शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Astrology Tips: तुम्हीसुद्धा पायात काळा धागा बांधताय? त्याचे फायदे तोटेही जाणून घ्या! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 15:14 IST

Astrology Tips: काही गोष्टी हल्ली फॅशन म्हणून फॉलो केल्या जातात तर काही गोष्टी मोठे सांगतात म्हणून, मात्र त्यामुळे होणारे फायदे तोटेही लक्षात घेतले पाहिजेत!

बाळाला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या हातापायांना काळा दोरा तर कमरेला करगोटा बांधतात हे आपल्याला माहीत आहेच, मात्र अनेक मोठ्या माणसांच्या पायातही काळा धागा बांधलेला दिसतो. काही मुली तर फॅशन म्हणूनही तो धागा बांधतात, तर काही जण दृष्ट लागू नये म्हणून! मात्र याला शास्त्राधार आहे का? त्याबाबत ज्योतिष शास्त्रात काय सांगितले आहे, ते जाणून घेऊ. 

कुंडली दोषावर उपाय म्हणून ज्योतिष शास्त्रात अनेक प्रकारचे तोडगे सांगितले जातात. पायात काळा धागा बांधणे हा देखील ज्योतिष शास्त्राचा एक तोडगा आहे. त्यामुळे कुंडलीतील राहू केतुचे प्राबल्य कमी होऊन जीवनातील अडचणींचे निराकरण होण्यास मदत होते असे ज्योतिष शास्त्र सांगते. मात्र तो फॅशन म्हणून बांधणे योग्य नाही. तो आकर्षण हेतू ठरेल पण संरक्षण हेतू काम करणार नाही. कारण, व्यक्तिसापेक्ष ग्रहदोषांवर निवारण केले जाते. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आहे, त्यांनाच तो उपाय सांगितला जातो. 

राहू-केतू दोष निवारणासाठी

ज्यांच्या कुंडलीत राहू केतू दोष आहे, त्यांना ज्योतिषी एका पायात काळा धागा बांधा असा सल्ला देतात. हा धागा स्तोत्रमंत्रांचे उच्चारण करून प्रभावित केला जातो. मगच तो वापरण्याचा सल्ला दिला जातो 

शनीचा प्रभाव कमी होतो

शनिदेव हा उग्र ग्रह मानला जातो. ज्यांच्या आयुष्यात शनीची धैय्या आणि साडेसती सुरू असते त्यांनाही काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो. कारण शनी देवाला आपण काळया गोष्टी अर्पण करतो. काळा धागा देखील शनी देवाच्या प्रकोपासून बचाव करण्यासाठी बांधण्याचा सल्ला दिला जातो. 

पुरुषांनी कोणत्या पायात धागा बांधावा?

ज्योतिषांच्या मते, जर पुरुषांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर त्यांनी मंगळवारी उजव्या पायाला काळा धागा बांधावा. असे केल्याने कुंडलीत शनि ग्रह बलवान राहतो. यासोबतच राहू-केतूही त्रास देत नाहीत.

महिला कोणत्या पायात काळा धागा बांधावा?

महिलांना पायात काळा धागा बांधायचा असेल तर डाव्या पायात घालणे योग्य ठरते. त्यांनी शनिवारी हा धागा पायास बांधावा. असे केल्याने मानसिक शांती मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

धागा बांधणे ही अंधश्रद्धा मानावी का? 

जोवर कोणतीही गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हिताच्या आड येत नाही, त्या मर्यादेपर्यंत ठेवलेली श्रद्धा अंधश्रद्धा म्हणता येत नाही. श्रद्धा हा मानसिक दिलासा असून त्यावर सर्वस्वी विसंबून न राहता प्रयत्नांची जोड हवीच, हे ज्योतिष शास्त्रही सांगते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष