शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

Astrology Tips: वाढते कर्ज, आर्थिक अडचणी, व्यवसायात नुकसान दूर करेल पावसाचे पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:44 IST

Astrology Tips: ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही कर्जबाजारी असाल किंवा आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असाल तर पावसाचे पाणी तुमच्या समस्यांवर मात करू शकते. कसे ते जाणून घ्या... 

भारतातील अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. या पाण्याची योग्य बचत केल्यास भविष्यातील पाणी प्रश्नांना सामोरे  लागणार नाही. पावसाचे पाणी केवळ पृथ्वीला नाही तर मनुष्याला आर्थिक अडचणीतूनही दिलासा देते. कर्जातून मुक्त होण्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ज्योतिषशास्त्रात पावसाच्या पाण्याबाबत अनेक विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. पावसाच्या पाण्याने वाढती कर्ज आणि आर्थिक संकटावर कशी मात करता येईल ते जाणून घेऊया.

व्यवसायात नुकसान टाळण्यासाठी - ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात नुकसान होत असेल तर पावसाचे पाणी पितळ्याच्या भांड्यात जमा करावे. त्यानंतर एकादशीच्या दिवशी या पाण्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अभिषेक करावा. यामुळे व्यवसायात नुकसान होणे कमी होऊन प्रगती सुरु होईल. 

कर्जापासून मुक्ती - जर एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभावामुळे कर्जाचा बोजा वाढत असेल तर त्यांच्यासाठी पावसाचे पाणी खूप चमत्कारी ठरू शकते. हे पाणी एखाद्या कलशात साठवून हनुमानाला अर्पण करा. तसेच संपूर्ण श्रावण मासात हनुमान स्तोत्र म्हणून हा उपाय दर मंगळवारी किंवा शनिवारी करा. 

आर्थिक संकटातून सुटका - जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून बाहेर येत नसेल तर पावसाचे पाणी मातीच्या भांड्यात गोळा करून घराच्या उत्तर दिशेला ठेवावे. असे केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल.

पैशाची कमतरता दूर करण्यासाठी- ज्योतिषशास्त्रानुसार पैशाची कमतरता दूर करण्यासाठी पावसाचे पाणी पातेल्यात जमवावे. ज्या सकाळी पाऊस नसेल आणि सूर्यदर्शन होईल त्यावेळी हे पाणी सूर्यप्रकाशात ठेवून, इष्टदेवतेचे नाव घेऊन घरात शिंपडावे. लक्ष्मी मातेची कृपा होईल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष