शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सूर्यास्ताच्या वेळी 'या' गोष्टी टाळा, अन्यथा लक्ष्मी माता कधीही येणार नाही घरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 13:55 IST

सातच्या आत घरात, अशी आपल्या पूर्वजांची शिकवण होती; जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि त्यामागची कारणं!

वेदांमधील ज्ञानाच्या सर्व गोष्टींबरोबरच दैनंदिन जीवन आणि सवयींबद्दलही मार्गदर्शन केले आहे. शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा त्याच्या जीवनावर परिणाम होतो. म्हणूनच, या ग्रंथांमध्ये अन्न, राहणीमान, आचरण आणि वागणूक यासारख्या अनेक बाबींबद्दल चर्चा केली गेली आहे. त्यांच्या मते संध्याकाळी काही काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. जर लोक सूर्यास्ताच्या वेळी हे काम करत असतील तर यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते . तसेच, त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. या दोन्ही गोष्टींचा ऱ्हास टाळायचा असेल, तर पुढील गोष्टी कायम लक्षात ठेवा. 

सूर्यास्ताच्या वेळी कधीही खाऊ नका. सूर्याला आपण देव मानतो. तो आपला निरोप घेत असताना आपण भोजन करणे उचित नाही. म्हणून शास्त्राने रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यायला सांगितले आहे. आरोग्य शास्त्रानेही त्यास दुजोरा दिला आहे. सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते आणि त्याचा विपरीत परिणाम आरोग्याला भोगावा लागतो. आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्या की औषधोपचार करण्यात पैशांचाही अपव्यय होतो. म्हणून सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर जेवण टाळा. 

सूर्यास्ताची वेळ आणि दिवेलागणीची वेळ एकत्र येते. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा अस्त झाल्यावर घराला प्रकाशमान करण्याची जबाबदारी दिव्यावर येते. छोटीशी पणती, समई, निरांजन घरात प्रकाश पसरवते. त्यावेळेस लक्ष्मी घरात येते, अशी आपली श्रद्धा आहे. मग त्यावेळी झोपून राहिल्यास तो लक्ष्मीचा अपमान ठरेल आणि ती रुसून पुढच्या घरी जाईल. म्हणून संध्याकाळ झाली की लोळत पडू नये किंवा झोपूही नये. 

संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीच्या आगमनासाठी, तिच्या वास्तव्यासाठी आपण तिची प्रार्थना करतो. म्हणून संध्याकाळी कोणाला कर्ज देऊ नये किंवा घेऊही नये. हा व्यवहार दिवसभरात केव्हाही करावा, परंतु सूर्यास्ताच्या वेळी करू नये, असे शास्त्र सांगते. 

या वेळेत ध्यान करा. सायंकालीन संधिप्रकाश काळ ध्यान धारणेसाठी उचित मानला जातो. या काळात मन स्थिर नसते, ते ध्यानधारणेत गुंतवले पाहिजे. तसेच या कालावधीत शरीर संबंधही टाळले पाहिजेत. त्यातून गर्भधारणा झाल्यास संततीवर सूर्यास्त काळाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. 

यासाठीच मन शांत ठेवून स्तोत्रपणठण करावे. मन ईश्वर चिंतनात रमवावे. किंवा चांगले विचार अथवा वाचन, मनन करावे.