शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विजयपताका श्रीरामाची, झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 11:02 IST

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पुढील कित्येक वर्ष जगभरात लक्षात राहील.

अवघा देश राममय झाला आहे. श्रीराम दर्शनाची आस सर्वांना लागली आहे. जवळपास ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेरीस रामलला विराजमान होत आहेत. प्रत्यक्ष त्रेतायुगात श्रीरामांना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला होता. मात्र, आताच्या कलियुगात श्रीराम ५०० वर्षांचा संघर्ष करत मंदिरी विराजमान होत आहेत. आदर्श पुत्र, एकपत्नीव्रती, महापराक्रमी, सर्वश्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा म्हणून आजही श्रीरामांची महती गायली जाते. रामलला प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा होत आहे. केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगभरात या सोहळ्याची उत्सुकता आहे.

भगवान विष्णूच्या दशावतारांमध्ये सातवा अवतार श्रीरामांचा असल्याचे म्हटले जाते. रामायण, महाभारतानंतर आलेल्या कलियुगात भरतवर्षावर अनेकांनी आक्रमणे केली. यामध्ये देशभरातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. भारतातील एकता तोडण्याठी ही रणनीति वापरण्यात आली. रामजन्मस्थानही याला अपवाद नाही. यानंतर पुन्हा एकदा रामजन्मभूमी आणि राम मंदिराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलण्यात आला. आताच्या काळानुरूप प्रक्रिया करण्यात आली. प्रसंगी न्यायालयात कायदेशीर लढाई लढून अखेरीस राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला.

रामाच्या राज्याभिषेक सोहळ्याची आधुनिक काळातील प्रचिती

रावणवध केल्यानंतर बिभिषणाकडे श्रीलंकेचे राज्य सोपवून श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंतांसह हजारो लोक अयोध्येत आले होते. अयोध्येची अवघी प्रजा रामाची आतुरतेने वाट पाहत होती. अखेरीस अयोध्येत आल्यानंतर श्रीरामांचा त्रिवार जयजयकार करण्यात आला. आनंदाने अयोध्याजन अगदी नाचत होते. श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ज्या ज्या लोकांनी रामकार्यात हातभार लावला, त्या सर्वांचा मान-सन्मान, आदर-सत्कार करण्यात आला. रामराज्यातील तो सोहळा कसा असेल, याची किंचित प्रचिती आपल्याला येऊ शकते. ५०० वर्षांपासून रामजन्मभूमी आणि राम मंदिरासाठी ज्यांनी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, संघर्ष केला, लढा दिला, त्यांचे स्मरण करून आज हयात असलेल्यांचा मान-सन्मान, आदर-सत्कार करण्यात येत आहे.

विजयपताका श्रीरामांची, झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व निकालानंतर अखेरीस राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. प्रभू पुन्हा मंदिरी परतणार यावर शिक्कामोर्तब झाले. अवघ्या देशाने आनंदोत्सव साजरा केला. यानंतर सर्वजण पुन्हा रामकार्याला लागत मंदिर उभारणीवर भर देण्यात आला. संपूर्ण भारत पुन्हा एकदा रामकार्यासाठी सज्ज झाला. जवळपास ४ ते ५ वर्षांनंतर राम मंदिर प्रत्यक्ष दिसू लागले. देशात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले. राम मंदिरासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, असे रामभक्तांना वाटू लागले आणि जे जे आपल्याला शक्य होईल, ते ते अयोध्येत पाठवण्यास सुरुवात झाली. देशाच्या सर्व भागातून काही ना काही हातभार लावण्यात आला. 

अखेरीस रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचा योग हजारो लोकांना येणार आहे. हा अद्भूत सोहळा  पुढील अनेक वर्षे कायम स्मरणात राहणार आहे. प्रत्येक जण आपापल्यापरिने रामाची स्तुती, रामगायन, रामनामाचा जयघोष करताना दिसत आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाची ताकद जगाला दिसणार आहे. रामराज्य हे सर्वदूर पसरले होते, असे म्हटले जाते. तसेच सर्वदूर पसरलेला रामनामाचा आणखी कित्येक पटीने वृद्धिंगत होणार आहे. रामराज्याचा संकल्प घेऊन पुनःप्रत्यर्याचा आनंद मिळण्यासाठी रामकार्यात आपणही सहभागी होऊया.. नैतिकता, मर्यादा पुरुषोत्तम, उत्तम शासक-प्रशासक, आदर्शांचा आदर्श असलेल्या रामाचे स्मरण करून आपापल्यापरिने रामराज्य घडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूया.. खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला तर रामराज्याचा संकल्प साकार होणे कठीण गोष्ट नाही..

||जय श्रीराम|| 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या