शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दासबोधाच्या आरंभी गणरायापाठोपाठ समर्थांनी केली देवी शारदेचीही आळवणी

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 4, 2021 15:21 IST

शक्तीच्या बळावर सृष्टीचा कारभार सुरळीतपणे पार पडत आहे. हे लक्षात घेऊन समर्थ दुसरी ओवी देवीला समर्पित करताना म्हणतात, आता वंदीन वेदमाता. 

ठळक मुद्देवाणीवाचून शब्दार्थाची अभिव्यक्ती असंभव, तशीच अर्थवाचून वाणीही निरर्थक!

ज्योत्स्ना गाडगीळ 

दासबोधाच्या प्रारंभी गणरायाला वंदन करून झाल्यावर समर्थ रामदासांनी शक्तीची अर्थात देवीची प्रार्थना केली आहे. कलियुगात देवी आणि गणेश या दोन देवतांची विशेष उपासना केली जाते. हे लक्षात घेता, समर्थांनी कार्यारंभी गणेशाला आणि पाठोपाठ शक्तीला वंदन केले आहे. 

आता वंदीन वेदमाता, श्रीशारदा ब्रह्मसुता।शब्दामूळ वाग्देवता, महामाया।।

शक्तीची रूपे वेगवेगळी आहे. पैकी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही मुख्य रूपे आहेत. त्यांची आपण वेळोवेळी आळवणीदेखील करतो. सत्ता, संपत्ती, ऐहिक सुख, ऐषोआरामी जीवन जगण्यासाठी लागतो पैसा आणि तो मिळवण्यासाठी आराधना केली जाते, महालक्ष्मीची. कारण ती वैभव प्राप्त करून देणारी आहे. आयुष्यात अनेक खडतर प्रसंग येतात. अशा वेळी संकटांना तोंड देण्यासाठी अंगात बारा हत्तींचे बळ यावे लागते. ते येणार कुठून? त्यासाठी महाकालीची उपासना. ती आपले धैर्य वाढवते, मनोबल वाढवते. तसेच आयुष्यभर आपण विद्यार्थी दशेत असतो. अनेक गोष्टींचे हळू हळू आकलन होते आणि आपला शिकण्याचा प्रवास सुरू राहतो. यासाठी वरदहस्त लागतो, तो देवी शारदेचा. तीच आपल्याला शस्त्र, शास्त्र, कला, साहित्य, वेद, वाङमय इ. गोष्टींमध्ये पारंगत होण्यासाठी अनुकूलता मिळवून देते. 

हेही वाचा : नववर्षाचा आरंभ करूया दासबोधाने आणि प्रारंभ करुया गणेशाच्या स्मरणाने! 

शक्तीशिवाय सृष्टीत चैतन्य निर्माण होणारच नाही. सगळेच जीव निर्जिव होतील. साधे उदाहरण पहा. आपल्याला हात आहेत, पाय आहेत पण ते वापरण्याचे अंगात त्राण नाहीत, मग ते असून उपयोग आहे का? काहीच नाही. हे चैतन्य म्हणजेच शक्ती. या शक्तीच्या बळावर सृष्टीचा कारभार सुरळीतपणे पार पडत आहे. हे लक्षात घेऊन समर्थ दुसरी ओवी देवीला समर्पित करताना म्हणतात, आता वंदीन वेदमाता. 

एवढे लेखन साहित्य निर्माण करायचे, तर जी साहित्यसम्राज्ञी आहे, शब्दसम्राज्ञी आहे, भाषासम्राज्ञी आहे, तिचे आशीर्वाद घ्यायला नको का? वाकसिद्धी यायला देखील देवीचा आशीर्वाद लागतो, अन्यथा शब्द येत असूनही ऐनवेळेवर सुचत नाहीत. तोंडातून निघत नाहीत. जीभ आहे, दात आहेत, तोंड आहे म्हणून सगळ्याच जीवांना बोलता येते असे नाही. पशु-पक्ष्यांचाही परस्परसंवाद असतो. तेही बोलतात. परंतु ते स्वरात बोलतात. शब्दांची भाषा कळते, ती फक्त मनुष्याला. ते शब्दही नको तिथे, नको तसे वापरून उपयोग नाही. अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. कसे बोलायचे, हे कळायला वयाची दोन वर्षे पुरतात, परंतु काय बोलायचे हे कळायला संपूर्ण आयुष्य खर्च करावे लागते. 

ज्यांना भाषेवर प्रभुत्त्व मिळवता येते, ज्यांच्याकडे ज्ञानाचा मोठा स्रोत असतो, असे लोक शारदेचे उपासक अर्थात सारस्वत म्हणून ओळखले जातात. असाच एक सारस्वत होऊन समर्थ रामदास देवीला शरण येतात. कारण, शब्दांचे मूळ ती आहे. मनाच्या श्लोकातही समर्थांनी लिहून ठेवले आहे, नमू शारदा मूळ चत्वार वाचा' म्हणजेच जीभेला, शब्दांना सुयोग्य वळण देणारीसुद्धा तूच आहेस. म्हणून हे शारदे, माझा नमस्कार स्वीकार कर. मला जो बोध झाला, तो ग्रंथरुपाने लिहून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.'

हेही वाचा : दुसऱ्यांसाठी अमंगल ठरणारा मंगळ, बाप्पाच्या नावात विराजमान झाला!