शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Astro Tips: 'या' तीन गोष्टी तुळशी वृंदावनाच्या जवळ ठेवा आणि दुःख, दारिद्रय घरातून कायमचे घालवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 13:55 IST

Astro Tips: तुळशी पूजनामुळे मन प्रसन्न तर होतेच शिवाय दुःख, दैन्य दूर होते, त्यासाठी सांगितलेल्या तीन गोष्टी न विसरता तुळशीजवळ ठेवा!

हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचे आयुर्वेदिक फायदेही आपणास माहित आहे. शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या मातेसमान मानले जाते. ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते, त्या घरातून दु:खं, दारिद्रय कायमचे निघून जाते. यासाठी तुळशी पूजेत काही गोष्टी समाविष्ट करा.

तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीचा विवाह शाळीग्राम याच्याशी झाला होता. शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप होते. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल, तर तुळशी अर्पण केली पाहिजे. 

तुळशीचे पावित्र्य एवढे आहे, की कितीही पंचपकवान्नाची थाळी असली, तरीदेखील तुळशी दलाशिवाय तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो. तुळशीच्या छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्णत्त्व येते आणि त्या भोजनात प्रसादत्त्व उतरते. तीर्थात देखील तुळशीचे पान घालून मगच ते तीर्थ प्राशन केले जाते. रोज सकाळी तुळशीची दोन पाने चावून खाल्यास सर्व प्रकारच्या रोगांना कायमचे दूर ठेवता येते, असा तुळशीचा महिमा आहे.

तुळशीमुळे वातावरण शुद्ध होते. म्हणून तुळशीच्या आसपासच्या परिसरात देवीदेवतांचा वास असतो असे मानतात. कारण ते वातावरण देवीदेवतांनाही आकर्षित करते. म्हणून तो परिसर कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवावा. 

तुळशी जेवढी पवित्र तेवढीच तिची डहाळी, फांद्या, मंजिरी आणि मातीदेखील पवित्र मानली जाते. कारण त्या मातीत तुळशीची मूळं रुजलेली असतात. म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील माती कपाळी लावावी.

तुळशीच्या रोपात अकारण वाढलेले तण उपटून फेकून न देता, ते गवत एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावेत. तुळशीच्या सान्निध्यात आल्याने त्या अकारण वाढलेल्या गवतालाही लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकतीबरोबर ठेवल्याने धनवृद्धी होते.

तुळशीजवळ रोज सायंकाळी दिवा लावावा आणि दिव्याच्या खाली, मंगल कलशाखाली ठेवतो, तशीच धान्याची छोटीशी राशी रचावी. त्यावर दिवा ठेवावा. ते दृष्य पाहून माता लक्ष्मी प्रसन्न होते. दिव्याच्या स्वच्छ प्रकाशात ते धान्य छोट्या जीव जंतूंना मिळते आणि सत्कर्म घडते. 

तुळशीची मंजिरी कृष्णाला प्रिय असते. म्हणून रोजच्या देवपूजेत तुळशी दलाबरोबर मंजिरी असल्यास कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशी ही संजीवनी आहे. तिचे पावित्र्य कायम राखावे. तुळशी माळा धारण करणाऱ्यांनी मद्यपान तसेच मांसाहार यांचे सेवन करू नये. हे नियम पाळले असता, तुळशी मातेचा, लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा वरदहस्त लाभून दु:खं-दैन्य दूर होते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष