शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

विजयपताका श्रीरामाची, झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 11:02 IST

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पुढील कित्येक वर्ष जगभरात लक्षात राहील.

अवघा देश राममय झाला आहे. श्रीराम दर्शनाची आस सर्वांना लागली आहे. जवळपास ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेरीस रामलला विराजमान होत आहेत. प्रत्यक्ष त्रेतायुगात श्रीरामांना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला होता. मात्र, आताच्या कलियुगात श्रीराम ५०० वर्षांचा संघर्ष करत मंदिरी विराजमान होत आहेत. आदर्श पुत्र, एकपत्नीव्रती, महापराक्रमी, सर्वश्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा म्हणून आजही श्रीरामांची महती गायली जाते. रामलला प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा होत आहे. केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगभरात या सोहळ्याची उत्सुकता आहे.

भगवान विष्णूच्या दशावतारांमध्ये सातवा अवतार श्रीरामांचा असल्याचे म्हटले जाते. रामायण, महाभारतानंतर आलेल्या कलियुगात भरतवर्षावर अनेकांनी आक्रमणे केली. यामध्ये देशभरातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. भारतातील एकता तोडण्याठी ही रणनीति वापरण्यात आली. रामजन्मस्थानही याला अपवाद नाही. यानंतर पुन्हा एकदा रामजन्मभूमी आणि राम मंदिराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलण्यात आला. आताच्या काळानुरूप प्रक्रिया करण्यात आली. प्रसंगी न्यायालयात कायदेशीर लढाई लढून अखेरीस राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला.

रामाच्या राज्याभिषेक सोहळ्याची आधुनिक काळातील प्रचिती

रावणवध केल्यानंतर बिभिषणाकडे श्रीलंकेचे राज्य सोपवून श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंतांसह हजारो लोक अयोध्येत आले होते. अयोध्येची अवघी प्रजा रामाची आतुरतेने वाट पाहत होती. अखेरीस अयोध्येत आल्यानंतर श्रीरामांचा त्रिवार जयजयकार करण्यात आला. आनंदाने अयोध्याजन अगदी नाचत होते. श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी रामकार्यात हातभार लावला, त्या सर्वांचा मान-सन्मान, आदर-सत्कार करण्यात आला. रामराज्यातील तो सोहळा कसा असेल, याची किंचित प्रचिती आपल्याला येऊ शकते. ५०० वर्षांपासून रामजन्मभूमी आणि राम मंदिरासाठी ज्यांनी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, संघर्ष केला, लढा दिला, त्यांचे स्मरण करून आज हयात असलेल्यांचा मान-सन्मान, आदर-सत्कार करण्यात येत आहे.

विजयपताका श्रीरामांची, झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व निकालानंतर अखेरीस राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. प्रभू पुन्हा मंदिरी परतणार यावर शिक्कामोर्तब झाले. अवघ्या देशाने आनंदोत्सव साजरा केला. यानंतर सर्वजण पुन्हा रामकार्याला लागत मंदिर उभारणीवर भर देण्यात आला. संपूर्ण भारत पुन्हा एकदा रामकार्यासाठी सज्ज झाला. जवळपास ४ ते ५ वर्षांनंतर राम मंदिर प्रत्यक्ष दिसू लागले. देशात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले. राम मंदिरासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, असे रामभक्तांना वाटू लागले आणि जे जे आपल्याला शक्य होईल, ते ते अयोध्येत पाठवण्यास सुरुवात झाली. देशाच्या सर्व भागातून काही ना काही हातभार लावण्यात आला. 

अखेरीस रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचा योग हजारो लोकांना येणार आहे. हा अद्भूत सोहळा  पुढील अनेक वर्षे कायम स्मरणात राहणार आहे. प्रत्येक जण आपापल्यापरिने रामाची स्तुती, रामगायन, रामनामाचा जयघोष करताना दिसत आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाची ताकद जगाला दिसणार आहे. रामराज्य हे सर्वदूर पसरले होते, असे म्हटले जाते. तसेच सर्वदूर पसरलेला रामनामाचा आणखी कित्येक पटीने वृद्धिंगत होणार आहे. रामराज्याचा संकल्प घेऊन पुनःप्रत्यर्याचा आनंद मिळण्यासाठी रामकार्यात आपणही सहभागी होऊया.. नैतिकता, मर्यादा पुरुषोत्तम, उत्तम शासक-प्रशासक, आदर्शांचा आदर्श असलेल्या रामाचे स्मरण करून आपापल्यापरिने रामराज्य घडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूया.. खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला तर रामराज्याचा संकल्प साकार होणे कठीण गोष्ट नाही..

||जय श्रीराम|| 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या