शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

Astrology Tips: सगळं काही मिळूनही असमाधानी असल्यासारखे वाटते? हा तुमचा दोष नाही तर ग्रहदोष असू शकतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 12:55 IST

Astrology Tips: मनुष्यच्या स्वभावावर ग्रहांचा प्रभाव पडत असतो, मग असे कोणते ग्रह आहेत जे तुमच्या सुख समाधानाच्या आड येतात ते जाणून घ्या. 

>> सौ. अस्मिता दीक्षित , ज्योतिष अभ्यासक 

मनुष्याचे जीवन हे अनेकविध भावनांनी व्यापलेले आहे. कधी सुख कधी दुक्ख, पण हा जीवनप्रवास चालूच असतो. मला मोक्ष मिळेल का ? मला ह्या जीवनातून मुक्ती मिळेल का ? असे प्रश्न अनेक जण विचारतात . काहींचे जीवन अत्यंत परिपूर्ण असते . आयुष्यातील प्रत्येक पायरीवर जे जे हवे ते मिळालेले असते आणि त्यामुळे जीवनाचा सर्वार्थाने आनंद त्यांनी घेतलेला असतो . अश्यावेळी माणूस तृप्त समाधानी असतो . समाधान हे मिळवता येत नाही ते असावे लागते आणि ते असल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही . 

सतत काहीतरी हवे असलेल्या माणसाना समाधानापासून वंचित राहावे लागते . एखाद्या गोष्टीचा ,जसे उच्च पद मिळवणे , अधिक पगाराची नोकरी मिळवणे , ध्यास असणे वेगळे आणि एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून कुढत राहणे वेगळे . मोक्ष त्रिकोण इथे खर्या अर्थाने अभ्यासावा लागतो. इथे प्रामुख्याने चतुर्थ भाव त्याचा स्वामी , मनाचा विचार केला जातो . चंद्र म्हणजे मन , भावना ..चंद्र मनाचा कारक आहे. जोवर इच्छा आहेत तोवर मुक्ती नाही . विचार डोक्यातून येतात आणि इच्छा मनातून येतात . कुठल्यातरी इच्छेत  किंवा व्यक्तीत आपला जीव गुंतलेला असतो . जोवर ध्येय, इच्छा किंवा काहीतरी हवं आहे तोपर्यंत मुक्ती नाही . हे सर्व शून्य झाले पाहिजे . तदपश्च्यात मुक्ती संभव आहे.  

ह्या सर्वासाठी उपासना आणि त्यातील सातत्य प्रभावीपणे काम करते . उपासना जीवनाकडे डोळस पणे बघायला शिकवते . आपण काही घेवून आलो नाही आणि घेवूनही जाणार नाही हि भावना जसजशी उपासना वाढते तशी खोलवर मनात रुजायला लागते . उपासना आपल्याच आयुष्याकडे त्रयस्ताच्या नजरेने बघायला शिकवते . असो.

निसर्ग कुंडली मधले १२ भाव मनुष्याच्या संपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकताना दिसतात . जन्माला घालणारा लग्न भाव आणि मोक्षाला नेणारा व्यय भाव आणि त्यामध्ये असणारे आपले संपूर्ण आयुष्य . भाग्य भावापासून ते मोक्षापर्यंत फक्त गुरु आणि शनीच्याच राशी आहेत . हे दोन्ही महान ग्रह आपल्या आयुष्यावर विशिष्ट ठसा उमटवणारे आहेत . दोघही मोक्षाच्या मार्गाकडे नेणारे पण त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या . गुरु म्हणतो प्रपंच करून परमार्थ साधावा तर शनीला प्रपंच मुळी नकोच आहे. त्यामुळे आयुष्याच्या अखेरी म्हणजे भाग्य भावापासून एकेक गोष्टी सोडून द्या तरच मोक्षाची पायरी दिसेल असेच तर सुचवायचे नाही ना ह्यांना.

प्रपंचात जितके अधिक गुंतू तितकी मुक्ती कठीण . म्हणूनच आपले मन सदैव कश्यात गुंतले पाहिजे तर  साधनेत आणि चित्त सद्गुरूंच्या चरणाशी . तरच मोक्ष आहे अन्यथा सर्व व्यर्थ आहे. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष