शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दासबोधाच्या आरंभी गणरायापाठोपाठ समर्थांनी केली देवी शारदेचीही आळवणी

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 4, 2021 15:21 IST

शक्तीच्या बळावर सृष्टीचा कारभार सुरळीतपणे पार पडत आहे. हे लक्षात घेऊन समर्थ दुसरी ओवी देवीला समर्पित करताना म्हणतात, आता वंदीन वेदमाता. 

ठळक मुद्देवाणीवाचून शब्दार्थाची अभिव्यक्ती असंभव, तशीच अर्थवाचून वाणीही निरर्थक!

ज्योत्स्ना गाडगीळ 

दासबोधाच्या प्रारंभी गणरायाला वंदन करून झाल्यावर समर्थ रामदासांनी शक्तीची अर्थात देवीची प्रार्थना केली आहे. कलियुगात देवी आणि गणेश या दोन देवतांची विशेष उपासना केली जाते. हे लक्षात घेता, समर्थांनी कार्यारंभी गणेशाला आणि पाठोपाठ शक्तीला वंदन केले आहे. 

आता वंदीन वेदमाता, श्रीशारदा ब्रह्मसुता।शब्दामूळ वाग्देवता, महामाया।।

शक्तीची रूपे वेगवेगळी आहे. पैकी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही मुख्य रूपे आहेत. त्यांची आपण वेळोवेळी आळवणीदेखील करतो. सत्ता, संपत्ती, ऐहिक सुख, ऐषोआरामी जीवन जगण्यासाठी लागतो पैसा आणि तो मिळवण्यासाठी आराधना केली जाते, महालक्ष्मीची. कारण ती वैभव प्राप्त करून देणारी आहे. आयुष्यात अनेक खडतर प्रसंग येतात. अशा वेळी संकटांना तोंड देण्यासाठी अंगात बारा हत्तींचे बळ यावे लागते. ते येणार कुठून? त्यासाठी महाकालीची उपासना. ती आपले धैर्य वाढवते, मनोबल वाढवते. तसेच आयुष्यभर आपण विद्यार्थी दशेत असतो. अनेक गोष्टींचे हळू हळू आकलन होते आणि आपला शिकण्याचा प्रवास सुरू राहतो. यासाठी वरदहस्त लागतो, तो देवी शारदेचा. तीच आपल्याला शस्त्र, शास्त्र, कला, साहित्य, वेद, वाङमय इ. गोष्टींमध्ये पारंगत होण्यासाठी अनुकूलता मिळवून देते. 

हेही वाचा : नववर्षाचा आरंभ करूया दासबोधाने आणि प्रारंभ करुया गणेशाच्या स्मरणाने! 

शक्तीशिवाय सृष्टीत चैतन्य निर्माण होणारच नाही. सगळेच जीव निर्जिव होतील. साधे उदाहरण पहा. आपल्याला हात आहेत, पाय आहेत पण ते वापरण्याचे अंगात त्राण नाहीत, मग ते असून उपयोग आहे का? काहीच नाही. हे चैतन्य म्हणजेच शक्ती. या शक्तीच्या बळावर सृष्टीचा कारभार सुरळीतपणे पार पडत आहे. हे लक्षात घेऊन समर्थ दुसरी ओवी देवीला समर्पित करताना म्हणतात, आता वंदीन वेदमाता. 

एवढे लेखन साहित्य निर्माण करायचे, तर जी साहित्यसम्राज्ञी आहे, शब्दसम्राज्ञी आहे, भाषासम्राज्ञी आहे, तिचे आशीर्वाद घ्यायला नको का? वाकसिद्धी यायला देखील देवीचा आशीर्वाद लागतो, अन्यथा शब्द येत असूनही ऐनवेळेवर सुचत नाहीत. तोंडातून निघत नाहीत. जीभ आहे, दात आहेत, तोंड आहे म्हणून सगळ्याच जीवांना बोलता येते असे नाही. पशु-पक्ष्यांचाही परस्परसंवाद असतो. तेही बोलतात. परंतु ते स्वरात बोलतात. शब्दांची भाषा कळते, ती फक्त मनुष्याला. ते शब्दही नको तिथे, नको तसे वापरून उपयोग नाही. अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. कसे बोलायचे, हे कळायला वयाची दोन वर्षे पुरतात, परंतु काय बोलायचे हे कळायला संपूर्ण आयुष्य खर्च करावे लागते. 

ज्यांना भाषेवर प्रभुत्त्व मिळवता येते, ज्यांच्याकडे ज्ञानाचा मोठा स्रोत असतो, असे लोक शारदेचे उपासक अर्थात सारस्वत म्हणून ओळखले जातात. असाच एक सारस्वत होऊन समर्थ रामदास देवीला शरण येतात. कारण, शब्दांचे मूळ ती आहे. मनाच्या श्लोकातही समर्थांनी लिहून ठेवले आहे, नमू शारदा मूळ चत्वार वाचा' म्हणजेच जीभेला, शब्दांना सुयोग्य वळण देणारीसुद्धा तूच आहेस. म्हणून हे शारदे, माझा नमस्कार स्वीकार कर. मला जो बोध झाला, तो ग्रंथरुपाने लिहून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.'

हेही वाचा : दुसऱ्यांसाठी अमंगल ठरणारा मंगळ, बाप्पाच्या नावात विराजमान झाला!