वांना द्रोणात खीर वाढली. ती खीर प्यायल्यानंतर जवळपास १०० जण जागच्या जागी मृत्युमुखी पडले. ते पाहून राजाने कारवाई केली, तर लक्षात आले की हलवायाने खीर छान केली, मात्र तो खिरीवर झाकण ठेवायचे विसरला. तेवढ्यात एक साप आला आणि दूध पाहून त्याने पातेल्यात तोंड बुडवले. त्याचे विष दुधात उतरले. मात्र याबाबत जेवणाआधी कोणालाच कल्पना नव्हती. सदर प्रकार घडल्यानंतर अन्नचाचणीतून या गोष्टीचा छडा लागला. मात्र आपल्यामुळे १०० लोकांचे जीव गेले ही बाब राजाला जिव्हारी लागली. त्याने प्रायश्चित्त म्हणून त्याने आपल्या पदाचा त्याग केला आणि दुसरा राजा नेमून आपण वनवासात निघून गेला. 

जंगलाच्या दिशेने जाताना वाटेत एक गाव लागले. तो खूप दमलेला. तिथे एका मंदिरात त्याने आश्रय घेतला. तिथे एक कुटूंब राहत होते. भजन कीर्तन करणारे सात्विक लोक होते. त्यांच्यात एक मुलगी रोज सकाळी उठून ध्यान लावत असे. देवाशी बोलत असे आणि उठल्यावर आपल्या बाबांना देवाशी झालेली बातचीत सांगत असे. राजा सकाळी उठला तेव्हा त्याच्या कानावर मुलीचा संवाद पडला. ती सांगत होती, 'बाबा, आज देवाच्या दरबारात एका विषायावर चर्चा सुरु होती. एका राजावर १०० जणांच्या मृत्यूचे पातक चढले आहे. मात्र हे पाप नक्की त्याचे, की हलवायाचे की सापाचे यावर शिक्कामोर्तब झाले नाही. 

आपल्याच बद्दल चर्चा सुरु आहे कळल्यावर राजा पटकन पुढे गेला आणि म्हणाला, मग निकाल काय लागला? मुलगी म्हणाली, ते काही ठरले नाही. कदाचित उद्या ते ठरू शकेल. राजाने विचार केला, उद्या निकाल ऐकूनच पुढे जाऊ. म्हणून राजाने मुक्काम वाढवायचा ठरवला. गावकऱ्यांना ही बाब कळली. त्यांनी राजाच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली. राजा त्या मुलीकडे बघून प्रायश्चित्त विसरला आणि निर्लज्जासारखा राहू लागला असे काही बाही बोलू लागले. राजाने बोलण्याकडे दुर्लक्ष केले. 

दुसऱ्या दिवशी मुलीचे ध्यान पूर्ण झाल्यावर राजाने निकाल विचारला तर मुलगी म्हणाली, 'ते पाप ना राजाच्या वाट्याला आले ना हलवायाच्या ना सापाच्या, तर ते पाप राजाला नावे ठेवणाऱ्या गावकऱ्यांमध्ये वाटले गेले. राजा निर्दोष झाला. आणि हलवाई व सापसुद्धा!' 

या कथेवरून लक्षात येते, की दुसऱ्याला नावे ठेवून आपण त्यांचे पाप आपल्यावर ओढवून घेतो आणि आपला बहुमूल्य वेळ खर्च करतो. म्हणून दुसऱ्यांना नावे ठेवणे बंद करा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आपले पूर्वज म्हणायचे ना...नावे ठेवी दुसऱ्याला आणि.....!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी